गणेशउत्सवातली राजकीय "टगे" गिरी ………………!





मुळात गणेश उत्सवाला कुणाचाही विरोध नाही आणि पाकिस्थानमधेही कुण्या भक्तांनी गणपती बसवला तर त्यालाही हरकत नाहीच विषय आहे तो या दरम्यान होणाऱ्या अमर्याद खर्चाचा ……ओघळ प्रदर्शनाचा ………राजकीय हस्तक्षेपाचा …………आणि तब्बल १० दिवस यंत्रणावर येणारा अतिरिक्त ताण ………अशा अनेक गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे . "गल्ली गल्लीत बाप्पा आणि देणगीदार अण्णा आप्पा " या कॉन्सेप्ट खाली जी दरवर्षाला नवीन मंडळ रजिस्टर होता आहेत त्यांना आवर घालायला हवाय ……………एका एका विभागात ७-८ वेगवेगळे बाप्पा हवेत कशाला ……एकाच मंडळाच्या मंडपात आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येत श्री गणेशाची आराधना करण का नाही जमत आपल्याला ………असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येतात ……………मध्यंतरी" एक गाव एक गणपती" ह्या शासनाच्या उपक्रमाला अनेक गावांनी प्रतिसाद देत ती संकल्पना सत्यात उतरवून दाखवली कारण गावा -शिवात आजही हा उत्सव अध्यामिक आस्थेने आणि परम उत्साहाने साजरा केला जातो . शहरातल्या भंपक दिखावे गिरीचा आणि व्यावसायिकतेचा वायरस अजून खेड्या पाड्यात पोहचला नाहीये हे त्यातल्या त्यात चांगलं आहे . पण सध्या गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी मुंबई स्टाईल अमुक गावचा राजा वैगरेचा ट्रेंड एव्हाना सुरु झालाय आणि आता तालुक्याच्याहि रस्त्यांवर उंच च्या उंच व्यावसायिक गणेश विराजमान होऊ लागलेत . आणि ज्यांना मुंबईत येणं शक्य नाही अशांना आता तालुक्याच्या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध झाली आहे . अगदी प्रती शिर्डीच्या धर्तीवर हा नवा ट्रेंड जम धरू लागलाय . यात तिथल्या लोकल राजकीय पार्ट्या सक्रिय झाल्यात अर्थात या निमित्ताने त्यांनाही काही आर्थिक -राजकीय आणि पॉवर टेस्टिंगच्या अनुषंगाने चेक मेट करता येत . याच दरम्यान यंदाच्या हंगामात कोण उभ राहणार त्याचा मागमूस घेण्याचा हा उत्तम काळ समजला जातो . तालुक्याच्या मुख्य ठिकाणी १० दिवसाच्या या उत्सवातल्या  ……………गणपती एव्हढा मोठा ………तिथ लावलेली ८ फुटाची अगरबत्ती ………५० किलोचा लाडू ………….खऱ्या सोन्याचे मोदक वैगरे वैगरेची वाड्या खेड्यात चर्चा होते आणि खेड्यापाड्यातल्या लोकांची हे सारं बघण्यासाठी झुंबड उडते . हे सगळ उत्तम organized करणाऱ्या भाऊला ही रग्गड लोकप्रियता मिळते ते वेगळंच ……

