वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश.................!

वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश प्रकाशित झालंय ……………सुनील दादांनी क्षणाक्षणा चे उपडेट्स FB वर पोस्ट केले आणि प्रकाशन सोहळ्याच्या दिशेने असणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांना हा कार्यक्रम online पाहता आला . मनात असूनही वेळेत न पोहचता आल्याने काही वेळ स्वतः वर संताप आला . पण work come first या कॉर्पोरेट तंत्रात अडकलेल्या आम्हा नोकरदारांना इथ वाजवी बोलायला अजिबात वाव नसतो हि आमची गोची कित्तेकदा कुणाला पटवूनहि पटत नाही . हे वेगळच ……………… फोर्ट ते दादर या १ तासाच्या प्रवासात तिकडे नक्की काय चालू असेल याची उस्तुकता अधिक उपसेट करणारी होती . आणि अखेर एकदाचं दादर माटुंगा कल्चरल सेंटर आलं …………सभागृह कटोकाट भरलेला . समोर वैभव त्याचं मनोगत व्यक्त करीत होता . सोहळा अंतिम टप्यात पोहचलेला. वैभव नामदेवदादा ढसाळांची आठवण सांगत होता . एकंदरीत मोजून १० मिनिटात सांगता झाली .……फार लागून गेलं मनाला कारण युवराज सर , कविता ताई , एकनाथ आव्हाड सर , संभाजी दादा सगळेच फेवरेट वक्ते ऐकता आले नाहीत. शिवाय सिद्धूच निवेदन आणि डॉक्टर अभिराम दीक्षित ने वाचलेली कविताहि ………

वैभव भडकलाच होता टाकळ्या लवकर आलास आणि असे बरच काही शेलकी उद्धार पार पाडीत . शेवटी त्यानं मिठी मारली . वैभु खरचं आज आनंदाचा सोहळा माझ्याकडून हुकलाय माफ कर मित्रा …………पण त्याचं क्षणाला अगदी भरून आलं इतके अडथळे मोडीत अखेर वैभव च पुस्तक प्रकाशित झालंच…………. त्यासाठी कीर्तीकुमारच्या नवता प्रकाशनाचे मनपुर्वक आभार ………….तसे वैभव सोबत माझे असंख्य मतभेत आहेत . अनेकदा आमच्यात शाब्दिक चकमकीहि झाल्यात . तो जाम वैतागलाय देखील माझ्यावर . पण त्यांनी लिहिलेलं बरच काही मला अतोनात भावलय………… डीलीट केलेलं सारं आकाश परवाच रात्री एका दमात वाचून काढलं यातल्या बऱ्याच कवितांचा अर्थ उमगलेला नाही . आता हे त्याला सागितलं तर तो म्हणेल टाकळ्या थांब तुझा क्लासच घेतो तू भेट मग बघ तुला कसं चोपून काढतो ते ;) :P ....................आणि हा माझ्यावरचा अन्याय आहे . मला मुद्दामून टार्गेट केलं जातंय …………असा मी कांगावा करायचा यात आमची वेगळी मज्जा आहे. . ……… मागे कोकण दौऱ्यात वैभव त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे दापोलीत असूनही घरी येऊ शकला नाही. याची हळहळ आजही लागून राहिलीय . पण त्यानं मटण -वड्यांना दिलेली मनमुराद दाद आजही लक्षात आहे . मुळात तो माणूसवेडा आहे . कुठल्या कानाकोपऱ्यात याची मित्रावळ असेल याचा नेम देता येत नाही . 

काही महिन्यांपूर्वी मी आमच्या मास्तरांना ( राकेश शिर्के ) विचारलं होतं कोण हा वैभव छाया …………तेंव्हा मास्तर म्हणाले होते . कळेल जाड्या येत्या काही दिवसात धीर धर आज तोच अनोळखी वैभव माझ्यासाठी वैभु झालाय यात आलच कि सगळं ……………………

बस लिखते राहो हमेशा दोस्त 
हर वक्त के उस बेजुबान लम्हो को 
उठने दो …. जजबातोंका तुफान 
क्यो कि अब अनजाना काफिला भी 
इस तरफ मुड़ रहा है !

© Santo


Photo Courtesy - Rani Salunke

No comments:

Post a Comment