महाराजांचा प्रभाव ...................!



काल एका महाराजांच्या दर्शनार्थ भगव्या साड्या परिधान केलेल्या मध्यम वयीन महिलांचा मोठ्ठा जत्था पाहिला रात्रीचे १० सव्वा १० वाजले असतील.  सकाळी ऑफिसला जाताना देखील हि रांग गच्च भरलेली होती. तरुण मुल -मुली- लहान पोरं - बापे बाया असा हरएक वयातला भाविक बाबांच्या चरणस्पर्शच्या आशीर्वादासाठी ताटकळत असतांना दिसला यातले काही महाराजांच्या नावाने जयघोष करीत होते . तरुण कार्यकर्ते (मुली - भगव्या सलवार कमीज ...) मुलं - भडक भगवा शर्ट /कुर्ता / टी शर्ट ) त्यावर महाराजांचा फोटो असलेला ब्याच कपाळी केशरी टिळा गळ्यात लखलखती पांढऱ्या मण्यांची माळ असा सात्विक पेहराव करून भाविकांना कंट्रोल करण्याचं काम करतांना दिसलीत. या प्रत्येकाच्या हातात विभागवार भक्तांच्या याद्या होत्या. आता विक्रोळी मंडळ जाईल , त्यापाठोपाठ मालाड मंडळ मग वडाळा ,आणि मग कळवा मंडळ ……………… नंबर जवळ आलेल्या मंडळांची चुळबुळ वाढे यात नवीन आलेल्या साधकाला जुना साधक दर्शनाचे नियम पुन्हा पुन्हा समजावून सांगे तिथ गेल्यावर अस कर ………तस कर………… हे करू नको ………. इत्यादी इत्यादी ………………
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात माणूस अशा बाबांच्या प्रभावात नक्की काय शोधतोय ? …………… जिवंत बाबाच्या पादुका आणून त्या पूजेला लावणं ………………त्या कुण्या तरुण स्वयंघोषित मां ला उचलून घेण्यासाठी बोली लागणं ………….शिन्दुराच्या डब्या …………पुस्तकं ………….फोटो ………. लॉकेट ………दोरे ………….मानाच्या पूजा …………या उलाढालीतून मग महारांजाना चांदींच सिंहासन ……………विमान प्रवास ………….प्रसंगी private jet ची सोय ………….एकराच्या जागेत पसरलेले मठ ………………मर्जीतल्या भक्तांची चंगळ हे सगळं उघड असतांनाही बाबा बुवाच्या मागे पाळणाऱ्या अशा लोकांना पाहिलं कि वाटतं आजही आपल्या आयुष्यात जगण्याच्या विश्वासाची असुरक्षितता ठासून भरलीय…………प्रत्येकाला सुखाचं जगणं हवंय ………आपण परिस्थिती स्वीकारण्या पेक्षा तिच्या पासून लांब पाळण्याचे अनेक मार्ग शोधतो आहोत . 'मग मुलीचं लग्न ठरत नाही '………….'पोराला नोकरी नाही ' …………नवऱ्याची दारू …………जागा जमिनीचे वाद ………असाध्य आजार …………मानसिक तणाव …………या सगळ्यावर हे स्वयंभू बाबा लोक अध्यात्मिक उपायांची मलम पट्टी करीत मानसिक गुंता घालीत कधी अडकवतात हे कळतही नाही आणि तोवर आपण त्या गोतावळ्यात आपसूक मिसळतो . अनोळखी चेहरे ओळखीचे होतात . एव्हाना डोक्यात महाराजांची हवा काटोकाट भरलेली असते . एक वेगळाच हुरूप येतो . मरगळ निघून जाते . नामस्मरणाच्या एकाग्रतेने चेहऱ्यावर वेगळच तेज येत . आणि आत्मविश्वास अधिक प्रबळ होतो. पूर्वी अनेक प्रयत्नात ज्याला नोकरी मिळाली नाही त्याला आता एकाच मुलाखतीत जॉब मिळतो . जिच्या लग्नाची आशा जवळ जवळ सगळ्यांनी सोडलेली असते तिच्या यावेळच्या प्रयत्नात थेट साखरपुडाच ठरण्याचा चमत्कार होतो. बस्स महाराजांवरच्या श्रद्धेत आणिक वाढ होते. शेजारी -पाजारी - नातेवाईक गावा- शिवात त्यांची महती पसरते …………अडचणीत असलेले असे आणि काही जण या दिशेने आकर्षित होतात . साधना वाढत जाते . दरम्यान महाराज मठाधिपती होतात . पूर्वी डोक्यावर हात ठेवत पर्सनल आशीर्वाद देणाऱ्या महाराजांचं आता फक्त मुखदर्शन दिलं जातं . प्रस्थ - महाप्रस्थ होत ………………… उच्छाद वाढतो. अहंकार -गर्वाच्या लाटा उसळत असतात .एकेकाळच्या सच्या भक्तांमध्ये मतभेत होतात आणि एक ना एक दिवस याही महाराजांचा प्रभाव मावळतो ………….आणि मग पुन्हा नवे महाराज ……………….नवे साधक ………………. नवी भरभराट.
* भावना दुखावण्याचा मानस नाही
© Santo

महाराष्ट्र साहित्य परिषद........!

