टोम्याटो....!



दिवसभर ऑफिसच्या फायली उलटवून संध्याकाळी घरी जायला निघालो तर पावसाची रिप रिप सुरु होतीच स्टेशनला उतरतोय इतक्यात हिचा फोन आला. अहो ऐकलत का ? येताना जरा भाजी आणता का ? एक वेळ बॉसला मी नाही म्हणेन पण हिला ……… अजून तरी तेव्हडी डेरिंग नाही आली माझ्यात ……… हे पाव किलो ते अर्धा किलो हिची यादी वाढत गेली. हातात ब्याग ,छत्री आणि स्टेशनची तोबा गर्दी साला वैताग आहे …… अग मला मेसेज कर …. दुसऱ्या मिनिटाला यादी आली … १ किलो कांदे ,हिरवी मिरची , आलं , कोतीम्बीर , टोम्याटो , भेंडी , वांगी …… स्टेशनच्या दुतर्फा भाजीवाल्यांची लाईन आहे . त्यात घुसलो … पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखलाची चिक चिक झालेली पण पावसात भिजून भाज्या मात्र ताज्या तवान्या झालेल्या. निळीशार वांगी बघताच क्षणी पसंत पडली आई काय मस्त भरलं वांग करायची …. स्मिताला नाही जमत तितकंस ……… पण हे तिच्या तोंडावर बोललो तर उद्या डबा काय साधा चहा मिळणार नाही ………आणि उगाच गालात हसलो मी ……वांगी झाली . आणि लगोलग भेंडी , कांदे ,आलं, मिरची , घेतली एव्हाना १ ० ० ची नोट संपत आली होती. टोम्याटो च्या गाडीवर गेलो आणि भाव विचारला …. भैया कैसा दिया टमाटर … भैया गिराहिकांच्या गरड्यात होता. दोन वेळा विचारल्यावर त्याने उत्तर दिलं साब १ ५ रुपये पाव …. बाप रे इतना महेगा त्याने कुतूहलाने मला निरखून पाहिलं क्या साब दोन दिन से याही भाव है …. स्मिताने यादीत टोम्याटो च्या पुढे १ किलो लिहल होत ना इलाज फटक्यात ६ ० रुपये उडणार मी बराच वेळ रेंगाळतोय हे भैयाच्या लक्षात आलं आणि तो खेकसला साब लेना है तो लो खाली टायीम खोटी मत करो ……… तुझे क्या इतनी जल्दी पडी है ……. दे ना १ किलो माझा आवाज चढला आणि त्याचा उतरला.

भाजीपाला घेऊन घरी पोहचलो तर madam मालिका पाहत होत्या. ओह्ह शिट how रबिश लग्न झालंय तरी हिचा बॉय friend , माझ्या हातातल्या पिशव्या तशाच मी भिजून गार पडत आलो होतो. आणि हिचं त्या मालिकेच्या लफड्यात लक्ष काय म्हणावं ............. भाजीच्या पिशव्या किचन मध्ये नेऊन ठेवल्या आणि हात पाय धुवून मी change करून बाहेर आलो तरी madam सोफ्याला चिकटलेल्या . मी केसातल पावसाळी पाणी टिपत होतो. मी म्हटलं आज बाहेर जायचंय का ? जेवायला ………. जेवणा शिवाय तुम्हाला काय सुचतं का ? पोट बघा किती वाढलंय ……… जेवण तयार आहे . फक्त टोम्याटोची चटणी करायची बाकी आहे …. अग पण ……. मी काही बोलणार इतक्यात तिने चार टोम्याटो कापून तव्यावर घातलेच …. डेरिंग करून मी म्हटलं अग टोम्याटो ६ ० रुपये किलो आहेत …… काय ती जवळ जवळ किंचाळीच बंडल नका मारू परवाच आणले मी ३ ० रुपये किलो होते . या महागाईला सुमार नाही हो … बरं हे किती ते किती रुपये किलो याची उजळणी तिने घेतली सगळे भाव चढे होते शेवटी ५ रुपयाचा कडीपत्ता …………. हे ऐकून तिचा पारा चढला ………. एक काम धड करत नाहीत तुम्ही कडीपत्ता विकत आणत का कुणी तो complimentary असतो. एवढी भाजी घेतल्यावर, …………… हल्ली बार मध्ये पण चणे ,वाटणे , चकली complimentary म्हणून मिळत नाही आणि तू …………… बस करा तुमची पत्रकारिता लगेच दाखले नकोत मला …………बघत काय बसलाय ताटं घ्या लवकर आराधना लागेल एवढ्यात आज पूजाला संभव ओळखणार आहे … मी कपाळावर हात मारला आणि ताटं मांडली …………पण त्या ६ ० रुपये किलो टोम्याटोचा विषय डोक्यातून जात नव्हता ज्याला शक्य आहे तो १ ० ० रुपये किलो झाले तरीही घेणार ………… आज माझ्या ताटात टोम्याटोची चटणी होती पण मी १ किलो टोम्याटो घेताना जे भाव विचारून न घेता परत गेलेत त्यांच्या डाळीत चवीला पण टोम्याटोची एक फोड नसेल याची हुरहूर मात्र मनाला लागून राहिली .
आणि वाटलं राहुल गांधी , मोदि किवां अगदी अडवाणी प्रधानमंत्री होवोत नाही तर न होवोत आम्हाला त्याशाची देणं घेणं नाही पण जगण्यासाठी दोन घास खाण्याचे जिन्नस तरी किमान आमच्या आवाक्यात असावेत……


बाकी तो मेरा भारत महान है ! 

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment