तिचा नवीन ड्रेस ......!


मावशी काय हाय काय ?........ अशी तिची हाक दोन चार दिवस आली नाही तर चुकल्या चुकल्या गत होत .कधी एक दिवसा आड तर कधी अगदी रोज तिचा आर्जवी आवाज कानावर पडला कि कायम अस्वस्थ व्हायला होत .वाटत एकवेळ मरण पत्करल पण हे असं जगणं नको . इथं कुणाचं आयुष्य कस त्याच्या खरंतर नाना तऱ्हा .
यंदा दिवाळीत तिला फराळ काही जुने कपडे आणि थोडे पैसे दिले तर ती कसली खुश झाली . अगदी दोन मिनिटं दारातून हले ना .ताई माँ भडकली माझ्यावर खाऊ वैगरे ठीक पण पैसे नाही द्यायचे अशाना यांचे आई -बाप अस पोरांना भीक मागायला पाठवतात आणि स्वतः आयते बसून खातात तुला काय दयेचा पाझर फुटतोच कुणी जरा तोंड वाईट केल तरी .

तसे आमच्याकडे काही नियम आहेत (ते मी कायम मोडतोच म्हणा ) पण घरचे सगळे व्यवहार आम्ही ताई माँ कडे दिलेत म्हणजे अगदी कुणाला पाकीट भरण्यापासून ते इस्त्री वाल्याच्या महिना हिशोबा पर्यंत तीच बघते . त्यामुळं हे असले दान धर्म एक्स्ट्रा खर्च तिच्या परवानगी शिवाय आम्ही करूच शकत नाही . पण परवा चक्क तीनच एक नवीन ड्रेस आणला म्हणाली कसा आहे . म्हटलं मस्तय कुणासाठी आणलाय . अरे त्या पोरीला मागायला येते ना तिला . काय विशेष दिवाळीत तर तू कित्ती भडकलीस माझ्यावर मग आता हे काय ? अरे आपण आता हे घर सोडून जातोय ना वर्षभर ती पोरगी आपल्या दारात येतेय . चार दिवस आपण नसलो तर निमूट निघून जायची बाकी कुणाच्या दारात जायची नाही . मधे मी आजारी होते तर दोन वेळा येऊन विचारपूस करून गेली . मावशी तुला बरं नाय ना दे तुजा कचरा टाकायचा असेल तर टाकून येते . हि दारातली लादी पुसून देऊ काय . म्हणत दारात उभी होती कितीवेळ . काय पण असो तीन इतक्या प्रेमान विचारलं तरी .. तिला कुणी तरी सांगितलं आपण हे घर सोडून जातोय तर आता रोज आली कि म्हणते मावशी माझं एक घर कमी झालं तुझ्या दारातन कधी खाली हात गेले नाही मी आजवर......
तिकडं गेलीस आणि काय काम असल तर सांग मला मी नक्की येईन.
आज सकाळी तिला ताई माँ न पिशवी दिली तेंव्हा तिनं ती उघडून बघितली नाही नेहमीच्या गडबडीत रात्रीच्या शिळ्या भाताच्या वरणाच्या पिशव्या जमा करत ती घरी गेली सुद्धा आणि मग अर्ध्या तासांनी परत आली . म्हणाली मावशी तू चुकून नवीन ड्रेस दिलास जुना समजून . हा घे मी उघडून हात बित लावला नाय आहे तसाच आहे .
त्यावर हा तुझ्यासाठीच आहे आम्ही आता जाणार ना म्हणून तुला भेट . क्षणात तिच्या चेहऱ्या वर जे दिसलं ते शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. पण हे असले आनंदाचे क्षण कायम लक्षात राहण्या सारखे.

शेवटी माणसं पैशाने कितीही "अमीर" असली तरी मनाच्या "श्रीमंती" समोर नोटांच्या ढिगांचं मोल कायम चलनी रोकड इतकंच.

© Santo

निमित्त मराठा क्रांती मोर्चा ......!



