हल्ली गावागावात आणि शहरातही तसा सार्वजनिक सत्यनारायण पूजेत स्पीकर लावण्याचा ट्रेण्ड थोडा कमीच होत आलाय आणि घरगुती पूजेतही हल्ली कुणी स्पीकरवाल्याला बोलवत नाही. पण म्हणतात ना हौसेला मोल नाही. समोरच्या बिल्डिंग मधे वास्तू शांत आणिक पूजा आहे. तर आज सकाळी ८ वाजल्यापासूनच अजित कडकडे ,सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल ,आशा बाई अशी दिग्गज मंडळी संगीत सेवेत येऊन गेलीत आणि आता भटजींकडे माईक देत ही मंडळी काहीशी विसवलेत बहुतेक एकंदरीत इतक्या दिग्गजांचा अदब मोडू नये म्हणून की काय भटजीं चक्क साऊथ च्या मोस्ट पॉप्युलर मंत्रपुष्पांजली त्यांच्या लईत म्हणण्याचा अट्टाहास करता आहेत.फार गंमतीशीर वाटतंय ऐकायला पण या निमित्ताने मला आसूदच्या जोशी भटजींची आठवण झाली.
गावातल्या सार्वजनिक पूजेपासून ते लोकांच्या घरगुती किंवा लग्नी पूजा, वास्तू शांती, देवाची उद्देपने,लग्नाचे मुहुर्त सगळं सगळं जोशी भटजींच्या हाती. त्यांनी मुहूर्त काढावा आणि लोकांनी आपल्या पोरांना बोहल्यावर उभं कराव इतक त्यांच प्रस्थ त्यांनी म्हटलेला शब्द शेवटचा. त्यांना कुणी प्रश्न केला तर ते हे होईल किंवा हे होणार नाही. यापलीकड अमूक- तमूक उपाय वैगरे भानगड सांगत नसत .ते हाताच्या बोटांवर योग तपासत वयोमानानुसार त्यांना तेंव्हा तितकंसं फिरणं जमत नसे पण फक्त पैशासाठी नव्हे तर आपल्या माणसांसाठी पायमोड करतोय हे त्यांचं ठरलेलं उत्तर,त्यांची ती खाकी कापडी पिशवी पाठीवर मारली की निघाले . भिक्षुक्याने कार्य सिद्धीस नेण्यास तत्पर असलं पाहिजे. असा त्यांचा दंडक त्यामुळे त्यांना गावो गावी बोलावणी येत. कुण्या गरीबा घरी शिध्यात १०० रुपये दिसले तरी ते डाफरत बयो काय ग इतके पैसे, काय पैशाच झाडं बीड उगावलाय का परसावात तू आपले ५१ दे उगाच मला नको ती सवय लागायची.
लग्नात तर मुहूर्त घटिका पाण्यात बुडण्याआधी लग्न उरकण्याची त्यांची लगबग बघण्याजोगी. नीट उभा रहा रे आता यापुढे ताठ उभं राहावं लागेल संसारात म्हणत ते नवऱ्याच्या पाठीवर एक थाप मारत.अंतरपाटावर त्यांनी काढलेला काहीसा तिरका स्वस्तिक, त्यांच्या बटव्यातल्या पानांनी बनवलेले लग्न लागतांना दाढेत धरायचे जिऱ्याचे विडे, आणि मंगलाष्टकांसाठी माईक हातात घेतांना तो चेक करण्याकरिता त्यांनी मारलेली एक फुंकर क्षणात अक्खा मांडव बोहल्याकडे बघायला लागे तात्काळ आणि हातातल्या अक्षता चिमटीत घेत लगेच सावधान होई. मग जोशी भटजींची ... स्वस्ति श्री गणनायकम गजमुखं ... अशी त्यांच्या घोगऱ्या पण तरीही स्पष्ट उच्चरातली अष्टकांची सुरवात अंगावर काटा येई इतका प्रभावी होता त्यांचा आवाज. वयोमानानुसार त्यांच्या आवाजात आणिक थरथरलेपणा येत गेला. तरीही ते लग्न कार्यात पहिली एक मंगल अष्टक म्हणायला उभे रहायचे ओळखीच्या आणि सवईची माणसं सोडली तर बाकी लोक त्यांचा आवाज ऐकून हशा पिकवीत. शेवटी कालांतराने जोशी गुरुजींनी भिक्षुकी थांबवली पण आजही त्यांचा आवाज कानात घुमतोय इतकी लग्न , कित्येक सत्यनारायण , कईक वास्तूशांत्या ,हजारोंच्या जन्मकुंडल्या ज्यांच्या हातांनी घडल्या त्यांनी मात्र आयुष्यभर सात्विकीपणा जपला श्रीमंताघरी जशा विधी अगदी तशाच गोरगरिबाच्या घरातही कुठेही झुकतेपणा नाही. किंवा कुठेही दक्षिणेचा वरखालीपणा नाही . सत्यनारायण घालतांना त्यांनी सांगितलेली साधुवाण्याची गोष्ट आजही आठवतेय सगळं कस अगदी सरळ आणि साधं , हल्ली नुसती वास्तुशांत म्हटली तरी पाच भटजी लागतात मग त्यांच्या त्या तांदळाच्या रंगीत रांगोळ्या, नक्षत्र पूजन वैगरे वैगेरे . दापोलीतल्या घराची वास्तुशांत एकट्या जोशी भटजींनी केली. काय विशेष त्यात ते म्हणत ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग काहींना सत्यनारायण घालूनही फळ मिळत नाही काहींना हे सगळं न करताच उदंड मिळत त्यामुळे मुळात वृत्ती निर्मळ हवी नुसत्या भौतिक संपत्तीचा काय भरोसा.
