शेतात पेरलं आणि ते उगवलं नाही... जरी उगवलं तरी ते टिकलं नाही.... जरी टिकलं तरी ते विकलं नाही याची सल शेतकऱ्याशिवाय आणि कुणाला कळणार नाही .मराठीच्या पाठ्यपुस्तकात भास्कर चंदनशिव यांचा "लाल चिखल" नावाचा धडा आठवतोय का ? काल पासून सोशल नेटवर्किंग वरच्या पोस्टिंग्स मधून दिसणाऱ्या रक्ताळ पायांचे फोटो बघतांन हा धडा चंदनशिव यांनी आज लिहला असता तर त्यांना " रक्ताच चिखल " हे टायटल द्यावं लागलं असत बहुदा . पण हि सगळीच छायाचित्र मन हेलावून टाकणारी आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून तर ती वारंवार दाखवली जात आहेत .
पण अगदी genuinely अस वाटतंय हा मोर्चा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा आक्रोश असेल तर मग अन्य कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या काफिल्यात उभं करण्याची गरज नव्हती. जे काल पक्षाची स्ट्रिप गळ्यात घालून मोर्चेकऱ्यांना जेवण वाटत होते त्यांनी त्याचं सरकार असताना शेतकऱ्यांचं काय भलं केलं या प्रश्नाचं उत्तर छाती ठोक पणे आम्ही ह्या १० गोष्टी केल्या हे सांगण्याची हिम्मत आहे का त्यांच्यात मग आता सत्तेवर आहेत यांच्यात आणि ज्यांची सत्ता गेलीय त्यांच्यात काय फरक आहे . ते खुर्च्यांन वर बसले होते तेंव्हा हे शेतकऱ्यांच्या बाजूने आज हे सत्तेत आहेत तर पुन्हा पायउतार झालेले शेतकऱ्यांचे कैवारी .
अजब-गजब खेळ आहे हा . सत्ता, राजकारण , समित्या , शिष्टमंडळ वैगरेंच्या भोवती रिंगण घालणारा. नव्या नेत्यांना एक्स्पोज करणारा , मीडिया माध्यमांना पेलणारा, मायलेज, TRP ला बूस्ट करणारा . पण अखेर ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांची मात्र कायम फसवणूक करणारा.
यांना चल म्हटलं कि यांनी चालू व्हावं ,बस म्हटलं कि बसावं, उठ म्हटलं कि उठाव ,अगदी ठेचा लागून रक्तबंबाळ होई पर्यंत यांचं भान निघून जावं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्यांनी मोदी जॅकेटची कॅलर नीट करीत मीडियाला बाईट देत फेमस व्हावं.तिकडे सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत समिती नेमावी आणि मोर्चा पांगवून लावावा . हळूहळू मैदान मोकळं पडाव. माध्यमांच्या ओबी व्हॅन्सनी ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ व्हावं. २०० एक शे किलोमीटर चालत आलेले पुन्हा परतीच्या रस्त्याला लागावेत. पुढारपणा करणाऱ्यांनी त्यांच्या करियर मधला एक मोठा मोर्चा सक्सेस केला म्हणून आतल्या आत खुश व्हावं.
टिचलेल्या जखमा भरतील काहीदिवसात.पुढे सरकार त्यांच्या गठन केलेल्या समित्या जुन्या होत जातील. काही ठोस उपाय योजना करतील कि फक्त सरकारी यंत्रणेला अहवाल देत बसतील. कोण जाणे
पण हंगाम आला कि त्याला- तिला शेतात उभं राहावं लागेल
पुन्हा पेरण्याचा हिमतीनं आणि पुन्हा उगवेल या उमेदीनं.
© Santo

No comments:
Post a Comment