निमित्त मराठा क्रांती मोर्चा . ....!
गावात दोन एक वर्षा पूर्वी क्षत्रिय मराठा मंडळाची स्थापना झाली . आणि आम्ही मराठे एकत्र आलो .सभासद नोंदणी - वर्गण्या वैगेरे ओघाने आलच म्हणा पण या निमित्ताने इतके मराठे गाव पंचक्रोशीत आहेत हे पहिल्यांदा बघायला मिळाल तुडुंब भरलेला हॉल आणि कार्यक्रम सुरु झाला . पदाधिकारी यांची अपेक्षित भाषण झालीत . आणि मग आंमत्रित नेत्यांची एका पाठोपाठ भाषणांच्या फैरी कुणी म्हणे मराठ्यांन वर तसा कायम अन्यायच झालाय . त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे . आम्ही आजवर माती साठी लढलो आता जाती साठी लढणार . यातल्याच एका नेत्याने मराठा मुलां - मुलींनी दुसऱ्या जातीत लग्न करण्याला आक्षेप घेतला त्यांच्या मते म्हणे आपल्याच पोरी बाहेर गेल्या तर आपल्या पोरांनी काय करायचं इत्यादी इत्यादी तास भर वैचारिक कुटा कुटी झाली . लोकांच्या टाळ्या वैगेरे पडल्या. पण कुणा एकानेही मराठा समाजातल्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला नाही .उलट आरक्षणामुळे मराठ्यांना नोकऱ्या कशा मिळत नाहीत हे अधिक रंजक पद्धतीने मांडण्यात आल. कार्यक्रमात सहभागी असलेल्या तरुण मुलांना यामुळे अधिक चेतवण्यात भर पडली .
हा आरक्षण एकजुट वैगेरेचा उत्साह मोजून सहा महीने टिकला आणि मग प्रकरण थंड पड़ल .मधल्या चार पाच मीटिंगा सोडल्या तर विशेष काही घडल नाही. पुन्हा वर्षभराने कर्यक्रमाच निमंत्रण आल म्हणाले तुम्हाला याव लागेल समाजाचा प्रश्न आहे. म्हटल सॉरी नाही जमणार गेल्या कार्यक्रमात आपण स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावे, लघुउद्योग कार्यशाळा ,करियर गाइडन्स, महिलांसाठी घरगुती उद्योग प्रशिक्षण शिबिर इत्यादि कार्यक्रम आखले होते .त्यापैकी एकही कार्यक्रम घ्यायला तुम्हाला टाइम नाही. उलट जाहिराती घेउन पदधिकाऱ्यांच्या फ़ोटो सहित दिनदर्शिका छापायला मात्र तुम्हाला वेळ मिळाला.
तरुणांना आश्वासक वाटाव म्हणून आमच्या तरुणांची भाषण ठेवत नुसता कार्यक्रम घेण्यात काय अर्थ आहे . त्यावर त्याच्याकडे उत्तर नसाव बहुतेक पण कार्यक्रम ठरल्या दिवशी झाला . पाहुणे आले त्यांच औक्षण झाल. नेत्यांची भाषण, गुणवंत मुलांचे सत्कार झाले आणि पुढ़ काहीच नाही याला आता दुरस वर्ष उलटल .
आज लाखोंच्या संखेत मराठा मोर्चे काढतोय हे चित्र जितक आश्वासक तितकच ते अनिश्चित वाटतय मराठ्यांना नेता नाही हे वास्तव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालय. फ़क्त आरक्षण हा एकमेव मुद्दा नाहिये ह्या उद्रेकाचा तर आजवर आपण का एकत्र आलो नाही ह्या संतापाची ही प्रतिक्रिया आहे .पण ह्या निमित्ताने तुम्ही प्रती काढलात तर आम्ही अति काढु ही तेढ़ हळूहळू अधिक वर येत राहणार आणि मग त्यातून मूळ उद्देश बाजूला राहून जाती जातीतल्या वादाच्या विकोप्याचा महासंग्राम उभा राहणार हे निश्चित .
विविध क्षेत्रताले आज एकत्र आलेले हे लाख मराठे एकवटुन शिक्षण ,रोजगार ,उद्योग, सामाजिक तिढा आणि अशा प्रश्ननांच्या मागे लागले तर किमान अंशी यातून तोडगा निघेल . आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल हो . ते काय नुसते मोर्चे काढून मिळणार नाही हे उघड आहे .
इतर समजातल्या संस्था संघटना यांचा गांभीर्याने अभ्यास व्ह्ययला हवाय. जैन समाजाच्या संघटनांच घ्या समाजासाठी हे लोक प्रमाणिक बांधिल आहे समाजातल्या आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या समाजबांधवांसाठी यांच काम उल्लेखनीय आहे.शिक्षणा संधर्भात यांच काम बघाल तर पूर्वी फक्त व्यवसायात माहिर असलेला ह्या समाजातला तरुण वर्ग आज मोठ्या प्रमाणात IPS ,IRS ,प्रशासकीय अधिकारी ह्या बड्या हुद्यांवर कार्यरत आहे. अल्प संख्याक असूनही त्यांना कुठ आहे आरक्षण अर्थात आर्थिक दृष्ट्या हह्या समाजले बहुतांश लोक गर्भ श्रीमंत आहे हे वास्तव नकारता येणार नाही पण त्यांनी जे अचिव्ह केलय. कारण त्यामाग त्यांचा समाज खंबीर उभा आहे .
खरतर आरक्षण, विशेष सवलती वैगेरे ह्या गोष्टि तशा गौण आहेत मुळात आपली सकारात्मक मानसिकता,excellent educational power, helping comunity , achivment साठीच डेडिकेशन आणि सर्वात महत्वाच म्हणजे सामाजिक सौख्य ह्याने समाज उभा राहतो.
बाकि समाज धुमसत ठेवत राजकीय अजेंडा राबवायला वादग्रस्त प्रकरण अधिक चिघळवण हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी काही नविन नाही.


© Santo 

कामकरणी बायां ......!