लग्नात तर मुहूर्त घटिका पाण्यात बुडण्याआधी लग्न उरकण्याची त्यांची लगबग बघण्याजोगी. नीट उभा रहा रे आता यापुढे ताठ उभं राहावं लागेल संसारात म्हणत ते नवऱ्याच्या पाठीवर एक थाप मारत.अंतरपाटावर त्यांनी काढलेला काहीसा तिरका स्वस्तिक, त्यांच्या बटव्यातल्या पानांनी बनवलेले लग्न लागतांना दाढेत धरायचे जिऱ्याचे विडे, आणि मंगलाष्टकांसाठी माईक हातात घेतांना तो चेक करण्याकरिता त्यांनी मारलेली एक फुंकर क्षणात अक्खा मांडव बोहल्याकडे बघायला लागे तात्काळ आणि हातातल्या अक्षता चिमटीत घेत लगेच सावधान होई. मग जोशी भटजींची ... स्वस्ति श्री गणनायकम गजमुखं ... अशी त्यांच्या घोगऱ्या पण तरीही स्पष्ट उच्चरातली अष्टकांची सुरवात अंगावर काटा येई इतका प्रभावी होता त्यांचा आवाज. वयोमानानुसार त्यांच्या आवाजात आणिक थरथरलेपणा येत गेला. तरीही ते लग्न कार्यात पहिली एक मंगल अष्टक म्हणायला उभे रहायचे ओळखीच्या आणि सवईची माणसं सोडली तर बाकी लोक त्यांचा आवाज ऐकून हशा पिकवीत. शेवटी कालांतराने जोशी गुरुजींनी भिक्षुकी थांबवली पण आजही त्यांचा आवाज कानात घुमतोय इतकी लग्न , कित्येक सत्यनारायण , कईक वास्तूशांत्या ,हजारोंच्या जन्मकुंडल्या ज्यांच्या हातांनी घडल्या त्यांनी मात्र आयुष्यभर सात्विकीपणा जपला श्रीमंताघरी जशा विधी अगदी तशाच गोरगरिबाच्या घरातही कुठेही झुकतेपणा नाही. किंवा कुठेही दक्षिणेचा वरखालीपणा नाही . सत्यनारायण घालतांना त्यांनी सांगितलेली साधुवाण्याची गोष्ट आजही आठवतेय सगळं कस अगदी सरळ आणि साधं , हल्ली नुसती वास्तुशांत म्हटली तरी पाच भटजी लागतात मग त्यांच्या त्या तांदळाच्या रंगीत रांगोळ्या, नक्षत्र पूजन वैगरे वैगेरे . दापोलीतल्या घराची वास्तुशांत एकट्या जोशी भटजींनी केली. काय विशेष त्यात ते म्हणत ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग काहींना सत्यनारायण घालूनही फळ मिळत नाही काहींना हे सगळं न करताच उदंड मिळत त्यामुळे मुळात वृत्ती निर्मळ हवी नुसत्या भौतिक संपत्तीचा काय भरोसा.
फार कमर्शियल झालाय हल्ली सगळं म्हणजे आजचाच प्रकार ते हेलकाव्यातली साऊथची मंत्रपुष्पांजली वैगेरे वैगेरे . पण तेंव्हा साइड A आणि साइड B कॅसेट मधल्या त्या प्रल्हाद शिंदेच्या आवाजातलं ते ऐक सत्यनारायणाची कथा , आता तरी देवा मला पावशील का ? , नुसतं कानावर पडलं तरी आम्ही विचारायचो आई कुणाकडं पूजा आहे . दुपारी तिकडंच यायचं का जेवायला , किती वाजता आटपेल पूजा ,मी शाळेतनं आलो कि लगेच येऊ ना ? आणि आपल्या जास्वदीं वरची फुल घेऊन जा जाशील तेंव्हा आज खूप फुलली आहेत . इतका उत्साह असायचा त्यावेळी कुणाच्याही शुभ कार्यात. पण हल्ली चार घरं सोडून सत्यनारायण असेल तरी आपला तो चुकतोच खूपवेळा . असो त्या निमित्ताने मागे गेलेले दिवस पुन्हा पुढे आले आणि उग्गाच चिकटून बसले काहीकाळ तीर्थ घेतल्यानंतरही किंचित पंचामृत कस लागून राहत तळहाताला अगदी तसच.
©संतोष टाकळे
फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा - क्रेडिट Samography

No comments:
Post a Comment