
ज्या मराठ्यांना साक्षात छत्रपतींच "राजे" पण लाभलंय त्यांना कोणत्याही उसन्या पुढाऱ्याची (हार्दिक पटेल .)गरज नाही . असली हंगामी बेडकं कितीही फुगली तरी मौसम गेला कि त्यांना पुन्हा बिळातच जावं लागतंय ……………आम्हा मराठ्यांचे नेतृत्व करण्यास आम्ही समर्थ आहोत . आणि आरक्षणाची अशी कितीही गाजरं आता संधी साधू पुढे करण्याचा प्रयत्न करीत असले तरी तेच गाजर त्यांच्या XXX घालण्याची हिंमत आणि योग्य समज नव्या तरुण पिढीकडे आली आहे . मुळात आम्ही कधीच अमुक जात तमुक धर्माच्या नावाने कोकलत नाही. त्याबद्दलची सहानभूती मिळवत नाही. आणि शिवाय त्याचं भांडवल करीत स्वतःची पोट भरीत नाही. एक वेळ ते आरक्षण नाही मिळालं तरी चालेल पण लाचार होत कुण्या शेळपटाला आम्ही आमच्या उरावर बसू देणार नाही .
खरं तर आता आरक्षण हटाव साठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय . आजोबा - बाबा - पोरगा - नातू आणि आता पणतू ……………… एका एका घरात सात - आठ सरकारी नोकरदार होऊनही जर उद्धार होत नसेल तर हे तुमचं अपयश आहे . ज्यांनी मिळवलं ते पुढे बळकावत राहिले ……………आणि अजूनही ज्यांना सिस्टीम मध्ये येता आलं नाही ते उपेक्षितच राहिले जे समाज प्रबोधनाच्या नावाने बोंब मारतायत त्यांनी या उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी का? पुढाकार घेतला नाही . कारण यांना स्वतःच्या उपसेगीरीतून उसंतच मिळाली नसावी . किंवा मग सगळेच मुख्य प्रवाहात आले तर मग पुढे कशाचं भांडवल करावं याची भीती वाटली असावी.
आज आरक्षणामुळे जी तफावत समाजात जाणवते आहे . त्यातून जाती द्वेष अधिकच वाढत जाणार आहे . तब्बल ९६ टक्के असूनही जेंव्हा फक्त open म्हणून प्रवेशाची संधी हुकते त्या बुद्धिवंत मेहनती मुलावर झालेला अन्याय ………. अन्याय नसतो का ? पुढे तो निराशेपोटी पुन्हा पुस्तकांशी वैर घेत खच्चून जातो याला आपल्यालेखी काही किंमत नाही का ? आर्थिक परिस्थिती बेताची असतांना फक्त उच्च वर्णीय जात म्हणून शैक्षणीक फी मधली सूट घेता येत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावं लागणाऱ्या त्या हजोरो मुलांशी आपली बांधिलकी नाहीच का ? आमचा समाज - आमची जात - आमचा धर्म आणि आमचं आरक्षण याचे ढोल बडवत हि सामाजिक विषमता अजून किती वर्ष भारताच्या संविधानाचा आधार घेत आपण रेटणार आहोत . याच उत्तर द्या आधी …
© संतोष टाकळे .
No comments:
Post a Comment