या उलट इथ शहरात फक्त ११ दिवसात खोऱ्याने पैसा कमावणारी अतिश्रीमंत मंडळ आहेत यांच्याकडे नवसाच्या रांगा किलोमीटर च्या वर लांब लागतात .किलोच्या हिशोभात  सोन्याचेकरून चांदीच्या वस्तू दानपात्रात जमा होतात . AC मंडप ,पेड कार्यकर्ते , नेत्या - अभिनेत्या पासून ते शासकीय -प्रशासकीय बड्या हस्तींची इथली हजेरी ………….बाप्पा सोबतचा त्यांचा सेल्फी ………शाल चांदीची प्रतिकृती देत केलेला त्यांचा सत्कार ………….मिडिया पोज ………बाईट ………झेड प्लस सुरक्षा ………ब्ला …ब्ला मेनी VVIP कल्चरचा फील इथल्या सामान्य भक्ताच्या दर्शनात काही तासांनी विलंब करतो . but it's all fine after all this all personality's come along with glamour  ............ and that's why our BAPAA Always In media headline till the function going to END . गणेश उत्सवांच्या मागचं हे वास्तव विदारक आहे अनाठाई आहे . मुळात अशाने काही आपली संस्कृती आणि अभिमान टिकवला जात नाही तर हि शुद्ध व्यावसायिकता आहे . लोकांनी स्वतःचे खिसे रिकामे करीत आस्थेपोटी मंडळाच्या दानपत्रात भरलेला हा पैसा पुढे कुठे आणि कसा जिरतो याचाही शोध घेतला तर अनेक गोष्टी समोर यायला मदत होईल . काही मंडळ सामाजिक काम देखील करतात यात वाद नाही पण त्यालाही एक लिमिटेड ओपन फेस आहे जो सहज लक्षात येतो . तिकडे साउथ मधे काही श्रीमंत मंदिरांच्या वतीनं अतिदुर्गम गावांना दत्तक घेत त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भरगोस निधी वापरला जातो . आणि लोकांनी दान केलेला पैसा लोक कल्याणा साठी वापरल्याच एका प्रतिष्ठित इंग्रजी मासिकात काही दिवसांपूर्वी वाचल्याचं आठवतंय …………आपल्या मुंबईच्या एकतरी करोडपती मंडळाने महाराष्ट्रातलं एक तरी गाव अस आयडियल मॉडेल दाखवावं. 

यावर लिहिण्यासाठी अनेक मुद्धे आहेत पण आपल्याच उत्सवाची आपणच किती कारण विमांसा करावी आपल्या बहुत जनांना सगळं न्यात आहे . त्यासाठी कुण्या राजकीय पक्षाला याचा पुळका घेत स्वत:चा बाजार गरम करण्याची गरज नाही . जो मराठी आहे विशेष करून महाराष्ट्रीयन आहे त्याला  या उत्सवाचा सार्थ अभिमान आहे हे गौरवार्थ असेलही . पण म्हणून आपण या गणेशउत्सवाचं  जे इकोनॉमीकल इवेंट होतंय तिकडे दुर्लक्ष करीत भावनिक गुलालात अधिक रंगत जाण्यात घातक आहे . कारण उत्सवमूर्ती जरी विसर्जित होऊन पाण्यात  विरघळल्या तरी मागे उरलेल्या त्यांच्या आरासीच्या प्रत्येक खांबात अनेक नरसिंह दडलेले असतात जे अनेक भक्त प्रल्हाद संपवण्याच काम चोख बजावतात 


© संतोष टाकळे 

अन सुखाच्या वाटेवरती दुःखाचे आगर ......!







खुप वर्षानी बाबा महाराज सातारकर याचं निरूपण ऐकायला मिळाल ऑन साम टीवी ........आजवर ज्यांच्या पायावर नतमस्तक व्हाव अस वाटल ते हे एकमेव अध्यात्मिक अलौकिक व्यक्तिमत्व ........दापोलीत असतांना खणखणित आवाजात टेपरेकॉर्ड वर सुरु असलेल्या यांच्याच निरूपणाने आमची सकाळ होई .बाबा यांचे परम भक्त एकीकडे सहानेवर गंध उगाळीत महाराजांच्या दाखल्यांना दाद देत मंत्रउच्चारात साग
्रसंगीत पूजा करतांना मधेच बघ महाराज काय म्हणतायत अस attention नोटिस करत त्यांच उदाहरण जगण्यात कस महत्वाच आहे हे जाणून घे अशी तंबीच असे बाबांची आणि मग हळूहळू वास्तव आयुष्यातल्या प्रसंगांचे विस्तृत विश्लेषण करणारे हे सातारकर महाराज आम्हा भावंडांचे कधी मेण्टोर झाले.हे आता आम्हालाही सांगता येणार नाही. त्यांच्या कोकण भेटित आम्ही सहपरिवार त्यांना भेटलो तो खुप भाग्याचा क्षण होता. त्यांचे चरण स्पर्श करतांना अगणित आंनद लहरी संचारल्या अंगात .आजही त्यांचा नुसता आवाज ऐकला तरी स्वानंद मिळतो मनाला आणि हीच ती गुरुंची अनुभूति नाहीतर नुसती 
राख विभूति म्हणून कपाळाला फासण्यात काय अर्थ आहे .


