जून महिना संपत आला की, माळ्यावरून गणपतीचा पाट काढून तो पागोळीत भिजत ठेवायचा. सकाळी शाळेत जातांना पागोळीत टाकलेला पाट संध्याकाळी शाळेतून येईसतोवर चांगला धुपून निघालेला असायचा. मग त्याला नारळाच्या किशीने घासून लक्ख करायचा आणि मग सायकलच्या कॅरिअरला बांधून कुंभारवाड्यात गणपतीच्या कारखान्यात न्यायचा. सोबत यंदा गणपती कसा हवाय यासाठी घरातल्या जाहिरात कम क्यालेंडरवर छापून आलेला एखादा फोटो सोबत घेवून जायचा. पहिल्यांदा आंजर्लेकर काका पाटाच्या मागे नंबर टाकून त्याची नोंद त्यांच्या चोपडीत करायचे आणि मग सोबत नेलेल्या संदर्भासाठीच्या फोटोला निरखत दोन चारदा चष्मा वर खाली करत. डोक्यावरून हात फिरवत…आंजर्लेकर काका – ‘म्हंजे असा हवाय… याची सोंड डावी आहे तिला उजवी करावी लागंल… सिंहासन असा नाय होणार हा साच्यान करतात आपण हातानं करताव. असा शेम टू शेम नाय होनार आधीच सांगतोय मग उग्गाच तोंड फुगवून बसू नकोस आणि हातात हा त्रिशूल हवाय की, मोदक चालंल? त्रिशूल पण बनव आपण पण तो लोखंडी देवा लागंल आणि मेन म्हंजे कलर पण बदलंल. हे रंग मातीच्या मूर्तीवर बसत नायत. लय म्हागातला कलर हाय ह्या फोटोतल्या गणपतीला. तो उंदीर पण लागंल नय. फोटोत हाय तसा… बघता काय तो मी जमवता माझ्या हिशोबान पण बाबासना सांग यंदा जरा भाव वाढंल. लय काम हाय ह्या फोटोतला गणपती बनवायचा म्हणजे. का मी असा जरासा याच्यासारखा दिसणारा बनव त्याला काय जास्ती पैसं वाढणार नाय. बोल लवकर बरीच कामा पडलीत एका गणपतीला एवढा टाइम दिला तर कसा चालल. यात मी अजून दोन गणपती बनवीन. यंदाना गणपती वाढलेत आपल्याकडलं.’
मी – ‘बनवा मग याच्यासारखा जरासा दिसणारा.’
आंजर्लेकर काका – ‘तू कालजी नको करूस कसला बनवतो बघ भारी एकदम.
’पाट सोडून परत पायंडल मारत घरच्या दिशने येतांना उग्गाच मनाला लागून राहायचं आपण मोठं झालो आणि कामाला लागलो की, हवा तसा गणपती बनवून घेऊ. आता नको उगाच बाबांना वर शंभर- दोनशे टाकायला. जिन्नसालाच लय पैसे लागतात शिवाय डेकोरेशन, लायटिंग अजून बाकी आहे. नको राहूदे आणू मग जास्ती पैसे आले की त्या क्यालेंडरसारखा डिट्टो गणपती. मुंबई नाय तर पुण्यातनं.
पुढे मग ऑगस्ट महिन्यात शनिवारची शाळा सुटली की संदीप-अमित सोबत पुन्हा कारखाना गाठायचा. काका कुठला हो आमचा गणपती. तोंडाला रुमाल बांधून मूर्तीला पॉलिश करता करता ते बोटांन दखवीत. त्या लाईनमध्ये हुबेहूब तसे चार पाच गणपती असत मग त्यातला पाट ओळखत नेमका आपला गणपती शोधून काढायचा. त्याला निरखत तिथंच घुटमळत राहायचं काहीवेळ क्यालेंडरवाल्या आणि ह्या पाटावरच्या गणपतीत अगदीच किंचित साम्य. तेही आपल्या समाधानाखातर…
आंजर्लेकर काका – ‘मग बनवली की नाय तुझ्या मनासारखी. त्या क्यालेंडरवरच्या गणपतीला मागं काढील अशी मूर्ती हाय का नाय बोल?
’डोंबल. आमच्या चेहऱ्यावरचे बारा वाजलेले पाहून,’अरे अजून काम बाकी हाय पुढच्या रविवारी ये तेवा रंगवायला घेणार हाय’- काका.
मी- ‘अहो फक्त २० दिवस राहिलेत. लवकर करा जरा.’ त्यावर ते,’ अरे बाबा तुझ्यापेक्षा आम्हाला लय काळजी हाय. चला निघा आता.’
पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही. अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनचं सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची. काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय, पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता. आंजर्लेकर काका पार वैतागायचे. पण मग, लावतो बाबा. धीर धर. नायतर एक कर; हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे. खरंतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा. पण यात भारी गंमत होती.
मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेव्हा आंजर्लेकर कांकानी विचारलं, ‘काय मग आता मोबाईलमधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी?’ त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला. त्या आठवणी, ते दिवस होतेच वेगळे. तेव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही. त्यातही कधी तेव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचूप साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायचं. एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागून पताका, नक्षत्र, माळा लावीत आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा, पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाही मुहूर्त गाठता येत नाही. लहान भाऊ लवेश बाबांच्या मदतीनं सगळी आरास करतो. तशी त्याची हौस अजूनही तितकीच दांडगी आहे. म्हणून कुठं आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याचं भाग्य लाभतंय! नाहीतर आमच्या काळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल.मी मुंबईत आलो त्या २००४ ह्या मुंबईतल्या पहिल्याच वर्षी मला गावी गणपतीसाठी जाता आलं नाही. चाळीत शेजारीपाजारी गणपतीची तयारी चालू होती. म्हणजे चाळीतल्या १८०च्या एरियात कसा काय गणपती बसवत असतील याचं फारच कुतूहल होतं मला. कारण गावी माजघर, ओटी, पडवी इतकी जागाही कमी पडत असे आम्हाला, पै पाहुण्यांची गैरसोय नको म्हणून पडवीतली सगळी अडगळ काढून तिला मोकळं केलं जाई आणि इथं लोक इतकुश्या जागेत गणपती त्याचं डेकोरेशन, आरत्या, जेवणावळी सगळं सगळं निभावून नेत. पण मुंबईतले सार्वजनिक गणपती मात्र भव्यदिव्य आरासात असतात हे गावी असतांना अनेकदा टीव्हीवरल्या बातम्यात पाहिलं होतं. गणेश गल्लीचा गणपती, लालबागचा राजा, तेजुकायचा महाराजा वगैरेवगैरे. नुसते ऐकून होतो म्हटलं यंदा गावी नाही जाता येणार तर किमान इथले हे सगळे गणपती बघून घेऊ. म्हणून बाहेर पडलो तर जिथे तिथे गर्दीच्या कचाट्यात सापडल्याने आणिक गणपती बघण्याचा उत्साह पार चेंगरून गेला. असं घुसमटत गर्दीतून बाहेर पडण्याची तितकीशी अजून सवय नव्हती म्हणून अगदीच नको वाटलं अजून पुढे जाणं आणि पुन्हा घरी परताव लागलं. गावाहून तसाही रोज फोन येत होता. उद्या गौरी येतील. परवा अमुक वाजता ओवसा, विसर्जनला यंदा राजन दादाच्या गाडीत आपला गणपती न्ह्यायचं ठरलंय असले सगळे उपडेट ऐकून रडूच कोसळे. कारण इतक्या वर्षात कधी गणपती चुकला नव्हता. इथं मुंबईत असून सगळं लक्ष मात्र गावाकडे लागलेलं. पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही. अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनचं सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची. काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय, पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता. इत्यादी इत्यादी. आंजर्लेकर काका पार वैतागायचे. पण मग, लावतो बाबा. धीर धर. नायतर एक कर; हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे. खरंतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा. पण यात भारी गंमत होती.मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेव्हा आंजर्लेकर कांकानी विचारलं, ‘काय मग आता मोबाईलमधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी?’ त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला. त्या आठवणी, ते दिवस होतेच वेगळे. तेव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही. त्यातही कधी तेव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचूप साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायचं. एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागून पताका, नक्षत्र, माळा लावीत आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा, पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाही मुहूर्त गाठता येत नाही. लहान भाऊ लवेश बाबांच्या मदतीनं सगळी आरास करतो. तशी त्याची हौस अजूनही तितकीच दांडगी आहे. म्हणून कुठं आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याचं भाग्य लाभतंय! नाहीतर आमच्या काळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल.मी मुंबईत आलो त्या २००४ ह्या मुंबईतल्या पहिल्याच वर्षी मला गावी गणपतीसाठी जाता आलं नाही.
चाळीत शेजारीपाजारी गणपतीची तयारी चालू होती. म्हणजे चाळीतल्या १८०च्या एरियात कसा काय गणपती बसवत असतील याचं फारच कुतूहल होतं मला. कारण गावी माजघर, ओटी, पडवी इतकी जागाही कमी पडत असे आम्हाला, पै पाहुण्यांची गैरसोय नको म्हणून पडवीतली सगळी अडगळ काढून तिला मोकळं केलं जाई आणि इथं लोक इतकुश्या जागेत गणपती त्याचं डेकोरेशन, आरत्या, जेवणावळी सगळं सगळं निभावून नेत. पण मुंबईतले सार्वजनिक गणपती मात्र भव्यदिव्य आरासात असतात हे गावी असतांना अनेकदा टीव्हीवरल्या बातम्यात पाहिलं होतं. गणेश गल्लीचा गणपती, लालबागचा राजा, तेजुकायचा महाराजा वगैरेवगैरे. नुसते ऐकून होतो म्हटलं यंदा गावी नाही जाता येणार तर किमान इथले हे सगळे गणपती बघून घेऊ. म्हणून बाहेर पडलो तर जिथे तिथे गर्दीच्या कचाट्यात सापडल्याने आणिक गणपती बघण्याचा उत्साह पार चेंगरून गेला.
