मायेन रग्गड श्रीमंती असलेली माणसं .................!

गावी आईनं चुलीवर तवा ठेवला कि लगेच ताट घेऊन तिच्या पुढ बसायचं थाल्यातल्या पिठाला दोन हात मळत ………गोळा थापीत तिच्या बोटांचे ठसे उमटलेली भाकरी तव्यावर पडली कि मग भाजीचा रस्सा वाढायला घ्यायचा ………………… आई काळ्या वाटण्याची उसळ ………. सहीच ना ………………भाकरीला पाणी लावत मग तिनं म्हणावं हो तुला आवडते म्हणून मुद्दाम केली . वाटीभर रस्सा मग मनसोक्त तृप्त होऊन खातांना तीनं आठवणीन आपल्यासाठी प्रेमानं बनवलेल्या त्या रश्यात मसाल्यांच्या फ्लेवर पेक्षा तिच्या मायेच्या हाताची चवच अधिक चीभेवर रेंगाळत राहते . आणि कित्तेक दिवसात पोट तुडुंब भरल्याचं समाधान सुखावून जातो . आज पुन्हा तसा योग आला निमित्त होतं मातृतुल्य असणाऱ्या मीनाक्षी मॉम ने पाठवलेल्या सरप्राइज टिफिनचं

त्यांच्या हातच्या मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत हाणणं म्हणजे डब्याचा तळ पुसून खाण्याइतपत चा हवरटपणा …………… कधी काळी एकत्र काम करीत असतांना त्यांच्या टिफिन मधली हि रेसिपी इतकी फेवरेट झाली कि पुढे कामाचं ठिकाण बदललं तरीही दर भोगीला दोन भाकऱ्या आणि भाजीचा हाक्काचा डबा ऑफिसला पोहचता होई. गेल्या संक्रातीला चुकलेला डबा ………… बर्थडेच निमित्त साधीत आज पोहचता झालाय .तीच authentic टेस्ट सोबत या बेभरवशी मुंबापुरीत दुसऱ्या आईचही तितकंच निखळ प्रेम त्यात कठोकाठ भरलेल……… प्रत्येक घसागणिक जिभेवर जाणवत होत. मुळात या धावत्या शहरात स्वतः साठी वेळ नसतांना कुण्या मानलेल्या मुलांसाठी दोन भाकऱ्या थापणारी हि माय कायम हाक्काने माझ्या मागे उभी राहते. चुकलो तर कान पिळते ………काही मिळवलं तर भरभरून कौतुक करते . कधी आजारी असलो तर डोळ्यांच्या कडा पाणवे पर्यंत हसवते ………………आणि महत्वाचं म्हणजे निस्वार्थी निखळ खरं प्रेम करते . अनेकदा माणस नुसती शब्दांन जोडली जातात आणि मग त्यांचं रूपांतर अशा घट्ट नात्यात होत.
कधी कधी रक्ताची नाती वैरी होत जीवावर उठतांना पहिली कि असल्या जोडलेल्या नात्यांचा हेवा वाटतो .शेवटी पैसा - जमीन - संपत्ती मिळेलहि वारसा हक्काने पण अशी मायेन रग्गड श्रीमंती असलेली माणसं भेटायला मात्र खरचं भाग्य असावं लागतं .

"MoM"

Thank you so much for all your love and support throughout my life. 

"खळखळ "लंडनच्या घरासाठी …………!








लंडन मधल डॉ . बाबासाहेबांच ते घर घेण्यासाठी कुणाचाच आक्षेप नासवा कदाचित नसेलही. पण ह्या घराभोवती राजकारण आणि त्यावर उथळ चर्चा कारणाऱ्यांनी जरा आपल्याच देशातल्या स्मारकांचा आढावा घ्यायला हरकत नाही .

बाबासाहेबांनी समतेचा संदेश देत महाड़च्या ज्या चवदार तळ्यातलं  पाणी ओंजळीत घेत सगळ्यांसाठी खुल केल.त्या स्मारकाची आजची स्थिती काय.......एकेकाळी ज्या पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह झाला . त्याच पाण्याचं आज काळ्यापाण्यात रूपांतर झालय. याच आवारात असलेल्या ऑडिटोरीयमच्या दरवाज्याला जास्ती वेळ टाळ लोंबकळलेल असत. अस्वछता आणि बाकि इतर नॉन मेंट्नन्स गोष्टींची तर यादिच देता येईल. काही उपवाद वगळता अशीच काहीशी अवस्था देशभरातल्या अन्य स्मारकांची आहे थोड़क्यात काय तर जे आपल्या हातात आहे तेच आपल्याचानी सांभाळता येत नाही तर त्या लंडनच्या घराच काय करणार आहोत आपण ?

 आजच्या  यावरच आधारित असलेल्या एका वुत्तवाहिनीच्या चर्चा सत्रात हे घर घेतल्याने  सामान्य आंबेडकरी जनतेत नेमका काय  संदेश जाईल ? या प्रश्नाला अभ्यासु विचारवंतानी दिलेल उत्तर नेहमी प्रमाणे भावना प्रधान होतं.

मुळात इंदु मिल मधल प्रस्तावित डॉ .बाबासाहेब किंवा छत्रपति शिवाजी महाराजांच त्या अरबी समुद्रात वैगरे जे स्मारक बांधण्याचा आपण करोडो रुपये खर्ची घालण्याचा घाट घालतोय त्या पेक्षा महाजांच्या पावन स्पर्शाने इतिहासात अजरामर झालेल्या रायगडावर तो काळ पुन्हा तसाच उभा करणारं एक उत्तम जागतिक दर्ज्याच भव्य स्मारक का नाही उभारू शकत . त्या अरबी समुदातल्या खडका पेक्षा पराक्रमी रायगडचे स्वराज्याची साक्ष असलेले भक्कम बुरुज जास्ती उजवे नाहीत का ? इंदू मिल - अरबी समुद्र आणि स्मारकं यांच्या अस्मितेच्या उपऱ्या भांडवलावर येत्या पुढील काळात किती निवूडणुका होतील हा पाहण्याचा विषय आहे . 

अहो हे सगळच ठेवा बाजूला आदि त्या गावाबाहेर आजही पोटा- पाण्यासाठी , याही काळात मानान उभ राहून समाजात खंबीर पणे वावरू न शकणाऱ्या  , अन्यायाच्या जोखड़ाखाली दबलेल्या- पिचलेल्या आंबेडकरी आणि इतर उपेक्षित बांधवांना आपण कधी या व्यापातुन बाहेर काढणार आहोत.

जितकी धडपड आणि खळखळ लंडन च्या घरासाठी आहे. त्यातली किंचितशी तळमळ इथल्या वस्तितल्या उंबऱ्याशी पोहचावी हि माफक अपेक्षा .............बाकि देशी -परदेशी आपला डंका वाजलाच आहे. …………………बोलो बजा कि नही ?

© संतोष टाकळे .

* फोटो सौजन्य - ABP MAZA News Network 



उशिरा सुचलेल्या अक्कले खातर................!


