गौरी - गणपतीचे सणाला …………!








कोकणात गौरी - गणपतीच्या सणाच्या तयारीची लगबग अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहचली आहे . घर - पोटमाळा झाडून झालाय…… ………मांडणीतली सगळी भांडी  लख्ख घासून काढलीयत…………. गणपतीचा पाट तर दोन महिन्या अगोदरच कारखान्यात पोचलाय .भिंतीना नवीन कलर चढलाय ………… बेड्या पासून थेट अंगणापर्यंत पावसात वाढलेलं गवत काढून वाट मोकळी करण्यात आलीय ………राहिलेल्या कामांपैकी ………………… मोदकासाठी घरगुती तांदूळ धुवून -वाळवून त्याचं दळण काढणं बाकी आहे . ……….  जिन्नस आणायचाय ………गवर आणणाऱ्या काकूला माघारपणासाठी शेरभर पीठ आणि बांगड्या भरायला पैसे द्यायचेत. गौरीची साडी ………….तिचा बसण्याचा  पाट यावर्षी बदलून घ्यायचाय ………मखर बांधणाऱ्या राजूला दोन दिवस अगोदर ये म्हणून  निरोप पाठवायचाय  ………. करमरकर गुरुजींन कडून  प्रतिष्ठापनेचा , गौरी आणण्याचा आणि ओवश्याचा मुहूर्त काढून आणायचाय……………अशी बरीच बारीक सारीक कामं बाकी आहेत सकाळीच आईने थेट दापोलीहून दिलेले हे लेटेस्ट update's ……………

नोकरी - व्यवसायासाठी गाव सोडून शहरात आलेल्या आम्हा कोकण्यांच गणपती जवळ आला कि मन आपसूकच गावाकडच्या रस्त्याने धावत सुटतं ……… आणि  त्यातही ज्याचं लहानपण कोकणात गेलंय त्याला तर या सणात आणिक बैचेन व्हायला होतं…………  कारण सध्या सगळ्या गोष्टी माणसं बोलावून कराव्या लागतात …………आणि आम्ही फक्त गणपती बसवायला पोहचतो ……………………  पण एकेकाळी याच सणात जो धुडगूस घातला होता तो सारा काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला . त्याकाळात आम्ही शाळेतून आलो कि लागलीच या उत्सवाच्या कामात रुजू होत असू …………….आमच्या जुन्या मातीच्या घराच्या भिंती डिसटेंबर ने रंगवण्या आधी त्या मातीन लिपून घ्यावा लागत त्यासाठी खास शेतावरून मुरमाची माती घेऊन ये ……………तिचा गारा करीत ती भिजव ………….मग जिथे खड्डे पडलेत तिथे हलक्या हाताने हा चिखल चेपीत वर ओला हात फिरवत भिंती जशाश्या तश्या वाटतील इतकं शार्प काम करावं लागे …………जरा कुठे उंचवटा दिसला कि पाठीत रट्टा पडे साधी भिंत लिपता येत नाय ………….आयुष्यात पोटाची खळगी कशी भरणार……………… इति बाबा . ……………… मग एखाद्या रविवारी माळा झाडायचा मुहूर्त असे………… त्या दिवशी सकाळी अंघोळ नाही दात घासून चहा बटर खाल्ला आणि  डोक्यावर फडकं बांधून माळ्यावर चढलं कि डायरेक दुपारी जेवायला खाली उतरायचं …………कोपरान कोपरा नीट झाडून काढायचा एकही जळ्मट दिसता कामा नये …………माळ्यावरची वाजवी अडगळ यावेळी कमी केली जाई . त्या अडगळीत बरेच दा अनेक interesting गोष्टी मिळत एखादी जुनी वही ज्यात गणिताचा अभ्यास लिहिलेला असे  ………. कायिक दिवस सापडत नसलेला शर्ट …………जुनी खेळणी …………पण त्या हरएक गोष्टीत तमाम आठवणी नव्याने मोकळ्या होत .  आमच्या चार भावंडा पैकी प्रत्येकाला एक जबादारी दिलेली असे ………….दोघांनी पितांबरी लावून भांडी घासायची. …………एकाने भिंती सारवयाच्या तर उरलेल्या  एकाने दुपारच्या जेवणाची सोय करायची  ………….एक अख्खा  दिवस मोडला कि हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होई . तत्काळ पुन्हा दुसऱ्या कामाची वाटणी ………… यात मी बाबांना कलर काढायला ………… मखर बांधायला मदत करायची. आईसोबत जाऊन फाटक दुकानातून जिन्नस आणायचा ( गणपतीत त्याकाळी आम्ही २-३ हजाराचा जिन्नस आणात असू हे विशेष ) ……………  अर्चू ताईने पताकांचा कागद कापून त्याच्या माळा करायच्या ……………आणि  सुबक डेकोरेशन करावं …………… अर्पणाने देवाच्या पुजेची सगळी तयारी करायची शिवाय सकाळचा पहिला प्रसादही तिनेच करावा …………कल्पना तशी लहान म्हणून तिला पूजेच्या दुर्वा -फुलं . गंध-  माळा - दुध -दही - गोमुत्र आणि अजून असलच काहीबाई किरकोळ काम अलॉट होई . अखेर उद्या गणपती येणार म्हणीत  लगबगीचा वेग कमालीचा वाढे जिकडे तिकडे एकच गडबड उद्यावर आला गणपती आणि आमचं अजून हे बाकी आहे आणि ते आणायचंय …………कधी उरकू हे सगळं देवच जाणे ………………दरम्यान एक दिवस अगोदर घर-माजघर शेणाने सारवून घेतलं जाई त्यावर अर्चू ताई चुन्याने बोटांची रांगोळी काढी ………………आणि अखेर गणेश चतुर्थीला सकाळी लवकर उठून गणपती आणायला जायची तयारी होत असे …………….रिक्ष्या वाला आला कि धावत रिक्ष्यात जाऊन बसायचं आणि मग डायरेक्ट कारखाना गाठायचा ……………कुंभारवाड्याच्या वेशीवर असलेल्या या कारखान्यासमोर तोबा गर्दी असे जो तो त्याचा बाप्पा न्यायला आलेला …………काही हवशी लोक खास खालू बाजा घेऊन गणपतीला माघारी आलेले असतात . इकडे गणपती डोक्यावर चढवला कि तिकडे विडी फुकत बसलेला सनई वाला विडी फेकत ……… सूर ओढी ट्याssss आणि आणि मग खालू बाजा जो दुमदुमायाचा तो घर येई पर्यंत अनेक गाण्यांवर बाप्पा डोलत मिरवत असे . ………………आम्ही गणपती घेऊन येईसतोवर …………….गणपतीची पावलं ………स्वागताची आरती ………पुजेची तयारी …………झालेली असे ………मे . काणे बुक डेपो पुणे यांच्या "गणेश प्रतिष्ठापना" आणि पूजा विधी या पुस्तकाच्या आधारावर  …………गणपती एकदाचा मखरात विराजमान होई …………बस ……………उरकली एकदाची पूजा म्हणीत उसासा टाकतोय इतक्यात …………. आमची  फौज माजघरातून चुलीकड वळवण्यात येई ………….या दिवशी म्हणे  पडवळ घालून केलेल्या बिरड्याच्या भाजीला विशेष महत्व आहे. म्हणून रात्री मोठ्या टोपात भिजत घातलेले पावटे सोलणे हे लंय कंटाळवाण  काम कसबसं उरकण्यात येई .( बरेचदा खूप वैताग आला तर बचकीभर पावटे सालांच्या कचऱ्यात टाकीत काम कमी करण्याची शक्कल आम्ही अंमलात आणायचो :p  )  …………त्या दिवशी गणपतीच्या नैवेद्याचा ताट भरे पर्यंत उसंत  नसे …………… चुलीवरच्या वाफेवरचे उकडीचे मोदक ……….गोडी डाळ ………भरलेली मिर्ची …………… पालाभाजी ………. भजी ………पापड ……लोणचं ……दही ………. साजूक तूप ……….ओली चटणी ………………आहां बाप्पा एकदम खुश . 