बहुतेक वेळा ऑफिसला जाताना सकाळी जी 9:30 ची बस पकडावी लागते ती साऊथ मुंबईतल्या नेपेन्सी रोड ,वॉर्डन रोड अशा उच्च भ्रु इल्याक्यातून जाते आणि म्हणून या बस ला बऱ्याच कामकरणी बायांची वर्दळ असते.आता खुप वेळा एकत्र प्रवास केल्याने यातल्या काहीजणी चेहऱ्या ने ओळखीच्या झाल्यात.थोडिफार विचारपूस ही होते अधन मधन पण आज झंकारे बाई भेटल्या.आणि त्यांनी मोरे बाईँ बद्दल वाईट बातमी दिली. तीन दिवसांपूर्वी त्या म्हणे हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या. त्यांचा चेहरा झरकन समोर उभा राहिला .जबरी बाई एकदम.......कधी बस प्याक असली आणि लोक पुढे सरकले नाहीत तर ह्या बाई एका दणक्यात त्यांना जागेवरुन हालवत. कुठून येतात मेले मुंबईत गर्दी वाढवायला हा त्यांचा पेटंट डायलॉग भारदस्त बांधा आणि तितकाच पहाडी आवाज . बोलायला लागली की समोरच्याला गार करील ... नेपेन्सी रोड ते पेडर रोड अशा एकुण 3 ठिकाणी तिची काम .
तिची बोलायची स्टाईल म्हणजे - बघा साहेब सकाळी 9.30ला घर सोडल की डायरेक्ट संध्याकाळी 4 ला आपण घरी परत. एकतर आपल्या कामात किटकिट नाय ,एकदम क्लीन काम करतो आपण ,स्वतःच्या मेहनीतीवर जगतो. आजवर कुणाची बंद्या रुपायाची देनेकरीन नाय,तसा सोन्याचा घास हाय ताटात ... पण सुख नाय हो ,पोरगा उनाड निघाला बापानं मधी कुठं दलाली केली त्याचे एकदम पैसे भेटले त्यात त्याला गाडी घेऊन दिलानं . पोरगा दिवसभर गाडी फिरवतोय आणि त्याच्या बापाचा पाय काय घरात टिकत नाय .....काय करनार बोला एकट्या बाईनं घर चालवू सणवार बघू , नात्या गोत्यातली कार्य करू आणि हा रोजचा काम तर पाचवीला पुजलेला . मी पण आता ठरवलय बिंदास जगायचा कुठ ह्या मेल्यांच्या माग लागत्ताव .गेल्या दिवाळीत तिरुपती करून आली .आमच्या इथ एक तेलगु हाय तो घेऊन गेला होता .40 माणस होतीव सगळी .....ह्या कटकटीतन बाहेर पडली जरा बरा वाटला .या दिवाळीत वैष्णव देवीला जाणार हाय अर्धे पैसे देवून झालेत अर्धे बाकी हायत... जरा पोरग्याचा नीट लायनिवर आला असता ना म्हंजे .... . इतक्यात तिचा स्टॉप येणार असतो .मग ती समोरच्या सीटवर हात टेकत उठते...... साहेब बोल्ला चालला काय नाय हो . चला भेटु पूना
वयाची उतारी आली तरी धूणी -भांडी करणाऱ्या ह्या बाया आणि दोन वेळच आयत मिळतय म्हणून घरात लोळणारी त्यांची हि उद्दाम पोरं ...... आपल्याला नुसतं ऐकून इतका मनस्ताप होतो.त्याना तर किती लागत असाव हे रोज डोळ्यां समोर बघून....इतका वयात आलेला पोरगा पण चार पैसे कमवत नाही. ह्याच पुढे नक्की काय होणार या विचारान किती अस्वस्थ असतील ह्या बाया आतून.... आणि त्यात नवऱ्याचा ताप तो वेगळा.
मालकीणीची भांडी घासुन लक्ख चमकवणाऱ्या ह्या हाताना स्वतःच जगण मात्र उजळवता येत नाही.

© Santo 

हेयर कट....!



अनिल न्हावी वाड़ीत आलेत अस नुसत कानावर आल तरी पळता भुई थोड़ी व्ह्ययची.... आईंन वाटित पाणी काढून धक्यावर ठेवल म्हणजे तर आज आपली हजामत नक्की ह्या भीतीन मुद्दाम लांब पळ काढायचा .....केस कापण म्हणजे जाम वैताग असायचा तेंव्हा.... त्यात अनिल कांकानी त्याकाळी मुंबईतन आणलेल केसांचा बारीक़ कट करणार दातेरी यंत्र (हल्ली ब्याटरी वर दाढ़ी कोरायला जे मिनि यंत्र येत ना तस ) केस जवळ जवळ उपटूण काढ़ी. अनिल काकांच्या सराईत हातात ते झपाझप चाले एकदा मान खाली घातली की केसांचा खच पडल्या शिवाय काय मान वर काढ़ायची सोय नसे मधीच काय रे हे बोकड़ा गत तुज़े केस ... ......केसांचा तुरा काढत गांव भटकायला काय उनाड पोरगा हायस काय तू .अवो दादा नको ती थेर करतात ही हल्लीची पोर .तो सुतारकोंड च्या मधुचा पोरगा बघा केस वाढवून झीपऱ्या उडवीत फिरि गावभर .... शेवटी काय झाला 8 वीत 2 विषय राहिल . बापांन साफ केस भादरुन घेतलांन माझ्याकडन त्या दिवशी.चांगली एक गंगावन बनल एव्हड़ी केसा पडली .पोराना धाक नाय हो आजकाल राहिला..... . ह्या केसा उड़ावण्यात टाइम घालवलान ..... शाळेत काय गेला नाय गेला सारखाच मास्तर तरी काय करणार असल्या पोराना....... त्यांना काय पगार भेटल्याशी मतलब........ हे असल काय ऐकल की बाबांच पित्त आणिक खवळे ......अनिल साफ़ बारीक़ कर भांग पाडायला तेव्हड़े चार केस ठेव पुढ़ .......हे बाबांनी नुस्त बोलायची खोटी की पुन्हा अनिल काका पुढ़ ओढीत कैचीचा अजुन एक हात मारी ...अहो काका बस झाले अस म्हटल की म्हणत दादानी एकदा सांगितल्याणी ना मग तसाच होणार तु गप बस्तोस की बोलव त्यांना हिकड ..... एक वेळ भोकाड़ पसरला की आई म्हणे अनिल भावु बस झाल जावुदे मग कापा पुढच्या टाइमाला उग्गाच दिवस भर जीव खाइल माज़ा...... पण बाबा म्हणजे पाठीत दोन धपाटे हाणीत. नखरे सूचलेत तुला अनिल जास्ती हालचाल केल्यान तर कान टाक उडवून जाउदे तिच्या आईला प्रत्येक वेळी ह्याला वाड़ीतन शोधून आणा बळे बळे केस कपायला बसवा दूसरा काय काम धंधा नाय काय आम्हाला .