ये चला लवकर लवकर थर लावा .....रेन डान्स....... रेन डान्स .....बस बस बाकी बरीच मंडळ खोळंबली आहेत......... ताड़वाडिचा गोविंदा तुमच्यान जमतय का? की दुसऱ्या मंडळाला बोलवु.......कशाला टाइम पास करताय हो ……………. बाजूला व्हा तुमच हजेरिच पाकिट घेवून जा ...........वा … वा कसला भारी प्रयत्न बाल गोविंदा 9 व्या थरावर चढ़ताना .....माध्यमांच्या प्रतिनिधीनी जरा हे ही दाखवा (स्वतः च्या मालकीचे मिडीया हाउस असल्यागत ऑर्डर देत ) काय डेरिंग असते या खेळात .....वर पाच मिनिटांची अति शानपणा शिकवणारी वायफळ बड़बड़ ......चेहऱ्यावर सत्तेची गुर्मी , पैशाचा माज , वागण्यातला बड़ेजाव थाट आणि तरीही आपले गोविंदा पथक लाल गाळीत ट्रक -लॉरी- बसी करून असल्या माजलेल्या लोकांच्या दारात गोंडा घोळत पोहचतात . खरतर पहिल्यांदा यांना अक्कल आली पाहिजे. त्यांन लाख वाटायला काढले असतील म्हणून आपण हजार जमवायला जायच भिकाऱ्या गत.
मुळात ज्यांना यापूर्वी कुणी धुप घालून विचारीत नव्हतं आज ते वेल नोन चेहरे झालेत. कशी प्रसिद्धी मिळेल या पेचात असलेल्यांनी अकलेपेक्षा उंच हंडया बांधल्या आणि कल्पनेच्या आयडियाची चांदी झाली.घाटकोपरला सर्वात उंच दाहिहंडी बांधणारा कीर्तनकार पुढे तिकडूनच आमदार म्हणून निवडून होतो .पब्लिकच्या चंगळ आणि श्रद्धेला इंनकॅश करीत शिर्डी पंढरपूरच्या मोफत यात्रा - आणि रिसोर्ट फार्म हाऊस च्या जंगी ओल्या पिकनिका आयोजित करणाऱ्या भाऊला आपले इमोशन्स बेस शीघ्र गंडी लोक्स त्याच्या गुनगाणाचा पिठ्या पाडीत अधिक मोठ करतात.कि भविष्यात विक्रमी मतांनी निवडून देत भाऊच्या गळ्यात मंत्री पदाचा बहुमान देखील मिळवून देण्याची यांची ताकद असते.

किमान ह्यावेळी तरी बऱ्याच उशिरा सुचलेल्या अक्कले खातर पाऊस -शेतकरी असे हायीप असलेले TRP बेस मुद्दे पुढे करीत ठाणेवाला कोकलणार नाही हे दिलासा देणार आहे . 

पण अजुन वरळी वाला ,घाटकोपर वाला , चेंबूर वाल्यांना साहेबांचा निरोप पोहचलेला दिसत नाहिये . कदाचित त्यांनाही येत्या काळात पाझर फुटायची दाट शक्यता आहे. 
.आता इतक्या वर्षात राज्यात यांची सत्ता आणि सोबत केंद्रीय कृषी खातं हातात असूनहि ज्यांना शेतकर्यांच भल करण जमल नाही. तेच साहेब कनवाळू होत शेतकऱ्यांसाठी बांधावर उतरले म्हटल्यावर पक्षीय निष्ठावंत नेत्यांच्या पापण्या ओल्या झाल्या नाही तर नवलच.

© संतोष टाकळे .

* फोटो सौजन्य - दैनिक लोकसत्ता. 

आक्रोशाच इव्हेंटीकरण………….!








डॉ.दभोलकरांना मारणारी आणि कॉ.पानसरेंची हत्या करणारी विकृत माणस आपल्यातलीच आहेत.किंबहुना अनेकांना या बाबतची नेमकी माहिती असण्याची शक्यता आहे .यंत्रणा सफशेल अपयशी ठरतेय हे मान्य पण मग किमान ज्यांना यातला धागा दोरा माहित आहे त्यांनी पुढे येत गुन्हेगारांना पकडून देण्यात पुढाकार घेतला पाहिजे . मुळात हा विचारांचा खून आहे .हे असले उद्योग आपण सहन करीत गेलो तर अशा आतंकी लोकांच धैर्य अधिक वाढत जाईल. 

नुसत्या तिथीला या विचारवंतच्या हत्येचा आक्रोश व्यक्त करीत त्यांच इव्हेंटीकरण घडवीत . मेंणबत्या पाजळीत फिरण्यात काय पॉइंट आहे . दाभोलकर गेल्यानंतर दोन वर्षात नेमकं काय विधायक काम आपण केलय याचा प्रसार व्ह्ययला हवाय ,किती वेळा सरकारला धारेवर धरित या तपासा संधर्भात जाब विचारलाय याच्या बद्दलचे अपडेट लोकांना दिले पाहिजेत , माणूस मारला की त्याचे विचारही मारले जातात ही अंधश्रद्धा खोडून काढली पाहिजे ,तथाकथित लोकांना लुबाडणाऱ्या ढोंगी बाबा -मातांना जेरबंद करण्यासाठी आपण आग्रही असल पाहिजे .माध्यमांना चर्चेचे गुराळ पुरवण्यात, फोटो क्यांप्शन स्टोरीज क्रिएट करण्यात आणि चला हवा येवूद्या च्या सेट वर भावनिक होत आपण जो माहोल तयार करतोय तो डॉ दाभोलकरांना कधीच अपेक्षित नव्हता .

सर तुमची प्रत्यक्षात कधीच भेट झाली नाही पण सतत तुम्ही तुमच्या लिखणातून भेटत राहिलात. 
आज व्ययक्तिक आयुष्यात कर्मकांडाना नाही म्हणण्याच बळ तुमच्या मुळेच आलाय .


हीच काय ती तुम्हाला श्रधांजली............! 

© संतोष टाकळे .

भूषणाच लॉबिंग .........!


"आपल्याकडे आधी वाद - प्रतिवाद आणि मगच मिळेल पुरस्कार " असा नवा ट्रेंड सेटल होतोय . यात अभ्यासकां पासून ते नवख्या प्रसिद्धी वलयात थोडे उजळ झालेले लोकही भरभरून बोलतांना दिसतायत. त्यात आता आपल्याकडे राजकारण्याचा मुलगा राजकारणी च्या चाली वर सामाजिक कार्यकर्त्याचा वंशज समाजवादी वैगरे असं उत्तम घराणेशाहिच्या बेस वर सगळं सेट होतांना दिसतंय आणि अशा चर्चेत आता नवे चेहरेही वारसा हक्काने बोलतांना दिसतायत . "पुरंदरें" यांना महाराष्ट्र भूषण देऊ नये या मागणीत मोजके चार दिग्गज सोडले तर बाकी सगळेच न्यू कमर्स आहेत. इतकंच काय तर "मलाला आणिक "सत्यार्थी" ना नोबेल मिळाल्यावरही यापैकी अनेकांनी तोंडसुख घेतल.

एकंदरित आपली सन्मान देण आणि घेण या बद्दलची संकुचित मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, विचारवंतांची लॉबिंग , टार्गेटीकरन अशा अनेक गोष्टी नव्या वादांना जन्म देतात वा निर्माण करतात . आणि आपल्या या धसमुसळ्या गोंधळात आपण सर्वोच्च बहुमानाच्या प्रतिष्ठेच्या आणि अभिनामाच्या सन्मानांच गांभीर्य घालवून बसतो आहोत. हे ज्यांच्या लक्षात येतंय तेहि मुग गिळून गप्प आहेत हे जास्ती विदारक चित्र आहे.


तो पुरस्कार राहिलाय एका बाजूला आणि आपण एस्ट्या जाळतोय ,एकमेकांच्या जाती चा उद्धार करतोय , कुणी पान भर बॉल्ग लिहत त्याचा समाज किती योग्य बाकी कसे अयोग्य याची तुलनात्मक मांडणी करतोय , आगलावे बारामती कर वातावरणात अधिक उष्मा घलतायत, राज ठाकरे स्पेशल मुलाखती देतायत , मिडिया उथळ चर्चा घडवयतायत ,उशिरा का होईना संजय राऊत ही सामना करायला पुढे आलेत , बाकि पेड़ विचारवंत त्यांच्या त्यांच्या क्षमतेने कोकलतायत , सोशल नेटवर्किंगवर तर अक्षरशः उत आलाय.

पण या निमित्ताने अनेक कट्टर चेहरे मात्र उघडे झालेत. त्यांची नेमकी वैचारिक पातळी किती हेही सिद्ध झालय. पुरोगामी म्हणणारे कसे चतुर संधी साधू आहेत याची प्रचिती आलीय.
पन तरी महाराष्ट्राच जे जगभर हसु झालय त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत.
ज्या महाराजांनी या मुलखाच्या इब्रति खातर रक्त सांडल त्याच महाराजांच्या इतिहासाचे वाभाड़े काढित काही टोंनगे जो आतंक मजवता आहेत त्यांना ठेसल पाहिजे कसले ब्रिगेड चलावतायत हे खंडणी खोर ..........यांची खरतर लायकी नाही महाराजांच नाव घेण्याची.
पण आज अत्यंतीक वाईट वाटतंय मराठी विशेष करुन महाराष्ट्रियन म्हणून हा इतक्या खालच्या लेवलवर गेलेला वाद आणि झाला प्रकार पहतानां
.
शेम ऑन यु डर्टी मांइड महाराष्ट्रियन्स

© संतोष टाकळे .

गटारी





खालीदकड मटन आणायला बाबांच्या सायकलवर सकाळी ५ च्या सुमारास फणसाच्या वाकणातून मार्केटच्या दिशेला जातांना. आज मटण या नुसत्या कल्पनेने तोंडाला पाणी सुटलेलं असायचं . बाबा दोन नळ्या घेऊया हा  …………कलेजी वेगळी मागा ……२ किलो कसं पुरेल ३ किलोतरी घ्या ………असा हवरटपणा चालू असतांना बाबा मात्र सायकल पळवत रस्ता कापत असायचे थोडा उशीर झाला तरी गर्दी वाढेल हवं तसं मटन मिळणार नाही या काळजीत ……………आम्ही मार्केटला पोहोचायचो तेंव्हा खालीद चाचा पहिला बकरा कटवायची तयारी करीत असायचे . शब्बीर पानी ले बेटा ………चल जादा टाईम निकालू नक्को ………सलटादे जल्दी ……५ एक मिनिटांत बकऱ्याची एक ओरड कानावर पडायची आणि मग मोजून १५ मिनिटात निथळणारा बोकड शब्बीर अकड्यात उलटा लटकवायचा. 

खालीद चाचा अल्लाचं नाव घेत पहिला घाव घाली आणि मग लायनीत उभ्या असलेल्या २०-२५ जणांच्या  किलो वारी पिशव्या पुढे होत . कुणाला चापच हवेत तर कुणी इतनी चरबी मत डालो चाचा म्हणीत वाद घाली . आणि १० वाजायच्या आत बोकडाचा बाजार उठत असे ……………………खालीद चाचाने माझ्याकडे बघत ……मेरे बच्चेकू ये थोडा जादा कलेजी म्हणत दिलेला extra काळजाचा एक कोपरा आई वेगळ्या टोपात शिजवी …………….मटन- वडे यांच्या दर्पान  घरभर पसरलेला गटारीचा माहोल त्यात बाहेर कोसळणारा धो - धो पाऊस ……………संत्री -नारंगीची एक कॉटर  मारून रंगात आलेल्या अण्णांची जुनी गाणी चुलीच्या निखाऱ्यात भाजलेल गावटी कोंबडीची खरपूस कलेजी असं बरंच काही आजही कोकणात होत असतं ……………फक्त आपण तिथ नसल्याची हुरहूर लागून राहते. शिवाय  इथल्या शहरातल्या मटणातल्या चवीत कितीही ब्रांडेड मसाले घाला त्या गावच्या चवी इतकी रियल टेस्ट इथ मिळत नाही. कारण गटारी शिमगा निमित्त मात्र आहेत खरं तर आपल्या माणसां सोबत दोन घास समाधानान  खावं ह्यात खरा आनंद दडलेला आहे नाही का ? 

© संतोष टाकळे .


Note - आज दिवसभर गटारीच्या शुभेछ्या देणाऱ्यां मित्रांना  हि पोस्ट समर्पित

BAN - बाबा - माता @ इंडिया ……………!


सुमारे १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट दुपारच्या मध्यानं प्रहरी टाळ मृदुंगाचा गजर कानावर पडला आणि इतक्या भर उन्हात रस्त्याने नेमकं काय निघालय हे बघायला लोकांची गर्दी अंगणात कुंपणाच्या कोपऱ्यावर जमली . तब्बल ५० एक जणांचा ताफा पुढे चाललेल्या तीन माणसांच्या हातात सोनेरी फ्रेम असलेले फोटो दोन माणसांचे एक बाईचा तिघंही राजबिंड वर्णाची त्या फोटोतल्या बाईंच्या अंगावर भरजरी साडी ,नाकात थोरली नथ , ओठाला भडक लाल रंगाची लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यात ठसठशीत दागिने , मधला फोटो विरप्पन सारख्या मिश्या असणाऱ्या माणसाचा त्याच्या मागे रुद्र अवतारातला हनुमान पुढे हा सलमान स्टाईल पोज देत उभा असलेला,मागून दिव्य प्रकाश वैगरे दाखवलेला , आणि शेवटच्या फोटोत एक गोंडस प्रसन्नं चेहरा असलेला मध्यम वयीन माणूस त्याच्याही मिश्या थोड्या वळणदार आणि एक मध्यम वयीन त्याच्या एकंदरीत लुकला बघून त्याच्याकडे दिव्य शक्तीचा आभाव असल्याचं  जाणवत होतं . या तिन्ही तस्बीरींना वरून केशरी चंदनाचा नाम लावलेला , मंद वासाच्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा हार घातलेला शिवाय वर वेल्वेटच्या नक्षीदार शालीच उपरणं त्या काळच्या वैरागी बाबांच्या जमान्यात अशा आय कॅन्डी धार्मिक गुरूंच्या ओजस्वी दर्शनाने रस्त्याच्या दुतर्फा जमलेले लोक हात जोडत होते . कुणी त्या ओळींन चाललेल्या भक्तांना निरखुन न्याहळत होत . तर कुणी कोण ही नवी महाराजी  फ्यामीली अशा संभ्रमात पडलेला तस अजुन विशेष आकर्षण म्हणजे या ताफ्यातल्या बऱ्याच जणी निट्सर साड्या नेसलेल्या फोटोतल्या त्या गुरु बाईंशी काहीसं मिळतं जुळतं म्हणजे लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यातले ठसठशीत दागिने वैगरे वैगरे , पुरुष मंडळीही अगदी निट नेटकी उंची कुर्ते घातलेले वैगरे ……………१५ एक मिनिटांत हा ताफा पुढे सरकता झाला. पण अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा दुखी:तांचे दुखं: तोच हारी ………अशा मंत्र घोषाच्या नामस्मरणाने अवघा माहोल अध्यात्मिक झाला . आणि या नव्या महाराजांच्या चमत्कारांच्या आणि त्यांच्या लीलेच्या भाकड कथांना उत आला . बायका काय बाय चढवत अधिक रंगवत चर्चेत उत्सुकता आणीत होत्या शिवाय ज्यांच्या घरी ह्या बापूंच्या, त्यांच्या गुरुपत्नीच्या आणि गुरुबंधुच्या तस्वीरी आल्या होत्या ते गावातले तसे प्रतिष्ठित सदगृहस्त म्हणजे सहाजिकच विश्वास अधिक दृढ होणार यात शंकाच नाही.
पुढे हा सत्संग ४ दिवस चालला गावातले अनेक सामान्य आणि नामवंत लोकांची दर्शनाला रीघ लागली . यजमानांनी येणाऱ्या प्रत्येकाला चहा ,नाश्ता, आरतीच्या वेळी विशेष प्रसाद म्हणून साजूक तुपातल्या शिऱ्याच्या पुड्या , विभूती , गुरुजनांचे पूजेला लावता येतील असे दिव्यप्रकाश रहित फोटो , त्यांची महती प्रकट करणारे चालीसा , मंत्रांची पुस्तके असं compact रिटन गिफ्ट म्हणून दिलं .जे गावात अनेकांनी देवघरी प्रतिष्ठपिठ केल्याचं आठवणीत आहे ...... त्यातल्या त्यात इथ येणाऱ्या आणि अगदीच खास असणाऱ्या VVIP पुरुष दर्शनार्थीला बापूं -माई- दादांच्या फोटो समोरचा नारळ , हार , फळ, शेला किंवा महिला VVIP नां माईंना घातलेला गजरा- वेणी वैगरे देत त्यांना उत्सवपीठाधीन यजमान आणि त्यांच्या सौ कृतकृत्य करतांना आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तांच्या नजरेत हे आपल्या नशिबी का नाही? याची खंत प्रखरपणे जाणवत असे. बर शिवाय यात प्रशासकीय , शैक्षणिक, वैद्यकीय , राजकीय क्षेत्रात बहुचर्चित असणऱ्या व्यक्ती असल्याने कुतूहल अधिक जास्ती शिगेला पोहचणारं .
एकुण चार दिवसांचा सत्संग , भजन ,आरत्या , नामस्मरण अशा अती भारावलेल्या या अध्यात्मिक उत्सवाला रोज भरगोस गर्दी करणारे अनोळखी चेहरे हळूहळू ओळखीचे होतात मग त्याची गट्टी जमते पुढे ते बापू -माई भक्त म्हणून सदमार्गी होतात . आणि तस्बीरीं आणताना असणारा ५० जणांचा ताफा आता २०० च्या वर संख्याबळ गाठतो . शिवाय इथ येणाऱ्या कुणाकुणाचे किती प्रॉब्लेम या नव्या ओळखीच्या माध्यमातून मार्गी लागतात. आता सामान्य बापू भक्ताच्या मदतीला सिस्टीम मधला बापू भक्त उभा राहिला म्हटल्यावर आणिक काय हवे . भक्तीच्या या प्रवाहात अनेक नवे चेहरे येत राहतात त्याचंही   कल्याण होत राहतं पुढे भक्तीच्या या गर्दीत हळू हळू कमर्शियल गोष्टींचा  शिरकाव होतो मग त्यात एकरोंच्या परिसरात पसरलेले आश्रम , बापू माई यांच होम प्रोडक्शन असलेली पुस्तकं , पोथ्यां , सोन्या चांदित मडवलेले लॉकेट्स,अगदी दंतमंजना पासून ते अंगाच्या साबणा पर्यंतची दुकानदारी  भक्तानां लुटण्याचा व्यवसाय सुरु करतात याचं रीतसर कंत्राट काही खास लाल गाळू भक्तांच्या पदरी पडतं आणि पैशाचा ओघ बाबा मातेंच्या दिशेने वळता होतो . सोबत  हजारोंच्या बोलीत होणाऱ्या पादपूजा , महारुद्र अभिषेक , चंडीयज्ञ आणि आता राधे माँ च्या जनरेशन मधे पप्पी, झप्पी , गोदीत घेणं फ़िल्मी गाण्यांवर नाचण खिदळणं वैगरे वैगरे .
आक्षेप असा कि पैशाचा पाऊस पाडणारा हा धंदा जेंव्हा राजरोसपणे चालू असतो तेंव्हा नेमकी आपली यंत्रणा काय करीत असते . राधे माँ , आसाराम , नित्यानंदा या भोदुंच्या मुसक्या आवळणे आपल्याला आधी का शक्य झाले नाही. हा कसला भक्तिचा बाजार भरलाय त्याची चौकशी का केली जात नाही.  वा आताही त्यांच्यावर कार्यवाई करण्या करिता इतका विलंब का लागतोय? याचं कारण भारतात चमत्काराला तत्काळ नमस्कार करणाऱ्या मूर्ख लोकांच लाक्षणिक संख्याबळ आहे . त्यांच्या धार्मिक भावना लागलीच दुखावल्या जातात . कहर म्हणजे काहीजण तर बाबा -माता -गुरुमाँ यांच्या आश्रमाबाहेर सशत्र त्यांच्या बचावार्थ मार्शल च्या रोल मधे उभे ठाकतात हमारी जान  लेलो लेकिन हम आपको बापू को हात लगाने नाही देंगे इतक्या आवेषांत यांची भक्ती उफाळून येते हे आपण या पूर्वीही पहिलच आहे ………………पण तरीही आपण मात्र नेहमी प्रमाणे प्रशासनाच्या नावाने शिमगा करीत बसतो  पण खरतर त्यापेक्षा आपल्या मानसिकतेच्या बुरसटलेपणावर थोडा विचार केला तर . आपल्याला नेमकं उत्तर सापडेल. नाहीतर आता फ़ोर्स ने चालू असलेल्या मेजर ब्रेकिंगस् मग पुढे थोडक्यात बातम्या झाल्या कि लोक हा प्रकार विसरणार हे ज्यांना माहित आहे त्यांचे बाजारू दरबार यापुढेही खुले होत राहतीलच आपल्या भारतीय डोळेझाकू भक्तांच्या कल्याणार्थ. 

© संतोष टाकळे .

Note - वरील लेखाने कुणाच्याही अध्यात्मिक भावना दुखावल्या असतील तर त्यांनी तात्काळ क्षमासहत्र मंत्र किमान १० वेळा म्हणावा राग तर शांत होईलच आणि मनही प्रसन्नं होईल यात शंकाच नाही.


आपलं शिवार आपली माती ..........!


मुसळधार पावसात आपल्या शेतातल्या चिखलात उतरण्याची मज्जा काही औरच कारण हल्ली आपण बहुतांशजण माती पासून वेगळे झालोयत म्हणजे सध्या गावातल्या घरासमोरही शेणानं सरावलेल्या अंगणाजागी कोटा लादी लाऊन त्याला लॉन बनवण्याचा नवा ट्रेंड आलाय . काळ बदलतोय आणि त्याबरोबर अनेक पारंपारिक गोष्टी या काळाच्या ओघात कालबाह्य होता आहेत . म्हणजे कोकणातल्या अनेक घरात हल्ली जातं - उखळ - पाटा -वरवंटा,व्हाइन , अशा त्या काळातल्या वस्तू एकतर अडगळीत पडल्यात किंवा थेट त्यांना वळचणीला उभ करून ठेवण्यात आलाय . एकेकाळी ज्यांच्यावर दैनंदीन जीवनक्रम अवलंबून होता आज त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न असा ओसरीच्या कोपऱ्याला येऊन थांबलाय . जे ह्या वस्तूंच होतंय ते आपल्या माणसांच आणि शेतीचं होऊ नये यासाठी आपण आता शेतात उतरण्याची गरज आहे . नाहीतर कालांतराने हे फक्त आठवणीत राहील कारण आता राबणाऱ्या हातांचाही उत्साह आणि ताकद कालांतराने मावळणार आहे .

आज कदाचित तुम्ही उच्चशिक्षित असाल तुमचा हुद्दा किंवा सध्याच स्टेट्स असले चिखली प्लान करू नयेत म्हणून रोखत असेल तर त्याची समजूत काढा त्याला सांगा जो आपण आलिशान घराच्या डायनिंग टेबलवर कसल्याशा महागड्या ब्रांडचा वाशीक तांदूळ सिल्वर कोटेट स्पून ने खातो ना तोही याच चिखलात उगवतो तो खाताना जितकं समाधान मिळतं त्यापेक्षा जास्ती स्वर्गीय आनंद तो पिकवण्यात आहे .
गावाकडच्या या राबणाऱ्या हातांना तुम्ही फक्त सोबत द्या ……………वीक एन्डला धबधबे आणि रेसोर्टच्या पार्ट्या झोडण्या पेक्षा थोडा मोह मोडीत गावाकडच्या आपल्या शेतात चार आवे लावण्यासाठी वाट मोडीत गावाकड चला या पावसाळी महिन्यांचा एखाद्या आठवड्याचा शेवट आपल्या शेतीत काम करून अधिक जास्ती यादगार करा कोसळणाऱ्या धबधब्या समोर कसा शेल्फी काढता तसाच शेल्फी नांगराच्या जोडी समोर काढा हवा तर ……………फेसबुकिंग आणि इतर सोशल मिडिया वर टाका हे फोटो मिळवा प्रसिद्धी किमान इतरांनचीही इच्छा जागृत होईल याने ………… शिवाय बांधावर बसून चहा अनुभवा ………………नाचणीच्या भाकरीवर कोलिमाच्या अजोड तोडीच्या चवीची अनुभूती घ्या …………लावणीच्या पारंपारिक गाण्यांचा बाज जरा घुमुडे कानात DJ च थिरकण ठेवा काहीवेळ बाजूला , संध्याकाळी भिजून आणि राबून आंबलेल्या अंगावर गरम गरम पाण्याची शेकत अंघोळ करा बघा थकवा कसा फटक्यात उडून जातोय…………. शहरातल्या "स्पा" च काय घेऊन बसलात या पुढे ………….आणि मग रात्री गरम गरम भातावर कालवण घेत जेवतांना कित्तेक दिवसांनी मन तृप्त होईल तुमचं आणि तुमच्या सोबतच्या माणसांचही कारण त्यांनाही कायिक दिवसांनी त्यांचा माणूस तृप्त जेवल्याच डोळे भरून पाहता येत ……………… तसहि भाकरीच्या शोधत गाव सोडलेल्या तुम्हा आम्हा चाकरमान्यांना या चार चवुत भाकरीची किमंत सांगण्याची गरज नाही. तिच्याच शोधत घर सोडून वणवण भटकताना मात्र घराकडं पाठ होणार नाही याच भान असलं पाहिजे . म्हणजे पुन्हा हे घर आपल्या आठवणींच्या धुक्यात धुसर होत जातं. आभाळ परत कधी निरभ्र होईल या प्रतीक्षेत. 

© संतोष टाकळे .

समानधर्मी - "स्तंभ विचार परिषद"




राज्यस्तरीय स्तंभ विचार परिषदेच हे माझं पाहिलंच वर्ष .प्रियाने दोन चारदा बजावून सांगूनही मला उशीर झालाच अर्थात इथल्या धावत्या मुंबईतून थोडं बाहेर पडावं म्हटलं तर कायिक गोष्टी मार्गी लावाव्या लागतात . आधी पेडींग सगळं पूर्ण करा आपलं काम सहकाऱ्याच्या पदरात घाला त्याची इच्छा असो वा नसो …………… अगदी त्याच्या गळ्यात मारून कितीदा सुटावं लागतं . मग ऑफिसच्या लिफ्ट मधून खाली येता येता परत एकदा उजळणी घ्या काय बाकी राहिलंय का ? आता गाडी कितीची मिळेल ती कितीला पोचणार तिथून पुढं काय करायचं……… या विचारांची भेळ होत असतांना पोटातहि आग पडलेली असते आणि इतक्यात आठवतं गडबडीत चार्जर राहिला .आता पुन्हा वर जायचं म्हणजे अजून पुन्हा नवीन कामात अडकण्याचे चान्सेस जास्ती म्हणून मग सरळ पुन्हा स्टेशनच्या दिशेने निघावं म्हणीत सिंग्नल कॉर्स करावा तर पुन्हा प्रियाचा मेसेज कुठे आहेस कार्यक्रम सुरु होईल एक तासाभरात. इतका राग येतो स्वतःचा अशा वेळी आपण कधीच वेळेत पोहचत नसल्याचा संताप आवरता येत नाही . but work come first …………रस्त्यात पोटात भर म्हणून दोन बिस्किटाचे पुडे घेत एकदाची लोकल पडकून मार्गस्थ झाल्यावर खिडकीतून येणाऱ्या सुसाट हवेत अनेक जुने दिवस ताजे होतात कितीतरी गोष्टी नव्याने आठवतात आणि वाटत ते दिवस तसे जास्ती बरे होते . कुठेही कधीही जाता येत होतं. पण जगायला पैसेही लागतात या मताशी सहमत होतांना अंधुकसा कपाळावर ताण येतो . आणि पुन्हा नको ती चर्चा म्हणीत ब्यागेत टिपणं ठेवलेल पुस्तक काढीत त्यात डोकं खुपशीत नव्या विषयाकडे लक्ष वळवाव लागतं . अखेर तासाभरात पनवेलच्या फलाटावर गाडी लागते . घडाळ्यात उशीर झालेली वेळ पुन्हा पायात त्राण एकवटते आणि आता अजून ५- ६ किलोमीटरच्या अंतरकापीसाठी पुन्हा शोधा शोध ………………यात अर्धा तास मोडल्यावर एकदाची बस मिळते.कोकणातल्या ओळखीच्या रस्त्यावर लागेलेली बस जेंव्हा थांब्यावर उतरवते तेंव्हा पार काळोखात युसुफ मेहरअली सेंटरचा बोर्ड दिसल्यावर अक्षरश: एस फायनली म्हणीत धावत आत जाण्याच्या घाईत. अंधारात ठेचकळायला होतं तेंव्हा उजेडात पोहचण्याच महत्व आणि एकदा प्रकर्षाने जाणवतं . 

स्तंभ विचार परिषदेचा कार्यक्रम कुठे आहे . इकडून आत जा आणि मग उजव्या हाताला वळा तिथे पुढे स्टेज आहे तिकडं चालू आहे तो पोग्राम - सेंटरचा कर्मचारी एका फटक्यात इतकं सांगून वळता होतो . त्याने सांगितलेल्या दिशेने साउंडच्या डेक वर ओळखीचा आवाज येत असतो . दोन चार परिचित नावं एका मोगोमाग मनात येतात आणि अगदी समोर पोहचल्यावर त्यातलं एक नाव तंतोतंत खरं निघतं प्रा. हरी नरके . मोजून १५ मिनिटे त्यांचा समारोपाचा मुद्धा कानावर पडतो ज्याचा तसाही काही संधर्भ लागत नाही कारण त्या आधीच तासभर मांडलेलं उडून गेलेलं असतं ………………जेष्ठ विचारवंत लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या ताई बाळ , प्रा . हरी नरके सर , मुक्ता दाभोलकर ताई यांचा एक अख्खा परिसंवाद हातचा गेल्यान किल्मिष होते मनात पण तेव्हड्यात आता कवी संमेलन अशी घोषणा होत ८-९ कवी व्यासपीठाकडे जातांना दिसतात आणि मूड काहीसा चेंज होतो . एकापाठोपाठ एक असे कवी व्यक्त होतांना त्यातल्या काहींच्या ओळी वाहः व्हां अस आपसूक वदवून जातात तर काहीचं अरे संपली का कविता बरं वाजवूया टाळ्या अशा अनुशंगाच एकंदरीत पण प्रत्येकाचा प्रयत्न तसा प्रामाणिकच हो …………………पोटात मगाचची ची आग पुन्हा जाळ वाढवते आणि व्यासपीठाला अगदी लागून असलेल्या जेवणावळीच्या हालचालींचा वेध घेत मान अनेकदा तिकडे वळते ………….यादरम्यान कवी संमेलन संपल्याची घोषणा कानावर आली तेंव्हा वाटलं आयोजकांनी घ्या रे पानं लावायला असा हुकुम तत्काळ द्यावा कारण आता थांबणे शक्य नाही. 

युसुफ मेहर अली सेंटरच अतिशय घरगुती पद्धतीचं जेवणाचा आस्वाद घेतांना अनुप जात्राटकर या युवा फिल्मेकर मित्राशी गप्पा झाल्या शॉर्ट, कॉर्पोरेट ,कमर्शियल आणि ट्रेंड्स फिल्मस संधर्भातल्या आणि इतर विस्तुत चर्चेत एक मुद्धा कॉमन आला आपल्या मराठी मुलांचं या क्षेत्रातलं काय स्थान, किती योगदान आणि कुठ नेमकं कमी पडतोय आपण असे अनेक चांगले मुद्धे यात समोर आले. आणि पुन्हा फिल्म स्क्रीनिंगची घोषणा झाली . पुन्हा सगळा काफिला व्यासपीठाकडे वळताना दिसला .मग लागलीच "स्मोकिंग झोन", "हुलड" आणि पुण्याच्या अक्षय इंदिलकर ने दाखवलेली इराणी फिल्म तर तुफान आवडली सगळ्यांना त्यावर अनेकांनी त्याची निरीक्षणं नोंदवली प्रत्येकाचा दृष्टीकोन किती निराळा कुणी वरवर तर कुणी किती खोलवर जात अनुभवतो याचा उलगडा पाहणं अचाट होत. या दिवसाचा समारोप अश्लेषा मॅम आणि त्यांच्या टीमच्या वहाण या अभिवाचनाने झाली . अनवाणी बाया ते कॅटवॉक करणाऱ्या वुमन्स असा प्रवास उलगडणारी हे अध्यामिक मार्मिक अंगाने व्यक्त होणारं अभिव्यक्ती वाचन निघता निघता तुमच्या तुमच्या वैचारिक वाहणा किती रुंद -अरुंद आहेत याचा विचार करायला लावणारं होत . आणि आता अनेकांना झोप आवरत नसल्याचं त्यांचे चेहरे स्पष्ट सांगत होते. अर्थात सगळ्यांनी काढता पाय घेत ज्यांची त्यांची ठिकाणं गाठली. एक- एका कुटीरात ५ जण अशी राहण्याची नीट सोय होती . पण आता इथेही अजून एक प्रश्न यात नाशिकचे सुनील सर सोडले तर बाकीचे सगळेच अनोळखी . १० -१५ मिनिटे थोडं अव्हघड्ल्यागत झालं पण नंतर तो जमाल -गुत्था जमलाय तो असा शब्दात सांगता येणार नाही . राहुल, पाटील सर ,माने , संदेश असा आमचा अनोळखी जणांचा मैत्रैय आणि नुसती धम्माल राहुलची शेरे बाजी त्यावर सुनील पाटील सरांचा अजून एक extra पंच …………कुटीराच्या भिंतीना या हसणाऱ्यांचे कुतूहल भेडसावत असावे बहुतेक इतका कल्ला तिनेही पहिल्यांदा अनुभवला असावा . या गोंधळात आमच्या कुटीरच्या अगदी समोर मोजून १० पावलांच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या कुटीरच्या पडवीत मुंबईचे सकाळ वृत्तपत्राचे संपादक संजय आवटे सर आणि इतर साथीगण चर्चा करीत असल्याचं कळलं आणि आमचा कालवा शांत झाला . दुसऱ्या दिवशीच्या चर्चा सत्रांचा नियोजन , मांडणी आणि इतर गोष्टींवर ते मार्गदर्शन करीत होते . चक्क पायरीवर बसून ते one to one एकेकाशी बोलतांना पाहतांना फार ग्रेट फील झालं . एका संपादकाचा इतका informal वावर अधिक भावाला शिवाय समोरच्याचं सगळ ऐकून घेत मग त्यावर बोलतांना कुठेही त्याचा मुद्धा न खोड्तां हे असं केलं तर या optional पद्धतीनं त्याला मुख्य विषयाकडे आणण्याचा त्यांचा हातखंडा सॉलिड आवडला. पोर्नोग्राफी'वर खुली चर्चा उघड करा असं सांगताना त्यात सर हे इतकं उघड बोललं तर चालेल का ? या माझ्या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं ……………अरे आपण अश्लील अंगाने हे मांडल तर चूक पण जर का हा मुद्धा म्हणून तू प्रामाणिकपणे मांडशील तर लोक ते नक्कीच स्वीकारतील. आणि काही अपवाद वगळता सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने समजून घेतला हे विशेष . 

हल्लीच्या लॉबिंगच्या जमान्यात इथ आलेल्या प्रत्येकाला समान संधी मिळावी म्हणून चाललेली संजय सरांची धडपडच या उपक्रमाचा मुख्य आधार स्तंभ आहे. अस म्हणायला हरकत नाही . संजय आवटे स्वतः बोल्ड विचारांचे आहेत जे नाही पटलं ते तोंडावर बोलणारे उग्गाच सो कॉल्ड डिप्लोमसीचा गोंडा फिरवीत लोकांना मिस गाईड करण्याऱ्यातली हि आसामी नाही यावर इथ आलेल्या प्रत्येकाचं एकमत होत आणि ते अगदी खरं असल्याचं या दोन दिवसात जाणवलंही . 
दोन दिवसांच्या या आश्वासक समानधर्मी - उत्सवात अनेक गोष्टी शिकता आल्या . जमिनीवर राहूनही अपेक्षित उंची कशी गाठता येते याची उकल होण्याची किमान सुरवात झाली . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या भिन्न विभिन्न विचारांच्या माणसांना इतक्या गुण्या गोविंदाने एकत्र नांदतांना
………एकमेकांच्या मतांचा आदर करतांना पाहतांना भारावून जायला झालं . जाता जाता संजय सर आणि इथल्या सगळ्याच सहकाऱ्यांसोबत प्रियदर्शनी हिंगे या माझ्या सामानधर्मी मैत्रिणींचे मन:पूर्वक आभार मानायचेत तिनं पुढाकार घेतला नसता तर कदाचित इथ पोहचता आलं नसतं कारण अशा नवविचारांच्या शोधत निघालेल्या माझ्या सारख्या अनेकांना प्रवाहात घेणाऱ्या हातांची गरज आहे . नाहीतर आम्ही वर्षोन वर्ष प्रवाहाचा वेग पाहत काठावरच शिंतोडे झेलीत राहू या वाहत्या प्रवाहात टिकाव लागणार नाही या भीतीने . 

© संतोष टाकळे .

ईद कि पहिली रात .............!




दीदी सोबत गेली अनेक वर्ष ईद साजरी करतोय.ईद के पहिले रात सेवकूर्मा ,बिर्यानी, घोष ,भाकऱ्या आणि इतर फराळाच्या तयारीची दरवर्षीची लगबग यंदाही आहे. खुप धम्माल असते यादिवशी....... प्रत्येकाच्या हातात कहीना काही काम असत .आता मध्यरात्रीचे 3 वाजलेत आणि जीजू मटन आणायला गेलेत गर्दीत नंबर लागायला किमान सकाळचे 6 वाज़तील . तोवर इकडे फरीद बिर्याणीचा चावल उकड़वतोय,दीदी भाकऱ्या करतेय ,सपना आणि मी शेव शेकवतोय ,समीर अमीना सुका मेवा चिरतायत अख्ख घर लागलय ईदीच्या तयारीला आपल्याकडे दिवाळीच्या अदल्या दिवशी पर्यंत लाडू, करंज्या, चकल्या करायची जी धांधल उड़ते ना अगदी तसाच माहोल आहे इथेही मधेच आइसक्रीम ,फिरनी ,रबड़ी असा गोडाचा नाश्ता येतोय काम करणाऱ्या मेहनती पोराना सोबत जुन्या नव्या आठवाणींची मैफिल साउंड सिस्टम वरच्या मंद आवजातल्या गजल्स ......भाईजान और एक फिरनी तो बनती है म्हणत आग्रह करणारे दिदीचे जेठ आणि देवर शिवाय मामू लो ना म्हणत भावनिक गळ घालणारा माझा भाचा समीर ..........शेवटी सण -सण म्हणजे काय हो आपल्या माणसांनी आपल्या माणसांसोबत घालवलेले सुखाचे चार क्षण ........

दहा वर्षापूर्वी एका प्रवासात भेटलेली फातिमा दीदी आज सख्या बहिनी प्रमाणे माझ्यावर प्रेम करते बहिण म्हणून तिचा हक्काचा दरवर्षी ईदचा न्यौता न चुकता येतो.

दापोलीत दीदी लग्नाला आली तेंव्हा बहिणीचा मानपान घेताना तो नुसता कोरडा हातात न घेता आपल्या पद्धतीने हळद कुंकु लावित दूपटयात स्वीकारला.तिचा दुवा देणारा बुरख्यातला हात अनेकांना खटकला पण त्याचा तिला संकोच वाटला नाही. मुस्लिम बाई काय मुहूर्ताच्या शकूनाचा ताट हातात घेत आरती करते यावर नाक मुरडली गेलित पण माझ्यासाठी तिच्या धर्मा पेक्षा तिची माया माणुसकी जास्ती पवित्र वाटते 

आजही नुसत प्रोफाइल फोटो डोक्याला रुमाल बांधलेला ठेवला तर धर्म बदल वैगरे सल्ले देणारे मेसेज आले . मुळात मी धर्मा पेक्षा माणसाला जास्ती मानतो आणि म्हणून आज सागळ्याच धर्मातले माझे जिगरी दोस्त आहेत .आणि नुसतेच दोस्त नाहीत तर जीवाला जीव देणारे यार आहेत .आपण एकीकड़े समतेच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे मात्र कट्टर द्वेष पाळत कटुता बाळगतो हे दुप्पटि आहे . मान्य आहे अनेक आक्षेपार्य गोष्टी आहेत या सगळ्यात पण सगळ्यांना एका मापात तोलता येणार नाही .कारण माणूस जन्माला येताना जात धर्मं सोबत घेवून येत नाही त्याला तो जन्मेल तिथला धर्म दिला जातो. पण त्याची खरी ओळख फक्त माणुसच
अब और क्या कहे
ईद मुबारक आप सबको ......!

© संतोष टाकळे .

पुस्तकांच देणं ..........!




दापोलीत असतांना माधव काकाने वाचनाची आवड लावली …त्यानं त्याच्या शेल्फ मधून दिलेलं पाहिलं पुस्तक होतं वीणा गवाणकरांनी अनुवादित केलेलं "एक होता कार्व्हर" ……फक्त दोन दिवसात अख्खं वाचून झालं कार्व्हरच्या लढवय्या जगण्याची जिद्ध कायम मनात घर करून राहिली . तसही माधव काका ( जेष्ठ लेखक माधव गवाणकर ) स्वतः लेखक आहे त्याने कार्व्हर हातात देताना काहीतरी नक्की ठरवून दिलं असणार . अर्थात त्याच्याकडे पुस्तकांचा खजिनाच होता म्हणजे आजही आहे . कार्व्हरनंतर दोन दिवसाआड नवीन पुस्तक असा नित्यक्रम सुरु झाला 


काकाच्या संग्रही असलेले कितेक लेखक वाचून झाले . आणि लिखाणाच्या उत्तमोत्तम शैली डोक्यात उतरू लागल्या …………काका हे बघ यात ह्या लेखकाने हा प्रसंग कसला भन्नाट रंगवलाय …काल्पनिक लिहितांना फ्लो कसा हवा रे ………हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने इथे आलाय वैगरे वैगरेची विस्तृत चर्चा अवंतिकाच्या बाल्कनीत तासन तास होत असे . तब्बल ६ महिने वाचन -विवेचन आणि मग काकाने मला लिहिण्याची परवानगी दिली . आणि लिखाणाला सुरुवात झाली. व्याकरणाच्या चुका ………विषय मांडणी यावर अनेकदा काकाने माझे कान पिळलेत पण हळूहळू कागदावर जे उमटलं ते काकाला आणि इतरानाही भावलं शिवाय त्याला काकाने त्याच्या "साद" या नियतकालीकात .प्रसिद्धीहि दिली. करियर मधला तो पहिला कॉलम काकाच्या संपादनात सुरु झाला. कोकणातल्या दापोली सारख्या इतकुशा गावातून प्रकाशीत होणार हे नियत कालिक पोस्टाने महाराष्ट्रभर जात होत.हळूहळू प्रतिसाद म्हणून वाचकांची पत्र आली . त्यात नावासमोर लेखक वैगरे लिहिलेलं पाहतांना भारी वाटू लागलं . इतरांचं वाचता वाचता स्वतःच लिहण्याची ती अनोखी किमया पुस्तकांनीच केली .

"अर्थात लिखाण हे मला पुस्तकांनी दिलेलं अनमोल देणं आहे "
नाहीतर आमच्या सारख्या गावठाणात शब्दांची तोंड ओळखच पुरेशी होती.

#जागतिक #ग्रंथदिन

दा. सा. वा. ची मेंबरशीप ………….!







पुकार (Partners for Urban Knowledge Action and Research) साठीच्या एका संशोधनासाठी काही संधर्भ पुस्तकांचा अभ्यास करायचा होता . ती पुस्तकं काही केल्या कुठे सापडेनात तब्बल २ आठवडे शोध घेतल्या नंतर एका मित्रा कडून दासवा ( दादर सार्वजनिक वाचनालय ) बद्दल कळल. धीरज पाटील आणि मी संध्याकाळी ७ च्या सुमारास दादरला पोहचलो. पत्ता माहितच होता त्यामुळे थेट दासावाच्या दारा समोर जाऊन धडकलो. तेंव्हा ७. १५ झाले होते . वातानुकुलीत सुसज्य अस हे वाचनालय काहीसं सरकारी बँकच्या शिस्तीचं वाटलं कारण आत गेल्या गेल्या समोरच्या काउंटर वरचा तडक स्वगतौसुक सल्ला …………नवीन मेंबरशीप हवी असल्यास ४ नंबर वरून फॉम घ्या आणि मुख्य दरवाज्या शेजारच्या काउंटरला फी सोबत जमा करा . तुमचं ओळखपत्र मिळाल्या नंतर लगेच तुम्हाला पुस्तक मिळेल ८ वाजता वाचनालय बंद होतं तेंव्हा तात्काळ हे करा नाहीतर उद्या यावं लागेल ………एका दमात हे सगळं सांगणाऱ्या त्या बाई पुन्हा तत्काळ कामाला लागल्या . एकंदरीत हे प्रकरण सोप्पं नसल्याचं पहिल्याच दिवशी जाणवलं. ………

अर्ज घेणाऱ्या बाई - पैसे वर्षभराचे भरणार कि सहामाई ?
धीरज - सहामाई
अर्ज घेणाऱ्या बाई- ६४० आणि वरचे ४० सुट्टेच द्या
धीरज- एक मिनिट ( २-४ मिनिटे शोधा शोध )
अर्ज घेणाऱ्या बाई- अहो किती वेळ ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाली . हिशोब करणं बाकी आहे अजून नसतील सुट्टे तर उद्या या .
धीरज - अहो तुमच्या चाळीस सुट्टया साठी आम्ही परत उद्या १०० रुपये मोडून येऊ का ?
अर्ज घेणाऱ्या बाई- ते तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते तुमच्याशी वाद घालण्यात आम्हाला रस नाही म्हणत
काउंटर बंद चा बोर्ड लावत त्या बाई निघत्या झाल्या .

जाम डोक्यात जाणारं होतं हे सगळं अजिबात इथे मेंबरशीप नको म्हणत मी धीरजला निघायचं म्हटलो तर याने ब्यागेतून चिल्लर वैगरे जमा करीत ४० रुपयाची म्याजीक फिगर गाठत शेवटी मेंबरशीप घेतलीच . आणि आम्ही दासावाचे अधिकृत सभासद झालो.

पुढे दा. सा. वा.ने अनेक उत्तमोत्तम लेखकांना पुस्तकाच्या निमित्ताने भेटण्याच एक दालन खुल केलं प्रत्येक आठवड्याला नवीन दोन लेखक करीत ग्रामीण ते शहरी अशा अनेक लेखाकांच्या हुन्नरी बाजाची मज्जा घेत कधी भावनिक कधी आत्मिक चिंतनात स्वतःच्या आयुष्याशी जोडीत पुस्तकांची पानं उलटत गेली. त्याला आज तब्बल पाच वर्ष झालीत . गेल्या पाचवर्षात जो शाब्दिक प्रवास झालाय त्यादरम्यान भेटलेली अनेक पात्र आजही इतकीच स्पष्टपणे स्मरणात आहेत . सुधा मूर्तींच्या" वाईज अन्ड अदर वाईज" मधली सगळीच व्यक्तिचित्र आजही अनेक संधर्भी पुन्हा नव्याने भेटतात . रंगराव पाटीलांच्या "मळा" या गावरान कादंबरीतली लीला तर अनेकदा पुस्तकाबाहेर डोकावून बोलतेय असा भास होतो . पुस्तकं वेगळ्या दुनियेत नेतो ते अनुभवलच पाहिजे. कारण यात शब्दांच्या अनुभूतीची परम आनंदमय पर्वणी असते . शेवटी शब्दांच्या सेटलाइट ची रेंज थेट मनाशी भिडते आणि पुताकांच जग आणिक आत खेचत नेत

© Sannto