हा हेकेखोरपणा आहे शिवाय आम्हीच बरोरबर हा समज अधिक वाढवत आपण या वादात जास्ती तेल घालण्याचा काम करतोय . आणि विषय अधिक ज्वलंत करतोय . हे मनसैनिक आणि स्वतःला पुरोगामी विचारवंत समजणांऱ्याना पटणार नाही मुळात जैन समाजातही दोन गट आहेत त्यातला एक गट जो सत्ता , पैसा आणि राजकीय हितसबंध यांच्या जोरावर अतिरेक करत मुजोरी करतोय. तर दूसरा गट म्हणतोय आपण नाही ना non veg खात अहिंसा करत मग इतरांनी ती करू नए असा आग्रह किंवा जबरदस्ती कशाला.आपल्या धर्मानुसार आपण वागू त्यांना करुद्यात् त्यांच्या नुसार ......
मनसे बद्दल -
मनसेच झालय अस की यांच्या थिंक टँक मधे गड़बड़ आहे . यांच्या नेत्यांन मधे एकमत नाही.कार्यकर्ते आंधळे पणाने आक्रामक होतात. शिवसेनेच्या जुन्या कँपची ट्रेनिंग अजुन उपग्रेड झालीच नाहिये आणि म्हणून साहेबांनी आदेश द्यायची खोटी यांची राज -सेना आक्रमण करीत पुढे सरते मग याचे काय परिणाम होतील याची खंत नाही. किंवा चूक केली अस कबूलही करायचं नाही . खरतर मनसेने आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर लावण्याची गरज आहे ज्यात यांच्या कार्यकर्त्यांच थोडं ग्रुमिंग करता येईल . वाद म्हणजे काय प्रतिवाद कसा असतो. नैतिक लढाई कशी असते . दादागिरी न करताहि प्रश्न सुटू शकतात . तोड फोड म्हणजेच आंदोलन हि संकल्पना कशी चुकीची आहे . सध्या महत्वाचे मुद्दे कोणते ते कसे हाताळावे इत्यादी इत्यादी . कारण नाहीतर मनसेची दिखाऊ आंदोलक - गुंडगिरी सेना अशी ओळख अधिक गडद होत जाईल आणि याचा नक्की काय परिणाम होतो ते गेल्या निवडणुकीत अख्या महाराष्ट्रात फक्त एक आमदार निवडणून येतो यावरून सिद्ध झालेच आहे .
राज ठाकरें बद्दल-
यांच्या सारखा आक्रामक नेता महाराष्ट्रात असायलाच पाहिजे यात दुमत नाहीच फक्त आता त्यांनी त्यांची रणनीती रिसेट करण्याची गरज आहे. तस बघायला गेलं तर आजही वेळ गेलेली नाही अजूनही ते मराठी माणसाच एकमत करीत मतपेटी गच्च भरू शकतात त्यांच्यात ती ताकद आहे . पण त्यांच्या "उचल मुद्दे सोड" ची पद्धत आधी बंद केली पाहिजे .मराठी पाट्या ,नाशिक मधल काही मोजकं काम त्यांच थेट मनाला भिडणारं भाषण , मराठी माणसा बद्दल ची तळमळ असे अनेक जमेचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत बस अभी थोड़ा फुक फुक के कदम रखनेकी जरुरत है ......भविष्यात जर का राज ठकारे हे कार्ड चाललं तर अनेकांना ते महागात पडेल असा भाकीत राजकीय विश्लेषक करतायत त्यात नक्कीच पॉईंट आहे. .
यांच्या सारखा आक्रामक नेता महाराष्ट्रात असायलाच पाहिजे यात दुमत नाहीच फक्त आता त्यांनी त्यांची रणनीती रिसेट करण्याची गरज आहे. तस बघायला गेलं तर आजही वेळ गेलेली नाही अजूनही ते मराठी माणसाच एकमत करीत मतपेटी गच्च भरू शकतात त्यांच्यात ती ताकद आहे . पण त्यांच्या "उचल मुद्दे सोड" ची पद्धत आधी बंद केली पाहिजे .मराठी पाट्या ,नाशिक मधल काही मोजकं काम त्यांच थेट मनाला भिडणारं भाषण , मराठी माणसा बद्दल ची तळमळ असे अनेक जमेचे मुद्दे त्यांच्याकडे आहेत बस अभी थोड़ा फुक फुक के कदम रखनेकी जरुरत है ......भविष्यात जर का राज ठकारे हे कार्ड चाललं तर अनेकांना ते महागात पडेल असा भाकीत राजकीय विश्लेषक करतायत त्यात नक्कीच पॉईंट आहे. .
ताक -- ज्या ठिकाणी मनसेचे आंदोलन झाले ते मंदीराचे ठिकाण नसुन एक शाळेचे ठिकाण आहे तसेच या फोटोमध्ये सांगीतल्याप्रमाणे हे आंदोलन दादर मध्ये केले गेले नसुन ठाण्यात झाले आहे. याला उपाश्रय म्हणतात जैन धर्मं गुरु इथे थांबतात. जैन समाजात हे ठिकाण मंदिरा इतकंच पवित्र समजलं जातं.
सध्या फेसबुकवर वायरल होत असलेला एका मराठी वृत्तपत्राच्या फोटो क्याप्शन मध्ये ठिकाणाची गफलत झाली आहे. पण याचा अर्थ हे आंदोलन झालंच नाही आणि हा फोटो खोटा आहे असा दावा करण योग्य ठरणार नाही . इतकं होऊनही मनसे थांबली नाही त्यांनी कालच एका गुजराथी सोसायटी समोर श्रावण संपल्याची बिर्याणी पार्टी केली . याला वाद चिघळवणे कि आपली राजकीय डाळ शिजवणे हे आता आपले सुजाण नागरिक ठरवतील कारण अशा राजकीय पार्ट्या आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार घटनेने यांना दिलाय अर्थात मनसे - शिवसेना यांनी कितीही ह्याचं भांडवल केलं तरी यांच्या भूमिका किती संधी साधू आहेत हे आताशी लोकांनी चांगलंच जाणलंय हे लक्षात असूद्यात.
* अशी एका कोणत्याही समाजाची वाढणारी सक्तीची मुजोरी मोडून काढायलाच हवी पण त्याकरिता आपली ताकद एकवटली पाहिजे हे अस एक एका फौजा घेऊन लढाया करता येत नाहीत हे आपल्या इतिहासात स्पष्ट लिहिलेलं वाचण्यात आलच असेल आपल्या सारख्या अभ्यासकांच्या.
© संतोष टाकळे .

No comments:
Post a Comment