पाहिलं प्रेम


एन के वराडकर चे दिवस जुनियर कॉलेजला नुकतीच सुरवात झालेली . दापोलीच्या एका बाजूला  अगदी टेकडावर असलेलं हे महाविद्यालय तालुक्यातल्या अनेक गावांसाठी एकच पर्याय होता आणि म्हणून दापोली ग्रामीणच्या अनेक गावातून १० वी पास आउट झालेली पोरं कला आणि वाणिज्य शाखेत इथ प्रवेश घायला येत . डोंगर दऱ्यांच्या कुशीतलं हे महाविद्यालय पंचक्रोशीत अनेक गोष्टी करिता फ़ेमस आहे …………इथल्या क्लासरूम मधून दिसणारी हिरवळ अधिक प्रसन्न करणारी .एकंदरीत अतिशय आल्हादायी वातावरणातलं हे ठिकाण …………… त्यातही कॉलेज सुरु झालं ते पावसाळ्याचे दिवस आणि कोकणातला पाऊस तर जास्तीच romantic आणि लहरी देखील खुपदा कॉलेज सुटायच्या वेळीच याला मुसळा उपटायचा .………….अनेकदा मग पुस्तकं पिशवीत गुंडाळायची आणि  सायकल हातात घेऊन चालत निघायचं …………आम्ही आमची अर्नाल्डो (कितीदा रिपेर केलेली आणि अनेक कंपन्याचे पार्टला आपलंसं करणारी म्हणून ती अर्नाल्डो ) लायब्ररी समोर उभी करत असू सकाळी आधी लायब्ररीत १ तास आवांतर वाचन आणि मग पुढे बाकीचे तास अभ्यासक्रम ………पण लायब्ररी एकटा जाणारा मी बाहेर पडतांना मात्र सोबत आणि कुणीतरी असे …………हे अनेकांनी नोटीस केलं आणि ते आता आम्हा दोघांना जाणवू लागलं होतं …………  beauty with brain म्हणावं अस व्यक्तिमत्व अगदी सहज भुरळ पडणारं …………………त्या दिवशी तुफान पाऊस पडत होता. वर्गात इन मीन १० - १२ जन फक्त दोन तास झाले आणि अतिवृष्टीच्या सबबी खाली कॉलेज लवकर सोडण्याचं प्राचार्यांच नोटीस आलं …………१० मिनिटात पोरं सटकली ज्यांच्या गाड्या होत्या ते ट्रिपल सीट वैगरेचा झुगाड करीत मार्गस्थ झाले आता उरले सायकल वाले आणि पाई जाणारे आमच्या सारखे सामान्यजन ……………त्या दिवशी अर्नाल्डो पुन्हा सर्विसिंगला असल्याने आम्ही पायीच कॉलेजात आलो होतो . छत्री उघडून कोसळत्या पावसात पाय टाकणार इतक्यात हाक आली . मी पण येऊ का …………छत्रीच्या तारा तुटल्यात सकाळच्या वाऱ्यात भिजत जावं लागेल नाहीतर . ओह वृषाली तू ……….ह्म्म्म्म एस  ये कि …………………आम्हा दोघांना एकत्र बघून आता नुसते चिडवणारे जास्ती चेतवणार हे उघड होतं आणि तशा कमेटहि आल्याच ………………पण आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमात पडल्याचं हलकेपण या चीडवण्याने अधिक अलवार तरंगत होतं . तिच्या स्पर्शाने आणि सोबत असण्याने पहल्या वहिल्या तारुण्याची जाणीव प्रखरपणे जाणवत होती . वयात येणं म्हणजे काय याची अनुभूतीच म्हणा हवं तर……… आजवरच्या पावसातला तो पाऊस अगदीच स्मरणात राहणारा आणि दरवर्षीच्या प्रत्येक पहिल्या सरीत तिची आठवण पुन्हा गंधीत करणारा ……………हे खरं आहे पाहिलं प्रेम आयुष्यात परत कधीच होत नाही . कारण ते अमर होत अजरामर नाही . 

* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा

© संतोष टाकळे 

बशा " धुणारे हात …………!


