मुंबईत नविन होतो तेंव्हा हौसेने गणपती बघायला जायचा उत्साह दांडगा होता .लालबाग परळ विभागातले सगळेच महत्वाचे उंच च्या उंच गणपती रात्री उशीरा पर्यंत बघतानां गम्मत वाटे........ तेंव्हा तर मी अतिशय श्रद्धाळु अगदी नतमस्तक होणारा वैगरे .......आता तसल काही राहील नाही. कधी वाटलच तर सकाळी लवकर उठून पायी चालत जातो प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात अनवाणी चालतांना अजूनही जमिनिशी नातं कायम असल्याची जाणीव होते.रस्ता तसा शांत असतो त्यामुळे डोक्यात अनेक गोष्टी नव्याने विचारात घेता येतात. पहाटेचा लोकांचा दिनक्रम ....फुटपाथवर राहणारी माणस त्यांच्या मनाने आपण घरात राहणारे किती सुखी आहोत .आपल्या जगण्यातल्या असंक्य तक्रारींचा डोंगर कोसळून पडतो अशा वेळी
तर मूळ विषय असा की आज कित्तेक वर्षानी मुंबईच्या मंडळांचा आढावा घेण्यासाठी ऑफिशली ड्यूटी लागली आणि गिरगाव ग्रांट रोड च्या एकुण 10 मंडळांच्या गणेशाच कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने दर्शन झाल यातले कित्येक गणपती आज पहिल्यांदा पाहिले आणि वाटल अजूनही काही ठिकाणी निखळ उत्सव सुरु आहे. तो चाळीच्या मधल्या पटांगणात बसलेला गणपती ....अतिशय मोजक डेकोरेशन ......नेटक्या साड्या ल्यालेल्या चाळीतल्या वाहिनी -काकू -आणि अगदी आज्जीच लायीत वाजनार सात्विक भजन आणि सर्वात विशेष म्हणजे आगत्याने होणार तुमच स्वागत .....आता आम्ही जाहिरात दिलीय म्हणून महागड्या गाडीतून उतरल्या उतरल्या आमचा विशेष गौरव् वैगरे करण असल काही झाल नाही .आणि मुळात मला ते पटतही नाही आम्ही जाहिरात देतो म्हणजे आम्हाला आमच्या प्रोडक्टला मार्केट करायचय हा आमचा निव्वळ स्वार्थ आहे .त्यात विशेष सन्मान स्विकारण्या सारख काही नाहीच.
पण या निमित्ताने मात्र एक संगावस वाटतंय की अख्या मुंबईत फक्त लालबागचा राजा , तो सावुथवाल्यांचा माटुंग्याचा श्रीमंत गणपती , आणि असे नेमके नवसे गणपती बसलेले नसुन इतर चिखल वाडीचा ,तुलसी वाडीचा , नाना चौकातला गिरगावकरांचा,ग्रांट रोड वाल्यांचा असे अनेक पारंपरिक बाज असलेले गणराय विराजमान झालेत याची आपल्या तमाम मागणी खोर भाविकांनी नोंद घ्या नवसाचे दाग दागिने.,पेढ़े नारळ या करोड़पति गणपतीनां वाटून झाले असतील तर जरा वाट वाकड़ी करत या बाकीच्या गणेशांच दर्शनहि घ्या.... थोड़ अधिक समाधान वाढेल तुमच्या नवसीमय काळजात.
© संतोष टाकळे .

कधी वाटलच तर सकाळी लवकर उठून पायी चालत जातो प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात अनवाणी चालतांना अजूनही जमिनिशी नातं कायम असल्याची जाणीव होते >> wah awadesh he wakya.. :)
ReplyDeleteधन्यवाद जिप्सी
ReplyDelete