बदलती दिवाळी ............!



रवा केतकरांच्या घरातून बेसन लाडवांचा" खमंग "प्यासेज मध्ये पसरला आणि दिवाळी आलीच इतक्यात याची आठवण आम्हा सुस्त शेजाऱ्यांना झाली. म्याडम बघा याला म्हणतात अस्सल फराळ………….नुसत्या वासाने मन तृप्त झालंय. ………………ग्राहक पेठेतला आयता माल खाणाऱ्या आपल्याला काय कळणार हे साजूकपण ……………दाराच सेन्ट्रल लॉक उघडत …………स्मिता - तू मदत करतोस का ? तर करूया यंदा फराळ माज्या एकटीने ते शक्य ...नाही . आणि साजूक नाजूक फराळ करणाऱया त्या केतकर वहिनी गृहिणी आहेत . आमच्या सारखं घर ऑफिस अशी कुतरओढ नाही त्यांना…………… शिवाय मिस्टर केतकर सरकारी बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे . सो त्यांची फराळाची लगबग असणारच ना ……………… आपल्याकडे कोण तू -मी आणि मीना मावशी …………आणि तसही मीना मावशी दिवाळीत सुट्टी घेतात गेल्या वर्षी त्यांना राखून ठेवलेला फराळ अखेर खराब झाला . मग चामुंडा वाल्याकडून मिठाई आणून दिली त्यांना ……………म्हणून नाही करत राजा फराळ ……………मला पण वाटतंच कि आपल्या घरातल्या किचन मधून चकली - शंकरपाळी - चिवडा - करंज्यांचा खमंग परसरावा अख्ख घर फराळाच्या तयारीत घमघमुन जावं………पण त्यासाठी घरात माणस असावी लागतात . सगळ्यांनी मिळून या लगबगीत उतरण्यात जी मज्जा आहे ती एकट्या दुकट्याने तडफडत सगळा घाट उरकण्यात नसते ना ……………तरीही अगदीच यंदाचा सण रिता नाही घालवणार कडक पोह्याचा चिवडा करते …………आणि थोड्याश्या बेडेकर भाजणीच्या चकल्या ……………बाकी लाडू बीडू …………सालाबाद प्रमाणे ग्राहक पेठेतुनच …………स्मिताच्या अशा नेहमीच्या समजूतदारपणामुळे बहुदा आमच्यात मतभेत झाले तरी ते फार काळ टिकत नाही.

साहेब यादी करायला घ्यायची का ? अग आत्ताचं किचन आवरून झालाय यादी काय करू कि उद्या …………उद्या परवा तेरवा अस ढकलीत दिवाळी उद्यावर येईल आणि आपली दिवाळी बाजारातच रहायची ते काही नाही आता घ्या लिहायला मी सांगते ……………एकूण दोन याद्या करा एक तुमची एक माझी …………दोन याद्या कशाला तू ऑफिस मधून निघालीस कि आपण दादरला भेटू आणि करू कि शॉपिंग ……………तुमच राहूद्या मला सांगाल १० मिनिटात पोहचतो आणि १ तासाने उगवाल शिवाय हे नको जरा महाग वाटतंय ………. पणत्या कशाला गेल्यावर्षीच्याच पुसून वापरता येतील …………………अनारसे इतके महाग असतांना १ किलो का घेतलेस असा वाद घालत दोन चार तास घालवत बसण्या पेक्षा तुम्ही फक्त पूजेचं समान आणा बाकी मी बघते काय आणायचं ते वाघमारे म्हणालीय तिला पण शॉपिंग करायचीय सो आम्हा बायकांमध्ये तुमची लुडबुड नको ……………वाण्याच्या यादीत मोती साबण आणि राम बंधू चिवडा मसाला लिहायला विसरू नका ………नाही तर अंघोळीला बसल्यावर आठवण यायची मोती साबण राहिला …………….आणि उटण पण लिहू ना …………….किचन मधून उत्तर आल. उटण नको हो हल्ली हरएक राजकीय पक्षवाले उटण्याची पाकिटं वाटतात. …………बरं तुला किती कॅश लागेल.कि कार्ड देऊ …………कार्डच द्या ते बरं पडतं पाकिटात नोटा घेऊन हल्ली कोण फिरतय ……………आणि हो तुम्हाला सागायचं राहीलच……यावेळी मीना मावशी सोबत तिच्या सुनेलापण एक साडी घेईन म्हणते तिचा दिवाळसण आहे . आणि मीना मावशी किती करते हो ह्या घरासाठी ………देण्या घेण्यात स्मिताला सगळीच नावाजतात तशी माणसं जोडलीत तिनं ……………………

दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत रोज संध्याकाळी घरी येतांना हातात दोन चार पिशव्या ठरलेल्या ज्या वस्तू घेवून झाल्यात त्यावर फुल्या करीत पुढच्या जिन्नसाची ठिकाणं ठरवीत दुसऱ्या दिवशीचा प्लान करीत करीत अखेर शॉपिंग संपते दिवाळीच्या पूर्व संध्येला लगबगीनं सगळ आवरीत त्यातल्या त्यात मांडा मांड करीत . पणत्या- रांगोळ्या दराच तोरणं खास फराळ द्यायला आणलेल्या प्लेट वाट्या …………सोप्याची कव्हरं ………बेडशिट …… उटण ……………दिवाळी पहाटच्या मुहूर्तावर करायच्या पूजेची तयारी अशा अनेक गोष्टींची तयारी करून पुन्हा सकाळी लवकर उठायला हवंच लहानपणा पासून अंधारल्या पहाटेच पहिली अंघोळ करायचा जुना रिवाज आजही टिकून आहे.

मुंबईतल्या बंद दाराच्या घरात विकतचा फराळ चाखताना मात्र राहून राहून गावी आईने केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले पितळी डबे डोळ्यासमोर उभे राहतात. याच दरम्यान कोकणात शेतीची कापणीच्या कामांची लगबग असे दिवसा शेतात राबूनही ती एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश ……………………… दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज मला एकूण ५ बहिणी त्याकाळात गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी. ………. यांस कडून ………यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. ………… काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.

रांगोळीत जितके जास्ती ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंहि अशाच असंख्य ठिपक्यांनी विभागालय ………………… गरज आहे. यांना जोडणाऱ्या नात्यांची आणि मैत्रीच्या अंधुक रेश्यांची ……………………बाकी रंग तर आपसूकच भरले जातील

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा ………… !

!! शुभ दिपावली !!

© संतोष टाकळे

No comments:

Post a Comment