रमजान स्पेशल @ मोहमद अली रोड ……….!


इईsss मोहमद अली रोड तिथ जाऊन काय खाणार ? घरी चांगले मटन वडे केलेत ते घश्याखाली उतरत नाहीत का ? काही गरज नाही तिकडं रस्त्यावर जाऊन खायची त्या धोत्रेला पण नको ते प्लान सुचतात वर्षाचा सण (गटारी ) आमच्या सोबत घालवायचा टाकून का म्हणून घाणीत जायची तुला हुक्की आलीय ………चार बुकं जास्ती शिकलास काय तर शिंग फुटलीत का तुला ………… कसलं मटन मिळतं तिथ माहित आहे का तुला ………….धोत्रेला फोन लावून दे मीच घेते त्याचा क्लास आज ………… इति आमच्या ताईमां ………. कशीबशी समजूत काढून बाहेर पडलो तर निल्या बुलेटीन मध्ये अडकलेला १० वाजून गेलेले …………एकदा वाटलं मरोत रद्द करावा आजचा प्लान पण परत निल्याचा मूड ऑफ ………… सव्वा दहा वाजता साहेब आले एकदाचे ………आल्या आल्या सुरवात अरे यार अस झालं आणि तसं झालं म्हणून दीड तासाचा उशीर …………. शेवटी तू प्रोडुसर तुला एपिसोड बनवायला आता आम्ही शिकवणं म्हणजे …………एकच हश्या :) :) ………….साब कहा उतरना है ………….वो शालीमार हॉटेल के सामने ………… उतरल्या उतरल्या निल्या दोन मिनिटात सराईतपणे नेमक्या गल्लीत शिरला …………इथ मालपोहा खायचा …… फिरनी आणि अफलातून त्या दुकानात सोबत त्या पदार्थाची इन detail इन्फो ……… निलेशचा तसा अनेक विषयात सॉलिड तगडा अभ्यास आहे . अनेकदा अडलं -नडलं आणि त्याला फोन केला कि समाधानकारक निरसन होणार हे ठरलेलं . 

गच्च भरलेल्या दोन गल्ल्या आर -पार फिरत जे स्पेशल त्याचा फडश्या पाडीत २ तास खादाडी झाली . पोट जवळ जवळ भरलच होतं पण अजून शालीमारची बिर्याणी आणि टिक्के बाकी आहेत . निल्लू बस कि रे आता अस बोलण्याची सोय नाही कारण तो भेटला कि तो म्हणेल ती पूर्वदिशा हा दंडक असतो. आणि तसही तो हल्ली अमावश्या - पौर्णिमेलाच भेटतो सो नो टोका -टोकि शालीमारच्या प्रतीक्षालयात तासभर बसल्यावर आला एकदाचा नंबर पुन्हा बिर्याणी आणि टिक्क्याचा निक्काल लावीत ढेकर येणार इतक्यात संत्या फालुदा १ नंबर मिळतो इथे दोघात एक होऊन जावूदे ………… बडीशेपलाहि पोटात जागा नाही आता फालुदा पुढच्या वर्षी बघू हे माझा चेहरा बघून त्याच्या लक्षात आलेलं असावं कदाचित …………… फिंगर बाऊल मधला लिंबू पिळीत हा एपिसोड इथेच संपला पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन ठिकाणी मस्त खा आणि स्वस्थ राहा …………अशी anchor line द्यावीशी वाटत होतं कारण दस्तूर खुद्द प्रोडुसर सोबत होते . 

मुळात काय खाल्लं आणि किती खाल्लं यापेक्षा निल्या सोबत जो मस्त वेळ घालवता आला . असा योग हल्ली फार कमी वेळा येतो . सध्या स्मार्ट फोनच्या फ़ूल्ल रेंजने निखळ मैत्रीचं नेटवर्क जाम केलंय. फिलिंगस डिजिटल झाल्यात पण wahts up वर आपल्या मित्राच्या डोळ्यात तुमच्यासाठीच्या आत्मीय भावना पाहता येत नाही त्यासाठी आपल्या दोस्ताच्या खांद्यावर हात टाकून अस मोकाट हिंडावं लागतं …………मस्तपैकी उनाड वेळ काढून. 

© Santo

आजोळी रविवार ……………!




आमचं आजोळ तिकडे कोकणात दाभोळ खाडी पलीकडच्या अंजनवेल गावात …………………. पण आजी जाऊन आता १० एक वर्ष झालीत . आणि आजोळ तुटलं ती असतांना वरचे वर जाणं होई तिचा आमच्या उन्हाळी सुट्टीच्या दिवसात पोरांना पाठव असा आईसाठीचा  निरोप घेऊनच मामा येत असे आणि मग आमची रवानगी त्याच्या सोबत होई ती २० एक दिवस धुडगूस घालण्यासाठीच ………….रानटी बोरं ………. कलमी आंबे …… …सकाळी बकरीच्या दुधाचा घट्ट चहा आणि बटर ………….दुपारच्या जेवणात खाडीची ताजी मासळी ……….आज्जीने चुलीवर थापलेल्या भाकऱ्या ………… संध्याकाळी परत बाजार आणायला आज्जी निघाली कि तिच्या सोबत कापडी पिशवी हलवत गेलं कि अगदी खिसा गच्च भरेस तोवर खाऊ मिळे ………वासंती तुझा नातू काय ग असं विचारणाऱ्या कोळणी गालगुच्छ घेत हातावर आठ आणे ठेवीत. खाऊ घे म्हणत पुन्हा गाल ओढीत. ………………बस्स सध्या या फक्त आठवणीच आहेत . 

पण कालच्या रविवारी पुन्हा आजोळी गेल्याची अनुभूती घेता आली . निमित्त होतं VasantAjoba's Stage Opening Ceremony च ………………अगदीच अनपेक्षित पणे या कार्यक्रमाला जाण झालं ………… इतक्या पावसातही २० - २५ जण उपस्थित होते .  विशेष म्हणजे आजी -आजोबांनी स्वतः जेवू घातलं ………पानात आग्रह करीत भात वाढनाऱ्या  आजोबांना पाहताना डोळे आपसूक पाणावले अर्थात सध्या आजी -आजोबा नसणाऱ्या प्रत्येकाला हे अनवट प्रेम गहिवरून टाकेल यात शंकाच नाही .
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी इथ येणं केलं होतं ते फक्त वसंत आजोबांच्या प्रेमाखातर ………१२ वर्षाच्या मयुर पासून ते थेट ६५ वर्षीय माने आज्जीपर्यंत सगळ्याचं हेच  "आजोळ " असल्यागत सगळा थाट होता . ………………. इंगळे  बंधूनी सितार आणि तबल्याची केलेली जुगल बंदी …………….पुनम ताईनी त्यावर केलेलं क्लासिकल नृत्य ……………पुण्याच्या आमच्या विनायक वाड या  परम लाडक्या मित्राने उलघडलेल्या फिल्मी संगीताच्या ऑफ रेकोर्ड नोंदी ……………. माने मावशीने म्हटलेली कान्हाची ठुमरी …………लचके काकांचे भन्नाट विनोद ………….राज कंदलगावकर ची गणेशा क्यालीग्राफी आणि अस बरच काही …………… भिन्न विचारांची आणि प्रवृत्तीची माणसं एका व्यासपीठावर आल्याचा कालचा सुवर्णयोग म्हणावा लागेल . एकंदरीत कालचा रविवार या नव्या आजोळी साजरा करतांना एक नव्हे तर चार -चार आज्जा भेटल्या ………आता आजोळ नाही अस तर म्हणता येणार नाहीच पण सोबत आजीच्या त्या आठवणी आसू नव्हे तर हासू घेऊन पुन्हा जागवता येतील . या आनंदाच्या फिलिंग्स काही वेगळ्याच सुखाच्या पायवाटेने  ओढीत नेतायत   कदाचित नव्या मामाच्या गावाची हद्द आता यापुढे सुरु होतीय . 


 Santo ©