वडा मला पाव ………!



करवंदाचा वाटा कितीला ? फणस दोघीत घेवूया का ग ? मी बाई वडाची फांदी घरातच  पुजते एवड्या पावसात  कुठे शोधू वड.तुझी पहिलीच वटपौर्णिमा असेल ना तू बाई वडावरच  जा पुजायला आमचं काय वय झालं आता ………. लाजतेस काय नवऱ्या कडून चांगली साडी घे मागून.   मधेच……… फांदी कितीला दिलीस ……… १० रुपये झाडाच्या पानाला पण काय मेला भाव आलाय . काळे मनी तेव्हडे राहिले . ते काय शर्माच्या दुकानात भेटतील. ………… सकाळी बाजारात कानावर पडलेला  सवांद ऐकला आणि अरे उद्या पौर्णिमा अशी उशिराची ट्यूब पेटली. 

सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेवर आधारित हि पूजा ………… सुवासिनीच अमर वरदान ………. जन्मो जन्मी हाच नवरा मिळेल याचं conformation देणारं हे व्रत आमची हि वर्षांनी एकदा माझ्या पाया पडते तो माझ्या आयुष्यातला जागतिक सन्मान दिवस उद्या येणार आहे.  हि पण जाईल उद्या आमच्या सोसायटीच्या लेडीज  सोबत नाक्यावरच्या उघड्या मारुतीच्या देवळात . देवळाच्या पारावर भला मोठा वड आहे. तिथे होते हि पूजा अगदी साग्र संगीत. आमचं लग्न झालं त्या पहिल्या वर्षी मी पण गेलो होतो. स्मिता सोबत , पहिल्या वर्षी म्हणे नवरापण लागतो असल्या पूजेत . तिथे अजून ३ - ४ माझ्या सारखेच नवे कोरे नवरे आले होते. आम्ही सगळेच अवघडून उभे होतो. वडाभोवती गोल गोल फिरणाऱ्या आमच्या बायका मला सेल वर चालणाऱ्या बाहुल्या वाटल्या अगदी एका लयीत त्यांची पावलं पडत होती. अंगावरचे दागिने, जरीच्या साड्या, नाकातल्या नथी ,डोईवरचा पदर त्यातून डोकावणार गुलाबाचं फुल लटकणारे जुईचे गजरे, पार्लरचा उठून दिसणारा मेक उप इत्यादी आदी ……………… हल्लीच्या सणात ,व्रत वैकल्यात  show बाजी आलीय दागिने ,भारी साड्या ,जेवणावळी ,मोठाले मंडप , महागड्या वस्तू , असा भंपकपणा वाढला आहे. त्या मिसेस भंडारीनां बघा त्यांच्या नवऱ्याने ४ तोळ्याच्या श्रीमंत हार केलाय गेल्या दिवाळीत आणि तुम्हाला नुसती एक पैठणी आणायला सांगितली तर अजून मुहूर्त सापडत नाहीये  ( माझ्या सारख्या पेपरात बातम्या करणाऱ्या सामान्य पत्रकाराला १ ५ हजाराची पैठणी घ्यायची म्हणजे साला पुढचे ४ महिने चहा "पाणी" बंद करावी लागेल. ) 

मला काही क्षण आईची आठवण झाली. माळ रानावरच्या आमराईतल्या कित्तेक वर्ष जुन्या वडाखाली गावातल्या बाया जमत भारी नसल्या तरी ठेवणीतल्या साड्याचा काठ पदराची जरी चमचम चमकत असे. कपाळावरच्या ठसठशीत  कुंकवाचा अर्धा चंद्र , गळ्यातलं साध धग्यातल मंगळसूत्र सगळं अगदी खरं खुरं आजच्या रंगवलेल्या मेकउपच्या आड लपलेला खोटेपणा त्याकाळी नव्हता म्हणून तेंव्हा वटपौर्णिमा असो वा मंगळा गौर  चार जणी मनापासून एकत्र येत आजच्या सारख्या फक्त formality म्हणून नाही . कारण fashion म्हणून नऊवारी साडी नेसणं वेगळं आणि परंपरा म्हणून  नऊवारीचा पदर मानानं डोईवर चढवणं वेगळं . 

- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment