गौरी - गणपतीचे सणाला …………!








कोकणात गौरी - गणपतीच्या सणाच्या तयारीची लगबग अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहचली आहे . घर - पोटमाळा झाडून झालाय…… ………मांडणीतली सगळी भांडी  लख्ख घासून काढलीयत…………. गणपतीचा पाट तर दोन महिन्या अगोदरच कारखान्यात पोचलाय .भिंतीना नवीन कलर चढलाय ………… बेड्या पासून थेट अंगणापर्यंत पावसात वाढलेलं गवत काढून वाट मोकळी करण्यात आलीय ………राहिलेल्या कामांपैकी ………………… मोदकासाठी घरगुती तांदूळ धुवून -वाळवून त्याचं दळण काढणं बाकी आहे . ……….  जिन्नस आणायचाय ………गवर आणणाऱ्या काकूला माघारपणासाठी शेरभर पीठ आणि बांगड्या भरायला पैसे द्यायचेत. गौरीची साडी ………….तिचा बसण्याचा  पाट यावर्षी बदलून घ्यायचाय ………मखर बांधणाऱ्या राजूला दोन दिवस अगोदर ये म्हणून  निरोप पाठवायचाय  ………. करमरकर गुरुजींन कडून  प्रतिष्ठापनेचा , गौरी आणण्याचा आणि ओवश्याचा मुहूर्त काढून आणायचाय……………अशी बरीच बारीक सारीक कामं बाकी आहेत सकाळीच आईने थेट दापोलीहून दिलेले हे लेटेस्ट update's ……………

नोकरी - व्यवसायासाठी गाव सोडून शहरात आलेल्या आम्हा कोकण्यांच गणपती जवळ आला कि मन आपसूकच गावाकडच्या रस्त्याने धावत सुटतं ……… आणि  त्यातही ज्याचं लहानपण कोकणात गेलंय त्याला तर या सणात आणिक बैचेन व्हायला होतं…………  कारण सध्या सगळ्या गोष्टी माणसं बोलावून कराव्या लागतात …………आणि आम्ही फक्त गणपती बसवायला पोहचतो ……………………  पण एकेकाळी याच सणात जो धुडगूस घातला होता तो सारा काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला . त्याकाळात आम्ही शाळेतून आलो कि लागलीच या उत्सवाच्या कामात रुजू होत असू …………….आमच्या जुन्या मातीच्या घराच्या भिंती डिसटेंबर ने रंगवण्या आधी त्या मातीन लिपून घ्यावा लागत त्यासाठी खास शेतावरून मुरमाची माती घेऊन ये ……………तिचा गारा करीत ती भिजव ………….मग जिथे खड्डे पडलेत तिथे हलक्या हाताने हा चिखल चेपीत वर ओला हात फिरवत भिंती जशाश्या तश्या वाटतील इतकं शार्प काम करावं लागे …………जरा कुठे उंचवटा दिसला कि पाठीत रट्टा पडे साधी भिंत लिपता येत नाय ………….आयुष्यात पोटाची खळगी कशी भरणार……………… इति बाबा . ……………… मग एखाद्या रविवारी माळा झाडायचा मुहूर्त असे………… त्या दिवशी सकाळी अंघोळ नाही दात घासून चहा बटर खाल्ला आणि  डोक्यावर फडकं बांधून माळ्यावर चढलं कि डायरेक दुपारी जेवायला खाली उतरायचं …………कोपरान कोपरा नीट झाडून काढायचा एकही जळ्मट दिसता कामा नये …………माळ्यावरची वाजवी अडगळ यावेळी कमी केली जाई . त्या अडगळीत बरेच दा अनेक interesting गोष्टी मिळत एखादी जुनी वही ज्यात गणिताचा अभ्यास लिहिलेला असे  ………. कायिक दिवस सापडत नसलेला शर्ट …………जुनी खेळणी …………पण त्या हरएक गोष्टीत तमाम आठवणी नव्याने मोकळ्या होत .  आमच्या चार भावंडा पैकी प्रत्येकाला एक जबादारी दिलेली असे ………….दोघांनी पितांबरी लावून भांडी घासायची. …………एकाने भिंती सारवयाच्या तर उरलेल्या  एकाने दुपारच्या जेवणाची सोय करायची  ………….एक अख्खा  दिवस मोडला कि हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होई . तत्काळ पुन्हा दुसऱ्या कामाची वाटणी ………… यात मी बाबांना कलर काढायला ………… मखर बांधायला मदत करायची. आईसोबत जाऊन फाटक दुकानातून जिन्नस आणायचा ( गणपतीत त्याकाळी आम्ही २-३ हजाराचा जिन्नस आणात असू हे विशेष ) ……………  अर्चू ताईने पताकांचा कागद कापून त्याच्या माळा करायच्या ……………आणि  सुबक डेकोरेशन करावं …………… अर्पणाने देवाच्या पुजेची सगळी तयारी करायची शिवाय सकाळचा पहिला प्रसादही तिनेच करावा …………कल्पना तशी लहान म्हणून तिला पूजेच्या दुर्वा -फुलं . गंध-  माळा - दुध -दही - गोमुत्र आणि अजून असलच काहीबाई किरकोळ काम अलॉट होई . अखेर उद्या गणपती येणार म्हणीत  लगबगीचा वेग कमालीचा वाढे जिकडे तिकडे एकच गडबड उद्यावर आला गणपती आणि आमचं अजून हे बाकी आहे आणि ते आणायचंय …………कधी उरकू हे सगळं देवच जाणे ………………दरम्यान एक दिवस अगोदर घर-माजघर शेणाने सारवून घेतलं जाई त्यावर अर्चू ताई चुन्याने बोटांची रांगोळी काढी ………………आणि अखेर गणेश चतुर्थीला सकाळी लवकर उठून गणपती आणायला जायची तयारी होत असे …………….रिक्ष्या वाला आला कि धावत रिक्ष्यात जाऊन बसायचं आणि मग डायरेक्ट कारखाना गाठायचा ……………कुंभारवाड्याच्या वेशीवर असलेल्या या कारखान्यासमोर तोबा गर्दी असे जो तो त्याचा बाप्पा न्यायला आलेला …………काही हवशी लोक खास खालू बाजा घेऊन गणपतीला माघारी आलेले असतात . इकडे गणपती डोक्यावर चढवला कि तिकडे विडी फुकत बसलेला सनई वाला विडी फेकत ……… सूर ओढी ट्याssss आणि आणि मग खालू बाजा जो दुमदुमायाचा तो घर येई पर्यंत अनेक गाण्यांवर बाप्पा डोलत मिरवत असे . ………………आम्ही गणपती घेऊन येईसतोवर …………….गणपतीची पावलं ………स्वागताची आरती ………पुजेची तयारी …………झालेली असे ………मे . काणे बुक डेपो पुणे यांच्या "गणेश प्रतिष्ठापना" आणि पूजा विधी या पुस्तकाच्या आधारावर  …………गणपती एकदाचा मखरात विराजमान होई …………बस ……………उरकली एकदाची पूजा म्हणीत उसासा टाकतोय इतक्यात …………. आमची  फौज माजघरातून चुलीकड वळवण्यात येई ………….या दिवशी म्हणे  पडवळ घालून केलेल्या बिरड्याच्या भाजीला विशेष महत्व आहे. म्हणून रात्री मोठ्या टोपात भिजत घातलेले पावटे सोलणे हे लंय कंटाळवाण  काम कसबसं उरकण्यात येई .( बरेचदा खूप वैताग आला तर बचकीभर पावटे सालांच्या कचऱ्यात टाकीत काम कमी करण्याची शक्कल आम्ही अंमलात आणायचो :p  )  …………त्या दिवशी गणपतीच्या नैवेद्याचा ताट भरे पर्यंत उसंत  नसे …………… चुलीवरच्या वाफेवरचे उकडीचे मोदक ……….गोडी डाळ ………भरलेली मिर्ची …………… पालाभाजी ………. भजी ………पापड ……लोणचं ……दही ………. साजूक तूप ……….ओली चटणी ………………आहां बाप्पा एकदम खुश . 

दोन दिवसांनी लगेच गवरीची तयारी ………….मुहूर्तावर गवरी आणायला आजूबाजूच्या सगळ्या सवासनी जमत ………… पारंपारिक गाणी म्हणत ………रानात गवरी आणायला जाणाऱ्या बायकांची यावेळी एकच झुंबड उडते ………….नव्या कोऱ्या काठपदरी  साड्या …………केसात मळलेल्या वेण्या ………….गजरे ………… असतील नसतील तेव्हडे घातलेले दागिने ……………….नाकातली पारंपारिक नथ …………….गवरी पेक्षा यांचाच थाट बघण्यालायक असायचा  ………….आणि त्यातही त्या घरात नवीन सून आली असेल तर तिचा मान काही वेगळाच …………अशावेळी तिला खास लग्नाचा भारी शालू नेसावयाची पद्धत आहे . सांजवायच्या आत गवरी घरी आणायची रीत आहे मग नव्या सुनेसाहित सगळ्या इतर बायका उखाण्यात नावं घेत लाजत मुरडत घरात प्रवेश करतात.  मग गवर नेसवणं ( रानातून आणलेल्या तिर्ड्याना बांधून त्यावर साडी नेसवणं )  अतिशय स्किल असणारं हे काम आहे . जाणकाराला मात्र काही वेळात हे शक्य आहे . याच दिवशी रात्री गवरीला भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे . ऐकून २०-२५ प्रकारच्या पाले आणि फळभाज्या एकत्रित करून हि भाजी तयार केली जाते सोबत तांदळाची भाकरी ……………गवरीचे दोन दिवस मात्र फुल ऑन धम्माल असते . सध्या TV वर मंगळागौरी चा इपिसोड दाखवतात ना तसले सगळे खेळ जागरणाच्या रात्री खेळले जातात ………………….  या दोन रात्री जागवणं याची मजा काही ऒरच …………त्यात गावभर आरत्या आणि बाल्या नाच करीत फिरणं वेगळंच ……………अर्थात वेळ वाऱ्यागत उडतो आणि विर्सर्जनाचा दिवस उजाडतो ……………ज्या रस्त्याने बाप्पा आनंदाची पर्वणी घेऊन आला त्याच वाटेने पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणत माघारी निघतांना त्याचाही उर भरून येत असेल कदाचित ………………… ! 


© Santo

यंदा "नो बाल गोविंदा" ..............!




हवेत कशाला ११ थर 
"गिनीच" बुकात नोंदवायला . असा रेकॉर्ड केला कि ते "गिनीच" बुकवाले थरातल्या प्रत्येकाला सरकारी नोकरी देतात का ? मुळात तुम्हां तमाम मंडळाच्या पोरांनी गेल्या काही वर्षात स्वतःच्या जीवावर बेतून ……………राजकीय भाऊ - दादांना करोडपती बनवलंय हे लक्षात घ्या …. …………. लाखात बक्षिसं देणारे हे भामटे या उत्सवात करोडोंची उलाढाल करून आपली बोचकी बांधतात हे कधी कळणार आपल्याला ………. भाऊनसाठी आपण काय पण करून यंदा ९ थर लावणारच असा संकल्प करणारा दुसऱ्या दिवशी KEM च्या खाटेवर आडवा असतो . ……………………… त्याला लीलावती किंवा हिंदुजात का बरं उपचार मिळत नाहीत . ………………. दिवसभर किमान ५-६ वेळा कपडे बदलत भाऊ जेंव्हा मोठाल्या स्टेज वर सेलिब्रिटीसोबत ठुमकत असतो . तेंव्हा त्याचा घाम पुसायलाहि ब्रांडडेड टिशू ………आणि आपण मात्र चिखलात लोळत इतक्या थराला तितके रुपये देणाऱ्या हांडी च्या शोधत फिरत असतो. ……………. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करीत तिच्या आईला बघतोच आता कोण आडवंतय आम्हाला हा नेमका कशाचा माज …………………तर काहींनी यावरहि डोकं लावीत दही हांडी साहसी खेळ म्हणून जाहीर करा अशी मागणी केली . अर्थात बसल्या जागेवर एका दिवसात रग्गड कमवून देणारं दुकान बंद पडायची वेळ आली तर एव्हडी फडफड होणारच ……………नाहीतर दहीहांडी वर बहिष्कार टाका अशी गोविंदा पथकांची टाळकी फिरवणारे काही राजकीय नेतेच मुख्य आयोजक आहेत / होते (काहींनी आजच आपला ठेला उचललाय ) . अरे पण ते कोवळं पोर जेंव्हा इतक्या उंचीहून खाली निसटत तेंव्हा त्याच्या आईच्या काळजात कसली उसळी भरत असेल याचा वेध कुणी घेतलाय का ? …………एकीकडे आपण कृष्णजन्माचा गोपाळकाळा करीत उत्सव घालतो आणि दुसरीकडे त्याच बाळकृष्ण स्वरूपाला जिंदगी- मौत के खेलमैं दावावर लावतो. विकृत आहे हे सारं ……………………अरे मान्य आहे ना हा आपला मराठमोळा सण आहे. पण याच सणाला पॉलीटिकल भाऊंनी हाय ज्याक केलंय आणि दिवसभर LIVE कव्हरेज देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी त्याला लोकप्रियतेच्या hype वर नेलंय . आता सामाजिक भान आल्यागत घसा फोडून कोकलणाऱ्या माध्यमांनीच या गल्लीतल्या भाऊच्या हांडीला एक्ट्रा स्पेस देत international BIG NEWS केलंय हे Ignore करता येणार नाही. .

पूर्वी चाळी - वळीत खेळला जाणऱ्या गोविंदाच्या टोळीत अपघात होतंच नव्हते असा युक्तिवाद कोणी केला नाही आणि करणार देखील नाही . पण त्यावेळेस हा निव्वळ सण होता . नाक्यावर लटकणारी मटकी फोडण्याचा निखळ आनंद घेण्याचा …………एकमेकांच्या कंबरेत हात घालीत खालू बाज्यावर बेधुंद होत नाचण्याचा . तेव्हाच्या लोकांना बेभान व्हयला आता सारखा ओह्ह एस कमॉन म्हणीत उड्या मारणारा हनी सिंग लागत नव्हता . त्यांच्या रक्तातच तो जोश सळसळत असे . …………………काही असो पण यंदा "नो बाल गोविंदा" हि मोहीम फत्ते झालीच पाहिजे . ढाकू -माकूम बाज्यावर यावर्षी चाळीसमोरच कल्ला करूया कि …………दह्या दुधानी भरलेल्या हंड्या दोन तीन थर रचित आपल्या आपणच फोडूया ना भावा………………. आपल्या मंडळाच्याच पोरांनी वर्गणी काढून एकत्रच जेवण मागवूया कि ……………लय धम्माल घालू ………………आपल्याच घरासमोर …………………त्या ५ -१० हजारच पाकीट घ्यायला भिकाऱ्या सारखं कशाला कुणाच्या दारात जायचं ……साला आपली बी काय लेवल हाय का नाय …………बाकी संस्कृतीच्या नावावर अर्निंगइवेंट करणाऱ्यांना बसुद्यात बोंबलत आपल्या बापाचं काय जातंय .


© संतोष टाकळे

वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश.................!

वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश प्रकाशित झालंय ……………सुनील दादांनी क्षणाक्षणा चे उपडेट्स FB वर पोस्ट केले आणि प्रकाशन सोहळ्याच्या दिशेने असणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांना हा कार्यक्रम online पाहता आला . मनात असूनही वेळेत न पोहचता आल्याने काही वेळ स्वतः वर संताप आला . पण work come first या कॉर्पोरेट तंत्रात अडकलेल्या आम्हा नोकरदारांना इथ वाजवी बोलायला अजिबात वाव नसतो हि आमची गोची कित्तेकदा कुणाला पटवूनहि पटत नाही . हे वेगळच ……………… फोर्ट ते दादर या १ तासाच्या प्रवासात तिकडे नक्की काय चालू असेल याची उस्तुकता अधिक उपसेट करणारी होती . आणि अखेर एकदाचं दादर माटुंगा कल्चरल सेंटर आलं …………सभागृह कटोकाट भरलेला . समोर वैभव त्याचं मनोगत व्यक्त करीत होता . सोहळा अंतिम टप्यात पोहचलेला. वैभव नामदेवदादा ढसाळांची आठवण सांगत होता . एकंदरीत मोजून १० मिनिटात सांगता झाली .……फार लागून गेलं मनाला कारण युवराज सर , कविता ताई , एकनाथ आव्हाड सर , संभाजी दादा सगळेच फेवरेट वक्ते ऐकता आले नाहीत. शिवाय सिद्धूच निवेदन आणि डॉक्टर अभिराम दीक्षित ने वाचलेली कविताहि ………

वैभव भडकलाच होता टाकळ्या लवकर आलास आणि असे बरच काही शेलकी उद्धार पार पाडीत . शेवटी त्यानं मिठी मारली . वैभु खरचं आज आनंदाचा सोहळा माझ्याकडून हुकलाय माफ कर मित्रा …………पण त्याचं क्षणाला अगदी भरून आलं इतके अडथळे मोडीत अखेर वैभव च पुस्तक प्रकाशित झालंच…………. त्यासाठी कीर्तीकुमारच्या नवता प्रकाशनाचे मनपुर्वक आभार ………….तसे वैभव सोबत माझे असंख्य मतभेत आहेत . अनेकदा आमच्यात शाब्दिक चकमकीहि झाल्यात . तो जाम वैतागलाय देखील माझ्यावर . पण त्यांनी लिहिलेलं बरच काही मला अतोनात भावलय………… डीलीट केलेलं सारं आकाश परवाच रात्री एका दमात वाचून काढलं यातल्या बऱ्याच कवितांचा अर्थ उमगलेला नाही . आता हे त्याला सागितलं तर तो म्हणेल टाकळ्या थांब तुझा क्लासच घेतो तू भेट मग बघ तुला कसं चोपून काढतो ते ;) :P ....................आणि हा माझ्यावरचा अन्याय आहे . मला मुद्दामून टार्गेट केलं जातंय …………असा मी कांगावा करायचा यात आमची वेगळी मज्जा आहे. . ……… मागे कोकण दौऱ्यात वैभव त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे दापोलीत असूनही घरी येऊ शकला नाही. याची हळहळ आजही लागून राहिलीय . पण त्यानं मटण -वड्यांना दिलेली मनमुराद दाद आजही लक्षात आहे . मुळात तो माणूसवेडा आहे . कुठल्या कानाकोपऱ्यात याची मित्रावळ असेल याचा नेम देता येत नाही . 

काही महिन्यांपूर्वी मी आमच्या मास्तरांना ( राकेश शिर्के ) विचारलं होतं कोण हा वैभव छाया …………तेंव्हा मास्तर म्हणाले होते . कळेल जाड्या येत्या काही दिवसात धीर धर आज तोच अनोळखी वैभव माझ्यासाठी वैभु झालाय यात आलच कि सगळं ……………………

बस लिखते राहो हमेशा दोस्त 
हर वक्त के उस बेजुबान लम्हो को 
उठने दो …. जजबातोंका तुफान 
क्यो कि अब अनजाना काफिला भी 
इस तरफ मुड़ रहा है !

© Santo


Photo Courtesy - Rani Salunke