असं घुसमटत गर्दीतून बाहेर पडण्याची तितकीशी अजून सवय नव्हती म्हणून अगदीच नको वाटलं अजून पुढे जाणं आणि पुन्हा घरी परताव लागलं. गावाहून तसाही रोज फोन येत होता. उद्या गौरी येतील. परवा अमुक वाजता ओवसा, विसर्जनला यंदा राजन दादाच्या गाडीत आपला गणपती न्ह्यायचं ठरलंय असले सगळे उपडेट ऐकून रडूच कोसळे. कारण इतक्या वर्षात कधी गणपती चुकला नव्हता. इथं मुंबईत असून सगळं लक्ष मात्र गावाकडे लागलेलं. तसं मुंबईत येऊन अगदी दोन चार वर्ष दोन्हीकडचा गणेशोत्सव साजरा करता आला. म्हणजे गावी ५ दिवसाचे गणपती गेले की, पुढचे बाकी दिवस मग मुंबईतले गणपती. लालबाग, परळचे मित्र आता जिगरी दोस्त झालेले. ते जिथे कार्यकर्ते म्हणून असंत तिथल्या गणपतीच दर्शन आपल्याला अगदी डायरेक. मध्यरात्री ते पहाटेपर्यंत आम्ही ह्या गणपतींच्या दर्शनात घालवत असू. तसे सगळेच हौशी होते ग्रुप मध्ये. पण मग कालांतराने आम्ही आपल्या आपल्या कामात अधिक गुंतत गेलो आणि मग ह्या सगळ्या अशा भटक्या गोष्टी बंद होत गेल्या. शिवाय पूर्वी ह्या सगळ्या ठिकाणी एक आपलेपणा होता. अगदी लालबागच्या राजाच्या दरबारीही धक्काबुक्की वगैरे असले प्रकार नसत.
पण हळूहळू चित्र बदलंत गेलं. जेव्हा ह्या २४ तास चालणाऱ्या वृत्त वाहिन्या सुरु झाल्या त्यानंतर तर मुंबईतल्या सगळ्याच उत्सवांना अधिक जास्त प्रमाणात कमर्शियल स्वरूप येत गेलं. त्यातही १० थराच्या दहीहंड्या, गरबे, गुढी पाडव्याच्या मिरवणुका, यांनी अमाप प्रसिद्धी खेचलीय. त्याचे यथासांग परिणाम आपण सध्या पाहतोच आहोत. म्हणजे आपण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई सबर्बमधून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांचं कुतूहल करीत होतो. आता तर लोक परदेशातूनही नवस फेडायला येण्याच्या ब्रेकिंग न्यूज गेल्याच वर्षी जुन्या झाल्यात. सातत्याने बदल होणार आणि त्यात आणिक नवे लोक येत राहणार हे आजच्या उत्सवाचं वास्तव आहे आणि हे नुसतं सार्वजनिक उत्सवाचं नाही, घरगुती उत्सवातही हीच तऱ्हा. म्हणजे हल्ली कुणालाच तसा मोकळा वेळ नसतो आणि म्हणून पूर्वी घरीच आरास करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. थर्माकॉलचे जे रेडिमेड मखर यायला लागले त्यांनी तर काम अधिक सोप्पं केलं. मुंबईतल्या अगदी छोट्या छोट्या घरातही नीट बसतील असले आरास बाजारात उपलब्ध आहेत. एकतर अवघ्या अर्धा एक तासात सजावट होते आणि मग इतर तयारीला माणूस मोकळा होतो. सध्या तर लोक मोदकही ऑर्डरनेच मागवतात. इतकंच काय, अगदी त्या दिवशी नैवेद्यात खासकरून केली जाणारी डाळींब्याच्या भाजी करिता लागणारी सोललेली भीजही आयती बाजारातून आणतात. चटण्या-लोणची तर हव्या त्या फ्लेवरची मार्केटमध्ये उपलब्ध आहेतच. बाकी अगदीच शास्त्र पाळणारे आणि काही हौशी लोक मात्र सकाळीच खोबरं खवणायला घेतात. डाळींबे सोलायला लहानग्या पोरांना बसवतात. घरातल्या गृहिणी सगळं साग्रसंगीत उरकतात. पण यात मोदकाचं पीठ मात्र रेडिमेडच आणलं जातं. तसं गावातही हल्ली कुणी मोदकाच्या पिठाचे तांदुळ धुऊन श्रवणातल्या खेळत्या उन्हात वाळवतांना दिसत नाहीत. कारण गावाखेड्यातली माणसही सध्या त्यांच्या त्यांच्या व्यापात व्यस्त झालीत. आता इतके सारे बदल काळानुरूप झालेत तर उत्सवांचा माहोल देखील बदलणं ओघाने आलंच. म्हणजे त्याकाळी गणपती जवळ आलाच म्हणूनचा जो काय उत्साह आणि लगबग असे, तो उत्साह आताशी अजिबात जाणवत नाही. रात्री रात्री जागून मखरांसाठीच्या बनवलेल्या प्रत्येक नक्षत्रमाळीच्या कळीत जितकं चैतन्य ओसंडून वाहे; तितका तजेला हल्ली ऑर्डर नुसार फ्लोरिस्टन पीटमॉस मध्ये खोवलेला देशी परदेशी फुलांमध्ये जाणवत नाही.