पाठीतला जाळ सोशित हिसमसुन नाकातन अगदी शेम्बुड् येई पर्यंत आनिल काका सोडत नसत.अगदी मानेवरची लव कोरत असतांना .....दादा लय धाक हो तुमचा पोराना .... पोरगा जागचा हलला नाय ह्याला म्हणतात धाक .इकड़ जाम 1 नंबरला झालेली असायची शेवटी कधी एकदा अनिल काका ब्रशावर पावडर टाकत मानेवरन फिरवतोय अस होई. मग त्या रेकट्या रेकट्याच्या कापडाची नाड़ी सोडलन की डायरेट मागच्या दारातल्या कुडल्यात जावून मोकळ व्ह्ययच मनातल्या मनात अनिल काकाला दोन चार शिव्या घालायच्या आणि तोंड फुगवत पाथरी वर बादलित आईनी काढून ठेवलेल्या गरम पाण्याचे दोन तांबे डोक्यावर.घेऊन एकदाच यातून सुटल म्हणत अर्धी बादली भास्कन अंगावर ओतून घ्यायची.

आज खुप वर्षानी लुक चेंज वैगेरे कर म्हणून मित्रानी सजेस्ट केल म्हणून दिल खुश मधे गेलो तर त्यान पहिले केस धुवायला बसवल म्हटल बाबा कापून झाले केस की मग धुव काय ते तर तो म्हणे नो सर यु हॅव टू वॉश युवर हेयर फस्ट देन आय विल चेक few लुक्स फॉर यु .लेट्स सी विच वन विल सूट यु ....त्याला म्हटल झीपर्या काढू नकोस बाकि काय पण कर (ज़िपर्या काढाण्या इतपत केस डोक्यावर उरलेत नाहीच म्हणा )...मोजून 20 मिनिटांत त्यांन हा लूक दिलान आणि फिनिशिंग द्यायला ती दातेरी मशीन काढलांन तशी मला अनिल काकाची आठवण झाली. 

*फोटो सौजन्य - गुगल 
© Santo 

सहप्रवाशी ...!





ठिकाण -कर्जत स्टेशन

या कर्जत च्या वड्याला साधी पीठाचीही चव राहिलेली नाही.या माणसाला दोन सांगितले आणायला तर चार वड़े घेऊन आला .वेधळा कुठला जरा म्हणून डोक वापरायच काम नाही.इतक्या वर्षात नाही वापरल आता काय नुस्त केस उरलेत म्हणून डोकं .....
दुसऱ्या काकू -तुम्ही खुप खमंग वड़े करता वहिनी.
पहील्या काकू -हो तसे होतात माझ्या हातचे बरे.
दुसऱ्या -बरे नव्हे उत्तम होतात .तुमच्या हळदी कुंकवाला नाही का केले होतेत . वर दोन बांधूनही दिलेत.नितीन ला फार आवडले हो म्हणाला आई तू पण कर एकदा. मला ते तळण म्हटल की वैताग .बर झाल विषय निघला तुमची पाककृती सांगा ना.
पहिल्या काकू -सोप्पय हो वहिनी . बटाटे बेतान उकड़वायचे .टोपात हो कुकरला नाही .कुकरला नुस्ता चुरा होतो . आल -लसुण- मिर्ची वैगरे ची जाड्सर पेस्ट वरून थोडा कडीपत्ता .........मग बेसनाचा घोळ करायचा. त्यात थोड़ तेल घालायच. बेसन ते सम्राटच घ्या आपल्या अंबिका वल्याकड़ मिळत प्याकेट .पीठ चांगल घोटूंन घ्या .मग काय तेल गरम करा बेतान आणि सोडा वड़े
दुसऱ्या -अहो आणि ती सोबतची चटणी ....
पाहिल्या काकू -ती ह्यांना येते पुदीना बीदिना घालून करतात ते ......चटण्या बिटन्या करायच्या असतील तर आम्ही यांनाच सांगतो ...अहो मसाला पण कसला गंधा सारखा बारीक़ करतात . एकदम दोन आठवडयाला पुरतील एव्हडे कांदे आणि खोबर दिल की तास -दीड तासात दोन डबे मसाला तयार .रिकाम्या हाताला काहीतरी काम नको का.
दुसऱ्या काकू -अहो नार्वेकरांना नुस्ता चहा ओतून घ्या म्हटल तरी डोळे वाटारुन बघतात .
पहिल्या काकू -आता काय घश्याखाली उतरत नाहियेत वड़े द्या टाकून पुन्हा शहणपणा करत काय आणलत तर बघा .