 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच निमंत्रण ……………दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर.......!

संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रम पञिका....

दि. २९ नोव्हेबर २०१४, वार- शनिवार....

सकाळी ९:०० ते ११:०० ग्रंथदिंडी.
सकाळी ११:००ते १:०० उद्घाटन.
उद्घाटक- मा.डाँ. नागनाथजी कोत्तापल्ले
संमेलनाध्यक्ष- मा.प्रा.अशोकजी बागवे.

दुपारी १:००ते ३:०० मध्यंतर व भोजन.
३:०० ते४:०० पुस्तकांचा प्रकाशन सोहळा.
सांय.४:००ते५:०० 'सागरगाज' कविसंमेलन.
सहभाग- संतोष टाकळे, ममता विचारे, अशोक पाटील व इतर.

सांय.५:००ते ६:०० 'आईच्या कविता'
सादरकर्ते- कवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई)
राञी.७:०० नंतर 'कोकणची लोकपरंपरा'
हा सांस्कृतिक कार्यक्रम.

दि. ३० नोव्हेंबर २०१४ वार- रविवार.

९:००ते१०:३० पाट्यपुस्तकातील कवी,लेखक
विद्यार्थ्यांच्या भेटीला.
१०:३० ते ११:३०, 'परिसंवाद'- गुहागरचा
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा'
मा. महेश तेंडूलकर, (पुणे)
मा. भालचंद्र दिवाडकर,(संपादक, दै. सागर)
मा. प्रकाश देशपांडे (चिपळून)
मा.प्रा. रश्मी आडेकर (गुहागर)

११:३०ते१२:३० मा.श्री. इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार- श्री.अरुण इंगवले.

१२:३० ते २:०० मध्यंतर व भोजन.
०२:०० ते ३:३० कथाकथन.
मा. श्रीराम दुर्गे, सञाध्यक्ष (चिपळून)
मा. डाँ. भास्कर बडे (लातूर)
मा. रुपाली अवचरे (पुणे)

३:३०ते ५:०० निमंञितांचे कविसंमेलन.
सांय. ५:०० नंतर समारोप...

गुहागरसारख्या निसर्गरम्य नगरीत होणाऱ्या साहित्य मेळ्यासाठी आपले स्वागत करण्यास इथले माड-पोफळी, सागर-सूरू उत्सूक आहेत...
स्थळ- भंडारी भवन परिसर, गुहागर.

श्री. राजेंद्र आरेकर- अध्यक्ष,
श्री. ईश्वरचंद्र हलगरे- कार्यवाह,
सर्व सन्माननीय सदस्य,
म.सा.प.शाखा- गुहागर, जि. रत्नागिरी.

बदलती दिवाळी ............!



रवा केतकरांच्या घरातून बेसन लाडवांचा" खमंग "प्यासेज मध्ये पसरला आणि दिवाळी आलीच इतक्यात याची आठवण आम्हा सुस्त शेजाऱ्यांना झाली. म्याडम बघा याला म्हणतात अस्सल फराळ………….नुसत्या वासाने मन तृप्त झालंय. ………………ग्राहक पेठेतला आयता माल खाणाऱ्या आपल्याला काय कळणार हे साजूकपण ……………दाराच सेन्ट्रल लॉक उघडत …………स्मिता - तू मदत करतोस का ? तर करूया यंदा फराळ माज्या एकटीने ते शक्य ...नाही . आणि साजूक नाजूक फराळ करणाऱया त्या केतकर वहिनी गृहिणी आहेत . आमच्या सारखं घर ऑफिस अशी कुतरओढ नाही त्यांना…………… शिवाय मिस्टर केतकर सरकारी बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे . सो त्यांची फराळाची लगबग असणारच ना ……………… आपल्याकडे कोण तू -मी आणि मीना मावशी …………आणि तसही मीना मावशी दिवाळीत सुट्टी घेतात गेल्या वर्षी त्यांना राखून ठेवलेला फराळ अखेर खराब झाला . मग चामुंडा वाल्याकडून मिठाई आणून दिली त्यांना ……………म्हणून नाही करत राजा फराळ ……………मला पण वाटतंच कि आपल्या घरातल्या किचन मधून चकली - शंकरपाळी - चिवडा - करंज्यांचा खमंग परसरावा अख्ख घर फराळाच्या तयारीत घमघमुन जावं………पण त्यासाठी घरात माणस असावी लागतात . सगळ्यांनी मिळून या लगबगीत उतरण्यात जी मज्जा आहे ती एकट्या दुकट्याने तडफडत सगळा घाट उरकण्यात नसते ना ……………तरीही अगदीच यंदाचा सण रिता नाही घालवणार कडक पोह्याचा चिवडा करते …………आणि थोड्याश्या बेडेकर भाजणीच्या चकल्या ……………बाकी लाडू बीडू …………सालाबाद प्रमाणे ग्राहक पेठेतुनच …………स्मिताच्या अशा नेहमीच्या समजूतदारपणामुळे बहुदा आमच्यात मतभेत झाले तरी ते फार काळ टिकत नाही.