बदलतंय वैगेरेची ओरड आपण सहज करतोय पण हे सगळं आपल्याच लाइफस्टाईलनं बदलतंय हे मात्र आपल्याकडून जाणूनबुजून स्वीकारलं जात नाही. म्हणजे नऊवारी गेली आणि बाई गाऊनपर्यंत पोहचली म्हणजे फार मोठी उलथापालथ झाली असं म्हणत संस्कृती लयास गेल्याची ओरड करणं आणि त्यावर संस्था चालवणं हे काहीतरी करीत राहावं वाटतंय त्यांचे उद्योग आहेत. कारण हल्ली फॅशन किंवा ट्रेंड म्हणून का होईना सणासुदीत-लग्न समारंभात पारंपरिक पेहराव पुन्हा डोकं वर करू पाहतोय. म्हणजे आता गणपती उत्सवाचं म्हणाल तर शाडूच्या मूर्तींची विशेष मार्केटिंग केली जातेय. शिवाय इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं अव्हेरनेसही वाढत चाललंय. अत्यंत साध्या पद्धतीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करीत त्यातून उरणाऱ्या पैशातून समाजोपयोगी कामं करावीत हा वेगळा विचार आताशी कुठं लोकांना पटायला लागलाय पण याचं प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. जे येत्या काळात आणिक वाढत जाईल अशी आशा ठेवायला हरकत नाही.
खरंतर ह्या सगळ्या बदलांचं एक मोठ्ठं रिंगण आहे, ज्यात आपण एका ठिकाणाहून निघतो आणि भिरभिरून पुन्हा तिथेच परत येतो.कोण म्हणतं हल्ली सण-उत्सव कॅलेंडरमध्ये आहेत म्हणून साजरे होतातयत. खरंतर असा प्रश्न पडण्याइतपत वाईट वेळ आलेली नाही. कारण आजही लोक उत्सवाच्या निमित्ताने का होईना एकत्र येतात. रीत-भात वैगैरेत बदल होत आहेत पण ते आता जनरेशनच्या नव्या विचारांवर, शिवाय ज्याच्यात्याच्या समजुतीवर अवलंबून आहे. म्हणजे यंदा वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारीत बसण्यापेक्षा आणि फळाफुलांचे वाण लुटण्या पेक्षा किमान चार झाडं लावावीत, प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठा गणपती आणण्यापेक्षा शाडूची छोटी मूर्ती आणावी, घरातच बादलीत तिचं विसर्जन करावं, निर्माल्य सोसायटीच्या गार्डनमध्ये खड्डा करून त्यात जमा करीत त्याचं कंपोस्ट करावं हे सगळे आधुनिक काळातले बदल अजूनही लोक म्हणावे तसे स्वीकारत नाहीत. किंबहुना त्याबद्दलचा अव्हेरनेस आणि गांभीर्य यायला आणि काळ लागेल. शिवाय रूढी परंपरा, आपल्या धार्मिक समजुती यांचा प्रचंड मोठा पगडा आपल्या डोक्यावर बसला आहे तो इतक्या सहज उतरणं शक्य नाही. म्हणजे अगदी माझ्या घरातलं म्हणाल तर निर्माल्य नदीत टाकणं आम्ही बंद केलंय. शास्त्र म्हणून पाण्याला लावायचं म्हणून ताम्हणात पाणी घेऊन त्याला हे निर्माल्य लावीत मग ते थेट परस बागेच्या खड्डयात घातलं जातं. येत्या पुढच्या जनरेशनपर्यंत कदाचित गणपती घरगुती स्वरूपात विसर्जित केला जाईल असं वाटतंय. कारण अजून काही वर्षांनी परिस्थिती अधिक बदलेली असेल.
© संतोष टाकळे
http://www.rutugandha.com