*माणुस असो वा पदार्थ जरा जरी ढासळला की त्याला कायम दुय्यम स्थान मिळत.

*फोटो सौजन्य - गुगल 
© Santo 

`````````२४ तासांत मुसळधार `````````





कोकणात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडतोय सकाळी बाबांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री पासूनचा पाऊस चांगला टिकून आहे . शेतात गुडघाभर पाणी साचून खलाटी( भातशेती जमीन ) तुडुंब भरली आहे . राज्यात अनेक ठिकाणी म्हणावा तसा पाऊस नसतांना कोकणात मात्र सालाबाद प्रमाणे पावसाची खास मर्जी दिसते आहे . दरवर्षी इतका पाऊस असतांनाही गेल्या ५ -६ वर्षांपासून दापोलीत उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असत .लग्न समारंभात अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतं .याउपर यंदा तर दापोलीच्या आपल्या विहिरीतल्या पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवण्या साठी चक्क कंपाउंडला टाळ लावावं लागलं अर्थात इतक्या वर्षात हे कधी करावं लागलं नाही म्हणून हा प्रकार क्लेशदायक होता . आईला म्हटलं काढ टाळ लोक पिण्यासाठी पाणी न्यायला आपल्या दारात येत असतांना आपण त्यांना पाणी नाकारणं योग्य नाही . अर्थात लोकही तळ गाठलेल्या विहिरीतलं पाणी बेतानं काढत नाहीत आणि त्यानं गाळ उसळून सगळंच पाणी गढूळ होतं हा तिचा आक्षेप रास्त होता.

मुळात लोकवस्ती वाढते आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोकं दापोलीत नोकरी धंद्या निमित्त येतात आणि इथंच स्थायिक होतात. मिळेल तिथे जागा घेऊन घर बांधली जातायत . डोंगर च्या डोंगर लोकांनी पोखरून त्यात इमले बांधले आहेत. शिवाय पाण्यासाठी जो तो विहारी खणतोय बोर मारतोय पाण्याचं विभाजन त्या त्या नुसार होणं नैसर्गिक आहे . पण सोबतच पाण्याचं नियोजन करण्याचं गांभीर्य मात्र इथल्या शिकल्या सावरल्या लोकांत नाही . त्यामुळं" निसर्ग देतोय आणि गटारात जातंय " असली इथली अवस्था .

शोष खड्डे , Rainwater Harvesting, पावसाच्या पाण्याचे संधारण,जुन्या विहिरींचे पुनर्जिवन , गावातल्या नदी नाल्यांवरचे बंधारे मेंटेन करणं त्यात होणारं प्रदूषण थांबवणं , सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांची क्षमता वाढावी म्हणून त्यातला गाळ काढणं त्यांची खोली वाढवणं हे प्रशासनाचं प्रायोरिटी वर्क आहे .जे आजही फक्त formality म्हणून केलं जातं, अशा अनेक गोष्टी करण्यालायक आहेत आणि त्या येत्या काळात अतिआवश्यक होणार आहेत . उन्हाळ्यात स्वतःचा ब्यानर लावत टँकर फिरवणाऱ्या नगरसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि अगदी आमदारांनी देखील टँकर मुक्त मतदार संघ ही नवीन योजना हाती घेण्याच सिरियसली मनावर घ्यायला हवय.

पिण्याच्या पाण्याला टाळ लावण्याची वेळ आली तरी आपण अलर्ट होणार नसलो तर पुढे पाण्यासाठीची वणवण अटळ आहे .

जिथं मिळतंय तिथं जिरवलं आणि वर्षभर पुरवल कि साठलेल्यात वाढ होईल. नाहीतर कोकण सुद्धा एकदिवस ओसाड होईल.

*फोटो सौजन्य - गुगल 

© Santo 




कट टू कट .......!


शाळा सुरु होउन अगदी नियमित वर्ग सुरु झाले तरी आमच्या वह्या बाजारात असत .वर्गावर बाई आल्या की कुणी कुणी त्यांच्या विषयाला वही घातली नाही त्यांना उभ करत .....खाकी कव्हर त्यावर स्टिकर वैगरे लावून अपटुडेट आलेली पोर मग आमच्याकड़ बघुन फिदिफिदि हसत. बाईनी पट्टी टेबलावर आपटली की पुन्हा वर्ग शांत होई. अरे घाला रे वह्या लवकर मला व्याकरण सुरु करायचय ते काय तुम्ही कच्चा वहित उतरवुन घेणार का ? बाई ह्या वहित लिहतोय सध्या नविन वही आली की मग त्यात लिहून काढिन .