मुंबईत काम करणार काय ? जाधवाच्या शंकरन दिन्याला विचारल ……उन्हाळच्या सुट्या लागलेल्या आणि तसही रोजच्या पैशाच्या कटकटीचा वीट आलेल्या दिनेशन झटक्यात हो म्हटलं …………कधी निघनार हाव ……माझ्याकड तिकिटाला पैसं नायत …………तिकडं नेमकं काय काम हाय ……एका पाठोपाठ सगळं एका दमात विचारून दिन्या शंकरच्या तोंडाकड बघत राहिला . फाट्यांच्या गोयल्याचा (मोळी ) सुंब आवळीत शंकरन मी हाय ना तू कशाला
 एव्हडा गांगरतोस म्हणत तुटक उत्तर दिलं . दिन्या पण मनात म्हणाला अन्ना असतांना कशाला भियाला पाहिजेल …………पण म्हातारीला कोन समजावल ती नाय पाठवायची इतक्या लांब …… शंकर अन्ना बोलला तर निघल कायतरी तोडगा …………
पडसडीच्या वाटेनं डोक्यावरचा गोयला सावरत घराकड येता येता स्वतःशीच पुटपुटत दिन्या मनात भांबावला होता . शिकायची आवड हाय पण पैसा नाय . म्हातारी तरी किती लोकांच्या दारात काम करील तिच्यानं जमतंय कुटं……………मरुदे शाळा बिळा आता मुंबई गाठायचीच. खोपीच्या तोंडाशी गोयला टाकून दिन्या मागच्या पडवीतल्या अंगण्यात लांब झाला. भारा मानेत बसला होता . अंग घामानं ओल -चिब झालेलं घसा तानेन सुकलेला आता खरतर घोटभर चाय मिळाली तर जरा जीवात जीव येईल अस नुस्त मनात येतंय इतक्यात काटोकाट भरलेल दोन पेल घेऊन म्हातारी आलीच …………….दिन्या वैतागत म्हातारीला म्हणाला ……तुला चैन पडत नाय काय ग म्हातारे आता नको होता मला च्या दुपार बघ किती वर आलीय ……… तुझ्या च्यायच्या तल्पीच माझ्या परिस कोनाला जास्त माहित हाय ………….तुझी आइस पण च्यासाठी हवरट होती . दिवसभर च्यायचा पातेला वयलावर तापत असायचा . डोळं शून्यात घालीत पेल्यातल्या काळ्या चायचे भुरके वढित म्हातारी पुन्हा माग गेली होती. किती आणि काय आठवलं तिला देव जाण पण आज दिवसभर म्हातारीचा पदर सारखा डोळं पुशीत राहील हे मात्र खरं .
जा पायावर पानी घे सुकटीचा कालवण केलाय घासभर खाऊन घेवया ………म्हातारी पदर डोळ्याशी चेपत हात टेकत उठली . दिन्याच्याहि हुंदका फुटला होता ………कालवणात भाकरी मोडताना दिन्या मुंबईच्या कामाच बोलला . रानात शंकर अन्ना आणि त्याच्यात काय बोलणं झालं ते त्यांन म्हातारीच्या कानावर घातलं. त्यावर म्हातारी जाम भडकली कशाला पायजेल म्ह्मबै इथ मिलतात त्यात भागवू शाला सोडून नको ते नाद करायचे नाय त्या शंकऱ्याला कामला पोरं पायजेत तर स्वताच्या पोरग्याला न्हे म्हना माग त्या सुताराच्या पोराला नेलाय आणि हॉटेलात लावलान कामाला दिन रात पोरगा मरमर काम करी नीट जेवायला नाय का पोटाला पोटभर तुकडा नाय पोरगा कामीन (कावीळ )होऊन मेला आणि ह्याच मेल्या शंकऱ्याने कोर्टातला दावा दाबलान आणि पैसं खाल्यान मदल्या मदी …………उर्वरित कथा दिवाळी अंकात वाचा .

"बालकामगार "आणि अर्थात "आजी - नातवाच्या" नाते संबंधावर आधारित हि दिवाळी अंकासाठीची यंदाची पहिली कथा ……………तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागतच आहे नेहमी प्रमाणे


* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा
© संतोष टाकळे