सवाई.....!



सवाईतल्या रिदम न अनेक विसस्मरणात गेलेल्या सुरांचा शोध घेतला आणि खुपस पुन्हा आठवतं झाल. जगण्याच्या लयीत जर कधी वर खाली झालच आणि आपण ते जाणवू दिल नाही तरी ते लोकांच्या लक्षात येतच.शिवाय तुम्ही जर जास्ती अपेक्षित असलात तर मग अधिकच्या तपासण्या ठरलेल्या
खरतर बंदिश लाजवाब व्हावी म्हणून लागलेला सुर जितका आकंठ जपला जातो .तितक जगण लावून धरण म्हणजे अनेक टप्यानवर तुमचा कस लागणच असत म्हणा .कारण इथ पेटी- तबला- सितार रागाच्या स्वरांशी सेट करता येत असल तरी जगण्याच्या चौकटीत अनपेक्षित आलापांची सांगड लायीत बसवण दुर्मिळ .
तब्बल पाच वर्षानी सवाई ऐकता आला सोबत पालकर .....त्यांच्या इतकेच त्यांचे असामी मित्र आणि जिप्सी कार मंदार भालेराव यांचा पाहुणचार ,गुड़ लकचा ईरानी चहा , आणि पुन्हा पुणे मुंबईचा शिवनेरी प्रवास ......म्हणजे आता उद्या पासून परत तेच प्रयोग सुरु जिथे आवरण- उरकण- आटोपण- 
याची तालीम करावी लागत नाही


http://epaper3.esakal.com/…/No…/Mumbai/MumbaiToday/page6.htm

मावशी काय हाय काय ................ !








मावशी काय हाय काय म्हणत तीन दारतून आत डोकावल आणि तिच्या हातातल्या प्लास्टिक पिशवीतल्या भातावरच्या बूंदीच्या लाड़वाकड़ नजर गेली . नेमकी जेवताना आलीस बाय अस अजुन थोड़ अधिक कमी ऐकवत ताईमाँ न दुपारच्या दोन चपात्या वर आताची ताजी मेथिची भाजी दिली तरी ती घुटमळत तिथच उभी अजुन काय पाहिजे बाय आता...... तिन पापड़ा कड़ बोट दाखवत पुन्हा आर्जवि चेहरा केला. एक आख्या तूकड़ा घेतलांन तेव्हा कुठ ती गेली.
पण तिच्या पिशवीतला लाडू मात्र काही काळ माग घेवून गेला .
हेच ते दिवस कडाक्याची थंडी .....शाळेतन आल दप्तर टाकल की थेट मळ्यात ..... मुळा- माठ -पालक - कोथिंबीरिच्या जुड़या बांधायच्या पाटातल्या व्हावत्या पाण्यात त्या स्वछ धुवायच्या आणि हारा भरायचा अगदी काठोकाठ .....मग सकाळी आई चारला उठून पाणी तापवायची इतक्या हुडहुडनाऱ्या थंडीत अंगावर पाणी घेण म्हणजे काय ते ज्याच त्याला माहित ........बाकि सगळ उरकेपर्यंत वैलावरचा चहा उफाळून यायचा मग डायरेक बशीत त्यांचे दोन चार भुरके मारले आणि मग गरम स्वेटर चढवला की चिंबुळ नीट बरोबर ठेवत हारा डोक्यावर घ्यायचा . आणि मग हातात सकळच्या काळोखात मोकाट कुत्र्याना हटकायला काठी घेत पायात चपला सारित अंधारातल्या रास्त्यान दापोलिच्या दिशेनं लगबगिने पावल टाकित उजाडायच्या सुमारास भाजी घ्या भाजी ची कमर्शियल advt सुरु करायची.बऱ्याचजणी तर आईचा आवाज ऐकूनच गलका करायच्या कुणी नुसतीच् भाजी उलटी पलटी करी घ्यायच तर काय नाव नाय पण उग्गाच भाव करायच्या ....तर उलट एखादी बाई एकदम चार चार जुड़या घेई. आशाना मग आई करंट स्पॉट ऑफर म्हणून कधी अजुन एक जुडी अशीच फुकट देई तर कधी तिच्या नेहमीच्या गिराईकाची स्पेशल रिक्वेस्ट म्हणून आणलेल्या बचकी भर घोळीच्या ढिऱ्यांचे -केळफुलाचे........वाटिभर साजुक तुपाचे ......डबाभर दह्याचे ती कधी पैसे घेत नसे ......अशा खास घावुक आणि फिक्स गिर्याइकाकडे मग आम्हाला चहा ठररेला सोबत खारी, टोस्ट ,बिस्किट आणि गोड धोड .....अस बरच काही ........पण खायला तितका वेळ नासायचा कारण खात बसलो तर दूसरा भाजी वाला पुढ़ जायचा आणि आज काय वाहिनी येत नाहीत म्हणून ठरलेले गीराहाईक पण त्याची टोपली खाली करायचा म्हणून मग नुसता चहा पोटात ढकलून बाकि सगळ पिशवीत जमा करीत आधी माल संपवायचा आणि मग उन्ह थोड़ी सरळ पडलित की घरी आल्या आल्या मागच्या दारात पिशवी पालथी घालायची ....जे असेल त्याच्या चार वाटण्या व्ह्ययच्या मघाशी मागायला आलेल्या त्या पोरिच्या पिशविताला लाडवा सारखा लाडूही या पिशवीत यायचा अनेकदा आणि मग त्याचा अधिक हिस्सा मिळावा म्हणून त्याचे तूकड़े पाड़ताना आपला भाग जास्ती पडेल याची केलेली हेराफेरी आजही आठवते आहे .


मघाशी तिच्या पीशवितल्या भातात अड़कलेला तो लाडू एव्हाना वाटून खावुनही झाला असेल पण त्याच्या त्याच बूंदीच्या बांधणीत घट्ट वळून ठेवलेल्या आठवणी आज पुन्हा मोकळ्या झाल्या आणि त्या दिवसांची ती अविट गोडी पुन्हा मनात घोळत राहिली कितीतरी वेळ ........... सध्या सुखवस्तु घरात खावुचे डबे तुडुंब भरलेले असतांना आणि आज हवी ती मिठाई घेता येण्याची परिस्थिती असतांनाही त्या एक तूकडा लाड़वाची किंमत मात्र कधीच अवाक्यात न येणारीच.

© Santo 

तुळशीच लग्न........!






पूर्वी तुळशीच लग्न लागल की मग माणसांच्या लग्नाचे मुहूर्त निघत पण हल्ली वर्षभर लग्न होत असतात तरीही आजही एकादशी नंतर गावात तुळशीच लग्न साग्रसंगीत लावल जात .....आंब्याच्या काटक्या बांधून बनवलेल्या नवरा- नव्हारीच्या बाहुल्या त्याला रुईच्या पानावर काजळाने डोळे चेहरा रेखाटून काढलेला मुखवटा .... रुई चाफ्याच्या फुलांच्या मुंडावळ्या .......आणि मग रात्रभर हळदीच्या पाण्यात भीजत ठेवलेल्या वस्त्रांनी गुंडाळुन तयार झालेले बाहुले तुळशीच्या मधोमध रोवून ......रुखवात म्हणून आवळे -चिंचा -बोरं- आणि इतर गोड- धोड पदार्ध मांडून गावातली माणस लग्न लावायला येईस्तोवर नविनच केलेल्या सारवलेल्या अंगणात डोंगर का पाणी..... विष अमृत .....संत्र का लिम्बु ....रा रा राम असले तेव्हाच खेळ खेळले जायचे .अखेर फिरता भटजी येई .अक्षदा वाटल्या जात .रितसर लग्न लावल जाई .शेवटच्या मंगल अष्टकेला शंभरची माळ लावत सोहळा पार पड़े .....भटजीही दक्षिणेचे दहा रुपये खिशात कोम्बत पुढच्या घरी जाई मागे मागे वाढत व्हराड पुन्हा त्याच्या मागून दुसऱ्या तुळशीच्या लग्नालाची अक्षदा घ्यायला नव्या अंगणात जमत .रात्री उशिरा पर्यंत ही लग्न लागत असत .आणि लोक अक्षदा टाकून टाकून दमत असत.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नवरा- नवरीला घराच्या छपरावर फेकण्याची प्रथा आहे.