हातात जाड्सर असलेल्या बायडिंग(मागच्या वर्षी उरलेल्या कोऱ्या पानांची कोलार्ज करून घेतलेली जाड जुड़ नोट बुक) च्या वहीकड़े एक काटाक्ष टाकत बाई खात्री करून घेण्याकरीता वही घेवून बोलवत( मुळात आपला रेकॉर्ड इतका चांगला नसल्याने त्या रिस्क घेत नसाव्यात. )प्रत्येक विषयाला किमान तीस एक पानं आणि विषयानुसार सेप्रेट सेक्शन करायला पहिल पान दुमडून त्यावर मोठ्या अक्षरात भूगोल -इतिहास -नागरिकशात्र वैगरे लिहून एकाच वहित सात विषय तात्पुरते ट्रांजिस्ट करायचे ...... हे काय हिंदी ला इतकी पान आणि मराठीला इतकुशी अरे माझ्या विषयांची व्याप्ति मोठी आहे हिंदी काय वीस एक पानात पण भागली असती नाहितरी मोहिते बाई असतात कुठे तुम्हाला शिकवायला बघाव तेंव्हा रजेचा अर्ज हातात घेवून मुख्याध्यापक कक्षा बाहेर उभ्या. मुळात इतक्या सुट्या हव्या असणाऱ्या बाईन शिक्षक का व्ह्यव हे देवच जाणे..... आणि हे काय दोन धड़े आणि एक कविता झाली पण शिकवून. घोड्यावर बसवून शिकवते की काय ही बाई ........माझ्याकडे डोळे वाटारुन ....तुला काय झाल दात काढायला पुढच्या आठवड्यात वही नसली तर माझ्या तासाला बसू देणार नाही याद राख .

घरी दप्तर टाकून पहिल आईच्या मागावर जाऊन तिच्यावर वैताग निघायचा काय आई रोज बाई विचारतात वही का नाही घातली.कधी होणार बाबांचा पगार आणि कधी येणार आमच्या वह्या उद्या पर्यंत नाही आल्या तर परवा काय मी शाळेत जाणार नाही .त्यावर आई ....हो हो धीर धर उद्या वागळे डॉक्टर कोकमाचे पैसे देणार आहेत तेंव्हा घे तुला काय घ्यायचाय तो ....तीनं शब्द् दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमची शाळा सुटण्याच्या वेळी ती फ़ाटक दुकाना समोर उभी असायची. रुमालात दुमडलेल्या शंभराची एक आणि पन्नास ची एक नोट हातात देत म्हणायची जा घे वह्या जास्ती भारितल्या घेवू नकोस एव्हडेच हायत पैस तुला देवून उरलेत त्यात मला अजुन सरकी पेंड, मेंन्टि (पावसात शेतीच्या कामात डोक्यावर घेण्याचा प्लास्टिक) घ्यायची हायत मला कमी पडल तर यातल उरलेल घेता येतील .
"सुखानंद "च्या काचेच्या काउंटर वर रेलून आत स्टॅंडवर मांडलेल्या वह्या पाहतानां त्यांच्या वरची नेचर -कार आणि अशा तत्सम चित्रात हरवून जायला होई.......किती रूपये डजन वाल्या देवू 65-70 -90 की 110....... .65 वाल्या दया . कव्हर हवेत ........ हो .....कसे देवू साधे की असे प्लास्टिक कोटिंग म्हणजे पावसात दप्तर भीजल तरी वही भिजणार नाही ........ साधेच द्या . स्टिकर देवू ना .....एक कसा आहे ......सुट्टा घेतलास तर 2 रुपये आणि पूर्ण एक शीट घेतलीस तर 20 रूपयाला एकुण 12 स्टिकर...... . दया मग एक शीट .

एका कोऱ्या कागदावर फटाफट वस्तुंच्या नोंदी होत पुढे त्याचा भाव मांडून तोंडी आकड़े मोड़ करीत फ़ायनल म्हणजेच ग्रँड टोटल लीहली जाई....बर एकुण एकशे पाच होतात तू शंभर दे..... पाच रूपये तुला सूट.

कट टू कट पन्नास ची उरलेली नोट ईमानदारीत आईकड़ परत द्यायची आणि सरकी पेंडीच्या तिच्या कंबरे वरच्या बोचक्याला आपल्या डोक्यावर चढवून . हातातल्या वह्यांच्या पिशवीकड़ बघत चालतानां कधीच अस वाटल नाही की भविष्यात लिखाणाचा इतका मोठा क्यानवास मिळेल जो किती रूपये डजन अस विचारायची वेळच येणार नाही.


- © Santo 

Photo Credit - Namita-sharvari Prabhu-sawant.

फुलांचा सडा........... ‪#‎महिलादिन‬ ‪#‎एवीनिंग‬ ‪#‎विशेष‬





चर्चगेटला त्या तिघी रोज दिसतात.लोकं काम संपवून घरी जायला निघालेले असतांना यांच्या वर्किंग अवर्सने मात्र नुकताच स्टार्ट उप  घेतलेला असतो . प्लाटफॉर्मच्या अगदी सुरवातीच्या  बाकांवर त्यांच्या खास लकबीत बसून कस्टमर शोधित फिरणाऱ्या नज़रा ..... ग्लॉसी पावडरचा हलका थर , गडद शेडची लीपस्टिक , डार्क केलेल्या भुवया , यांनी  उठून दिसणारे यांचे चेहरे  ......केसातन बाहेर खेचलेल्या बटांनी बोल्ड झालेली यांची इमेज .....विशीष्ट प्रकारात दूमडन सिग्नल म्हणून छातीवरून काहीसा ढळलेला  पदराचा काठ . आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावर धीटपणे वागण्याचा सराईतपणा .आज वुमन्स डे म्हणून नव्हे तर प्रत्येक सणावारी त्यांच जरा जास्ती निटसर आवरून येण. एकमेकींशी बोलतांना निखळ हसण.….... तरण्या -तरुण दलाल पोरांशी मस्करी करण .......................जुन्या कस्टमरशी  वाद घालीत लाडात येणं. आणि अगदीच कुणी फालतुगिरी करतोय अस वाटलं जरी तरी त्याला लागलीच तिथच झापण.  थोडक्यात काय तर परिस्थिती कशीही असली तरी जगण्यातला आनंद  स्वीकारत रहाण .....मनात कितीही प्रश्नांचा काहुर माजला तरी डोळ्यात मात्र हे सगळ निभावुन नेण्याची ताकद असण .तारुण्य ढासळत असतानांही जे शिल्लक आहे त्याला तितक्याच दमान बाजारात मांडणं , कधी कस्टमर्स ची  रीघ असतांना दोन घास खाण्याची फुरसत नसण . तर कधी एका एका गिऱ्हाईकाला पटवण्यासाठी जीवाचा आटा पिटा करण  दलाल ,गर्दुल्ले , चर्सी , बेवड्यांच्या नादाला तोंड देता देता खुपदा पोलि सांचीही  चिरीमिरीची सोय करणं. रोजच लॉजच्या शिड्या चढतांना . प्रत्येक पायरीगणिक कस्टमर खुश झाला पाहिजेल म्हणूनची इच्छा वाढवत मजले चढण . आणि रात्र सरता सरताकेव्हातरी पुन्हा त्याच पायऱ्या उतरतांना आंबलेल अंग झाडीत झोपेची डुलकी उडवत  नको  हा जन्म पुन्हा म्हणीत या जन्माचा वीट येणं .पर्स मधल्या नोटाना त्या येण्याआधीच पाय फुटलेले असतात म्हणजे पुन्हा रात्री उभ रहाव लागणार हे ठरलेलं. 

आता म्हणून यांचा आदर्श वैगरे घ्या अस  म्हणता येणार नाही .

पण यांच्यातली हिम्मत मात्र घ्या बायानो  ,जगतांनाचा संघर्ष  तोडण, आयुष्याला प्रत्येक आव्हाना समोर नेटान खंबीर उभं करण , उलट तुम्ही मात्र तुमच्यावर अन्याय होतोय हे उघड असतांना त्यावर पांघरुण घालीत कन्हत बसताय , समाज काय म्हणील याची बोडकी भीती बाळगताय ,  भोग- नशीबाला दूषण देत टुकार ओझी उरावर घेत जगताय अशा कित्तेकींनो तुम्ही पेटून उठाल तेंव्हाच बदल शक्य आहे . 

बाकि मावळणाऱ्या संध्याकाळी फुलणाऱ्या या फुलांचा सडा असा रोजच सांडतो .विर्याच्या चिखलात दोन- चार नोटांच्या पैशा पायी .म्हणून त्यांनी पुन्हा उमलंण थांबवलय का ?
*फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा

© Santo 

कष्टाचं मोल......!







                   



बारावीचं वर्ष मुंबईतल्या कीर्ती कॉलेजमधल.... एक तर गावातून थेट शहरात आल्यावर उडालेला गोंधळ त्यातही किमान कीर्तीचा क्राउड तसा हेल्पिंग नेचरचा होता म्हणून तितकसं जड गेल नाही म्हणा. पण इथ एक मोठा लोचा म्हणजे आर्ट्स मराठी मिडीयम मधून नाही म्हणजे तुम्ही लेक्चर इंग्लिश मधेच अटेंन्ड करा आणि पेपर हवा तर मराठी मधून लिहा .एकतर इंग्रजीच आणि आपल वाकड त्यात history -geography सारखे विषय इंग्रजीमधून शिकणं म्हणजे आधीच हौस आणि त्यात पडला ............... अशी गत history च्या मॅम तर पानन -पान नुसत्या वाचून दाखवायच्या ५ - ५ मिनिटांने नुसत गॉट इट म्हटलं कि आगे बढो................ पोरांना काय कळल नाय कळल त्यांना काही देणं घेणं नसे . आणि वर दुपारी रीसेस नंतर चा यांचा तास शिवाय क्लास रूम पण टॉप फ्लोअर सी फेस view असलेली . वाटल वर्ष समुद्राच्या लाटा मोजण्यात जाणार बहुतेक कारण बाकी सगळ तसही डोक्यावरूनच जात होत . एकदा तर डोळा लागला चक्क आणि त्यांच लक्ष गेल. सेकंड लास्ट बेंच आर यु स्लीपिंग इन द क्लास नो नो मॅम then explain me what i am talking about. अठराशे …...... साली उत्खलनात सापडलेल्या ……. talk in English .................. mam but i am from Marathi medium आणि तुम्ही इंग्लिश मध्ये वाचून दाखवलेल आम्हाला मराठी वाल्यांनाच काय English वाल्यांनाही कळत नाही . सगळ्या क्लास भर लाफ्टर .................... ओह्ह ओके विल explain इन हिंदी सम टाईम . पण मग मात्र त्या नेहमी हिंदी मध्ये सारांश सांगत राहिल्या. कळो न कळो हजेरी नसेल तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून बहुतेक सगळे तास भरता भरता वर्ष संपत आल. आणि परीक्षा लागली . १० वी च्या बोर्डाच्या वेळी होती इतकी भीती १२ वीच्या बोर्डाला नसली तरी धाक- धुक होतीच. आणि टाइम टेबल डिक्लेअर झालं .
परीक्षेच्या आधी उरल्या सुरल्या दिवसात जेमेल तेव्हडा अभ्यास करावा म्हणून सिद्धिविनायकाच्या गार्डन मध्ये संध्याकाळी दिवे लागेस तोवर उजळणी सुरु झाली . राजेश - परीकक्षित- मेघा - मंजुळा ह्या आमच्या मराठी वाल्यांचा ग्रुप एकत्र बसून घोकम -पाठ वैगेरे चालू झाली. एकाने अपेक्षित मधली प्रश्न उत्तरं वाचायची तर एकाने ती इतरांना समजावून सांगायची. रिविजन चा हा फॉर्मुला आमच्या प्रायवेट क्लासच्या मनीषा पाटील म्यांमचा .
सतत २० दिवसातले ८ तास अशी पूर्वतयारी ज्या मंदिरा समोर केली त्या सिद्धिविनायकाच दर्शन घेवून पेपर ला जाऊया अस शेवटच्या दिवशी ठरलं आणि ज्या माळी काकांनी आम्हाला या गार्डन मध्ये वेळी अवेळी येण्या जाण्याची मुभा दिली त्यांचे आभार मानत सराव सत्र संपल आणि तीन दिवसांनी परीक्षेचा दिवस उजडला त्यावेळी काही मोबाईल वैगरे नव्हते म्हणून ठरल्या ठिकाणी सकाळी ५ च्या सुमारास जमतील ते मंदिरात काकड आरती नंतर पाहिलं दर्शन घेतील सोबत गणेशाचे चरणस्पर्श करण्यासाठी हॉल तिकीट न चुकता आणा असा नियोजित प्लान . पण प्रत्यक्षात परीक्षित , आणि राजेश ठरल्यावेळेत पोहोचलेले .परीक्षार्थी आहोत हे कळल्या वर स्पेशल गेट न प्रवेश देत . थेट गाभाऱ्या समोर आम्हाला उभं केलं गेलं आणि अगदी २ मिनिटात मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे उघडले (आजवरच्या दर्शनातल हे कायम लक्षात राहणार दर्शन ). तेंव्हा खरतर अतीव देवभक्त होतो म्हणून जरा जास्तीच भारावून जाण वैगेरे झालं खरतर .................एकूण ४० एक परीक्षार्थीची गर्दी होती तिथे ............ कित्तेकांचे पालकहि होते सोबत होते .त्यातले काही सोनू चांगला साष्टांग नमस्कार कर हो भरघोस यश माग बाप्पा कडे ..................,तर कुणी मने मेरीट मध्ये आलीच पाहिजेस असा आशीर्वाद माग मनोभावे गजानना कडे अग बुद्धीचा देवता आहे तो त्याला शक्य आहे ते आणि आम्ही जे केलंय त्यातलं येऊदेत फक्त वर्ष वाया जाता कामा नये.

पेन -प्याड- आणि हॉल तिकीट घेऊन परीक्षा केंद्रावर जेंव्हा पोहचलो तेंव्हा आई - वडील - भाऊ -बहिण अशा गर्दीतून वाट काढत अच्छा -ओके -हो आहे लक्षात- वैगेरे अशा सूचनांच्या गारोळ्यातन पोरं एकदाची बाहेर पडून येतांना दिसली तेंव्हा वाटलं आपल्याला कोणी नाही आल अस चीअर अप करायला. सुशिक्षित घरातल्या लोकांची काम हि आपल्या इयत्ताही घरच्यांना ठावूक नाहीत त्यांनी केंद्रावर याव म्हणजे जरा जास्तीच अपेक्षित केल जातय . इतक्यात बापुन (मोठे भावोजी आणि माझे dad सुद्धा ज्यांनी गेली १२ वर्ष मला सांभाळल ) सारख कुणी तरी येतांना दिसल. बापू तुम्ही कसे काय इथ .......थंड पाण्याची बाटली समोर धरीत म्हणाले परीक्षा म्हटली म्हणजे तुला १० -१० मिनिटांन पाणी प्यायची सवय. ही बाटली घरीच विसरून आलास ना . वेळ झाली असेल जा नीट ली पेपर . त्यांना घट्ट मिठी मारत thank यू dad म्हटलं आणि परीक्षा केंद्राकड़े वळलो.
आज १२ विचा पहिला पेपर म्हणून आठवणीतलं हे काही
मुळात तुमची मेहनत महत्वाची बाकी फक्त नवस वैगरे करून कधी यश मिळत नाही . मंदिरात जायचंच असेल तर सकारात्मक उर्जा घेऊन येण्यासाठी जा तिथल्या प्रसन्न वातावरणात मन शांत करून या साष्टांग नमस्कार घालतांना तुमच्यातल्या ओवर confidence ला नमवून फक्त आत्मविश्वास घेऊन वर उठा. शेवटी

कष्टाचं मोल मिळतच . थोड उशिरा का होईना.