साहेब यादी करायला घ्यायची का ? अग आत्ताचं किचन आवरून झालाय यादी काय करू कि उद्या …………उद्या परवा तेरवा अस ढकलीत दिवाळी उद्यावर येईल आणि आपली दिवाळी बाजारातच रहायची ते काही नाही आता घ्या लिहायला मी सांगते ……………एकूण दोन याद्या करा एक तुमची एक माझी …………दोन याद्या कशाला तू ऑफिस मधून निघालीस कि आपण दादरला भेटू आणि करू कि शॉपिंग ……………तुमच राहूद्या मला सांगाल १० मिनिटात पोहचतो आणि १ तासाने उगवाल शिवाय हे नको जरा महाग वाटतंय ………. पणत्या कशाला गेल्यावर्षीच्याच पुसून वापरता येतील …………………अनारसे इतके महाग असतांना १ किलो का घेतलेस असा वाद घालत दोन चार तास घालवत बसण्या पेक्षा तुम्ही फक्त पूजेचं समान आणा बाकी मी बघते काय आणायचं ते वाघमारे म्हणालीय तिला पण शॉपिंग करायचीय सो आम्हा बायकांमध्ये तुमची लुडबुड नको ……………वाण्याच्या यादीत मोती साबण आणि राम बंधू चिवडा मसाला लिहायला विसरू नका ………नाही तर अंघोळीला बसल्यावर आठवण यायची मोती साबण राहिला …………….आणि उटण पण लिहू ना …………….किचन मधून उत्तर आल. उटण नको हो हल्ली हरएक राजकीय पक्षवाले उटण्याची पाकिटं वाटतात. …………बरं तुला किती कॅश लागेल.कि कार्ड देऊ …………कार्डच द्या ते बरं पडतं पाकिटात नोटा घेऊन हल्ली कोण फिरतय ……………आणि हो तुम्हाला सागायचं राहीलच……यावेळी मीना मावशी सोबत तिच्या सुनेलापण एक साडी घेईन म्हणते तिचा दिवाळसण आहे . आणि मीना मावशी किती करते हो ह्या घरासाठी ………देण्या घेण्यात स्मिताला सगळीच नावाजतात तशी माणसं जोडलीत तिनं ……………………

दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत रोज संध्याकाळी घरी येतांना हातात दोन चार पिशव्या ठरलेल्या ज्या वस्तू घेवून झाल्यात त्यावर फुल्या करीत पुढच्या जिन्नसाची ठिकाणं ठरवीत दुसऱ्या दिवशीचा प्लान करीत करीत अखेर शॉपिंग संपते दिवाळीच्या पूर्व संध्येला लगबगीनं सगळ आवरीत त्यातल्या त्यात मांडा मांड करीत . पणत्या- रांगोळ्या दराच तोरणं खास फराळ द्यायला आणलेल्या प्लेट वाट्या …………सोप्याची कव्हरं ………बेडशिट …… उटण ……………दिवाळी पहाटच्या मुहूर्तावर करायच्या पूजेची तयारी अशा अनेक गोष्टींची तयारी करून पुन्हा सकाळी लवकर उठायला हवंच लहानपणा पासून अंधारल्या पहाटेच पहिली अंघोळ करायचा जुना रिवाज आजही टिकून आहे.

मुंबईतल्या बंद दाराच्या घरात विकतचा फराळ चाखताना मात्र राहून राहून गावी आईने केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले पितळी डबे डोळ्यासमोर उभे राहतात. याच दरम्यान कोकणात शेतीची कापणीच्या कामांची लगबग असे दिवसा शेतात राबूनही ती एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश ……………………… दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज मला एकूण ५ बहिणी त्याकाळात गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी. ………. यांस कडून ………यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. ………… काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.

रांगोळीत जितके जास्ती ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंहि अशाच असंख्य ठिपक्यांनी विभागालय ………………… गरज आहे. यांना जोडणाऱ्या नात्यांची आणि मैत्रीच्या अंधुक रेश्यांची ……………………बाकी रंग तर आपसूकच भरले जातील

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा ………… !

!! शुभ दिपावली !!

© संतोष टाकळे