आणि मग जो नवरा नव्हरी फेकल सुखवतीच्या आवळे चिंचा बोर हा सगळा माल त्याचा .शिवाय मामा म्हणून तुळशीत उभा केलेला काळा उसही त्याचाच 
यंदा हे सगळ आई -बाबां सोबत सुप्रिया ने केलय.
सो क्रेडिट गोज टु हर & ब्रो अमित .

© Santo 


भावनिक संध्याकाळ............!






आजची संध्याकाळ अतिशय भावनिक होती. भाच्या सोबत फटाके आणायला गेलो त्या दुकानात शाळेतले गुरूजी भेटले योगायोग म्हणजे ते दुकान त्यांचच होत. त्यांना नमस्कार केला तेंव्हा त्यांनी ओळखल नाही .गुरुजी मी टाकळे उदयनगर शाळेत होतो.आता वय झालय रे तरीही आठवतोयस तू टाकळ्या ......काय करतोस वैगरे चौकशी झाली आणि मग फटाके घेतले दहा बारा आयटम जमा करत हे द्या म्हटल्यावर त्यांनी यादी केली

 एका कोपऱ्या कागदावर त्यांची आंकड़े मोड़ सुरु झाली .अगदी तशीच जशी वर्गात गणित शीकवत असतांनाची असायची तशी आणि मग लमसम आकड़ा शेवटी मांडत त्यांनी पावती समोर धरली म्हणाले बघ बरोबर आहे ना तपासून घे ........गुरूजी अहो अंकलिपी तुम्हीच शिकवलित मला आता मी तुमची बेरीज कशी तपासू…...ती अचूक असणारच ....तेंव्हा गुरुजीनी जवळ घेतल आणि म्हणाले तू काय बोलायला ऐकणार नाहीस अतिशय आनंद होतोय मला तुला भेटून हे घे अजुन एक फटाक्यांची माळ माझ्याकुडून तुला...... कधीकाळी गणितं चुकली म्हणून पाठीत धपाटा घालणारे .तलाठी गुरूजी आज हळवे झाले होते. बदडवून काढ़णारे तेच हात आज मायेने पाठीवरून फिरत होते. कित्येक वर्षानी पुन्हा शाळेत गेल्यागत वाटत होतं कारण तलाठी गुरुजीनी कितीही मारल झोडलं तरी शाळा सुटायच्या आधी ते बोलवून जवळ घेत समजुत काढत म्हणत शिकलास तर आयुष्यात काहीतरी चांगल करता येईल आणि शिवाय नोकरी धंदा मिळेल नाहीतर अडाणी राशील तर आयुष्य खूप खडतर आहे रे तु नीट अभ्यास केलास तर गद्यड्या मग मला हात उचलावा लागणार नाही.जा उद्या येतांना आजच काय शिकवलंय त्याची उजळणी करून ये. 

माघाशी निघता निघता त्यांनी पुन्हा पाठीत धपाटा घातला आणि म्हणाले टाकळ्या . खुप मोठा हो अगदी आम्हाला तुला भेटायला ताटकळत उभ राहाव लागेल इतका .........आणि पुन्हा त्यांचे डोळे पाणावले गुरूजी कितीही मोठ व्ह्ययच स्वप्न असल तरी तुम्हाला माझी वाट बघावी लागेल इतकं मोठ् नाही व्हायचय मला.



© Santo