
कोकणात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडतोय सकाळी बाबांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री पासूनचा पाऊस चांगला टिकून आहे . शेतात गुडघाभर पाणी साचून खलाटी( भातशेती जमीन ) तुडुंब भरली आहे . राज्यात अनेक ठिकाणी म्हणावा तसा पाऊस नसतांना कोकणात मात्र सालाबाद प्रमाणे पावसाची खास मर्जी दिसते आहे . दरवर्षी इतका पाऊस असतांनाही गेल्या ५ -६ वर्षांपासून दापोलीत उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असत .लग्न समारंभात अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतं .याउपर यंदा तर दापोलीच्या आपल्या विहिरीतल्या पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवण्या साठी चक्क कंपाउंडला टाळ लावावं लागलं अर्थात इतक्या वर्षात हे कधी करावं लागलं नाही म्हणून हा प्रकार क्लेशदायक होता . आईला म्हटलं काढ टाळ लोक पिण्यासाठी पाणी न्यायला आपल्या दारात येत असतांना आपण त्यांना पाणी नाकारणं योग्य नाही . अर्थात लोकही तळ गाठलेल्या विहिरीतलं पाणी बेतानं काढत नाहीत आणि त्यानं गाळ उसळून सगळंच पाणी गढूळ होतं हा तिचा आक्षेप रास्त होता.
मुळात लोकवस्ती वाढते आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोकं दापोलीत नोकरी धंद्या निमित्त येतात आणि इथंच स्थायिक होतात. मिळेल तिथे जागा घेऊन घर बांधली जातायत . डोंगर च्या डोंगर लोकांनी पोखरून त्यात इमले बांधले आहेत. शिवाय पाण्यासाठी जो तो विहारी खणतोय बोर मारतोय पाण्याचं विभाजन त्या त्या नुसार होणं नैसर्गिक आहे . पण सोबतच पाण्याचं नियोजन करण्याचं गांभीर्य मात्र इथल्या शिकल्या सावरल्या लोकांत नाही . त्यामुळं" निसर्ग देतोय आणि गटारात जातंय " असली इथली अवस्था .
शोष खड्डे , Rainwater Harvesting, पावसाच्या पाण्याचे संधारण,जुन्या विहिरींचे पुनर्जिवन , गावातल्या नदी नाल्यांवरचे बंधारे मेंटेन करणं त्यात होणारं प्रदूषण थांबवणं , सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांची क्षमता वाढावी म्हणून त्यातला गाळ काढणं त्यांची खोली वाढवणं हे प्रशासनाचं प्रायोरिटी वर्क आहे .जे आजही फक्त formality म्हणून केलं जातं, अशा अनेक गोष्टी करण्यालायक आहेत आणि त्या येत्या काळात अतिआवश्यक होणार आहेत . उन्हाळ्यात स्वतःचा ब्यानर लावत टँकर फिरवणाऱ्या नगरसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि अगदी आमदारांनी देखील टँकर मुक्त मतदार संघ ही नवीन योजना हाती घेण्याच सिरियसली मनावर घ्यायला हवय.
पिण्याच्या पाण्याला टाळ लावण्याची वेळ आली तरी आपण अलर्ट होणार नसलो तर पुढे पाण्यासाठीची वणवण अटळ आहे .
जिथं मिळतंय तिथं जिरवलं आणि वर्षभर पुरवल कि साठलेल्यात वाढ होईल. नाहीतर कोकण सुद्धा एकदिवस ओसाड होईल.
*फोटो सौजन्य - गुगल
मुळात लोकवस्ती वाढते आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोकं दापोलीत नोकरी धंद्या निमित्त येतात आणि इथंच स्थायिक होतात. मिळेल तिथे जागा घेऊन घर बांधली जातायत . डोंगर च्या डोंगर लोकांनी पोखरून त्यात इमले बांधले आहेत. शिवाय पाण्यासाठी जो तो विहारी खणतोय बोर मारतोय पाण्याचं विभाजन त्या त्या नुसार होणं नैसर्गिक आहे . पण सोबतच पाण्याचं नियोजन करण्याचं गांभीर्य मात्र इथल्या शिकल्या सावरल्या लोकांत नाही . त्यामुळं" निसर्ग देतोय आणि गटारात जातंय " असली इथली अवस्था .
शोष खड्डे , Rainwater Harvesting, पावसाच्या पाण्याचे संधारण,जुन्या विहिरींचे पुनर्जिवन , गावातल्या नदी नाल्यांवरचे बंधारे मेंटेन करणं त्यात होणारं प्रदूषण थांबवणं , सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांची क्षमता वाढावी म्हणून त्यातला गाळ काढणं त्यांची खोली वाढवणं हे प्रशासनाचं प्रायोरिटी वर्क आहे .जे आजही फक्त formality म्हणून केलं जातं, अशा अनेक गोष्टी करण्यालायक आहेत आणि त्या येत्या काळात अतिआवश्यक होणार आहेत . उन्हाळ्यात स्वतःचा ब्यानर लावत टँकर फिरवणाऱ्या नगरसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि अगदी आमदारांनी देखील टँकर मुक्त मतदार संघ ही नवीन योजना हाती घेण्याच सिरियसली मनावर घ्यायला हवय.
पिण्याच्या पाण्याला टाळ लावण्याची वेळ आली तरी आपण अलर्ट होणार नसलो तर पुढे पाण्यासाठीची वणवण अटळ आहे .
जिथं मिळतंय तिथं जिरवलं आणि वर्षभर पुरवल कि साठलेल्यात वाढ होईल. नाहीतर कोकण सुद्धा एकदिवस ओसाड होईल.
*फोटो सौजन्य - गुगल
© Santo
No comments:
Post a Comment