दोन दिवसांनी लगेच गवरीची तयारी ………….मुहूर्तावर गवरी आणायला आजूबाजूच्या सगळ्या सवासनी जमत ………… पारंपारिक गाणी म्हणत ………रानात गवरी आणायला जाणाऱ्या बायकांची यावेळी एकच झुंबड उडते ………….नव्या कोऱ्या काठपदरी  साड्या …………केसात मळलेल्या वेण्या ………….गजरे ………… असतील नसतील तेव्हडे घातलेले दागिने ……………….नाकातली पारंपारिक नथ …………….गवरी पेक्षा यांचाच थाट बघण्यालायक असायचा  ………….आणि त्यातही त्या घरात नवीन सून आली असेल तर तिचा मान काही वेगळाच …………अशावेळी तिला खास लग्नाचा भारी शालू नेसावयाची पद्धत आहे . सांजवायच्या आत गवरी घरी आणायची रीत आहे मग नव्या सुनेसाहित सगळ्या इतर बायका उखाण्यात नावं घेत लाजत मुरडत घरात प्रवेश करतात.  मग गवर नेसवणं ( रानातून आणलेल्या तिर्ड्याना बांधून त्यावर साडी नेसवणं )  अतिशय स्किल असणारं हे काम आहे . जाणकाराला मात्र काही वेळात हे शक्य आहे . याच दिवशी रात्री गवरीला भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे . ऐकून २०-२५ प्रकारच्या पाले आणि फळभाज्या एकत्रित करून हि भाजी तयार केली जाते सोबत तांदळाची भाकरी ……………गवरीचे दोन दिवस मात्र फुल ऑन धम्माल असते . सध्या TV वर मंगळागौरी चा इपिसोड दाखवतात ना तसले सगळे खेळ जागरणाच्या रात्री खेळले जातात ………………….  या दोन रात्री जागवणं याची मजा काही ऒरच …………त्यात गावभर आरत्या आणि बाल्या नाच करीत फिरणं वेगळंच ……………अर्थात वेळ वाऱ्यागत उडतो आणि विर्सर्जनाचा दिवस उजाडतो ……………ज्या रस्त्याने बाप्पा आनंदाची पर्वणी घेऊन आला त्याच वाटेने पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणत माघारी निघतांना त्याचाही उर भरून येत असेल कदाचित ………………… ! 


© Santo

No comments:

Post a Comment