अराजकता ………. !





सध्या महाराष्ट्रात दशांअवताराचे खेळ सुरु आहेत रोज नवीन पात्र आपली कलाकारी दाखवतो आहे . काल अजित दादा आत्मक्लेश ( लय भारी आहे हा शब्द कोण जाणे कुणी शोधून काढला ) करायला यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर पोहचले ,दुपारी दोन घास खाऊन नुकताच मी लांब झालो होतो.  अजित दादा पवार यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावर पोहचले,  दिवसभर इथेच थांबून करणार आत्मक्लेश , १ दिवसाचं उपोषण देखील करणार वृत्तवाहिनीची हि  ब्रेकिंग पाहून मी पुन्हा उठून बसलो काय करावं या माणसाला कसं वागतात हे लोक इतका त्रागा झाला कि परत मला भूक लागली. गंमतीचा विषय सोडा पण खरचं आता नाही सहन होत हे नेत्यांची हि अराजकता सध्या आपण जितक्या lightly घेतोय ती तितकीच गंभीर समस्या होणार आहे. 

 केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले आदरणीय पवार साहेब हतबल झालेले कदाचित आपण पहिल्यांदा पाहिलं असेल पुतण्याच्या टगेगिरीने काकांच्या तथाकथित सो कॉल image ला 
आज झुकावं लागलं शिवाय ज्यांना आपण Innocent म्हणून ओळखतो त्या सुप्रिया ताई देखील दादांच्या पाठीराखी झाल्या हे दुर्देव

 दुष्काळा सारख्या इतक्या गंभीर आणि संवेदनशील प्रश्नावर आपण इतकं खालच्या दर्जाचं राजकारण करतोय नक्की कुठल्या मानसिकतेच्या आणि माणुसकीच्या तत्वांच्या दिशेने आपण चाललो आहोत याचं  आत्मक्लेश नव्हे तर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे … 

ढासळलेल नेतृत्व … … 

मनसे - सध्या मनसेचे राज ठाकरे सोडले तर एकही खंबीर नेतृत्व असणारा नेता आज महाराष्ट्रात नाही. 

भाजप- भाजपला तर नेतृत्वच नाही जे काही आहे ते गटा गटात वाटलेलं तरीही नुकताच प्रदेश अध्यक्ष  झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आशेचा एक किरण मात्र पुन्हा जागा झालाय. 

शिवसेना -  साहेब गेल्यापासून शिवसेनेत नेत्याचं विक्रमी पीक आलंय ते आवरून ठेवायाला सध्या मातोश्रीवर जागाच अपुरी पडतेय. 


कॉग्रेस - कॉग्रेसच madam च्या आदेशाने अगदी कॉर्पोरेट style ने काम सुरु आहे . पुथ्वीराज चव्हाण सध्या महाराष्ट्राचे CEO म्हणून काम पाहता आहेत. 

RPI - डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं स्मारक हे एकमेव उदिष्ट पूर्ण होयिस्तोवर यांना बाकी प्रश्नांकडे पाहायला सध्या वेळच नाहीये. 

एकंदरीत no strong leader in Maharashtra accept Raj Thackeray and some how Raj also Have limited voter bank येत्या निवडणुकीत याच विषयावर national level वर चर्चा होतांना दिसणार आहे यात शंकाच नाही  

सुस्तावलेले आपण …. 

अण्णा हजारे यांच्या आंदोलना वेळी पेटून उठलेला भारत काही महिन्यांपूर्वी पहिला आणि वाटलं अजूनही भारतीय जागे आहेत पण अन्नाचं आंदोलन गुंडाळल आणि लोक पांगले अत्याचारावर पेटून उठणारे लोक राजकारण्यांच्या टगे गिरीला कसे सहन करतात हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा . 

नेता -पक्ष- पार्टी - पद आणि राजकीय फायदा यांच्यापुढे  १ हंडा पाण्यासाठी तडफडणारे लोक यांची नेमकी किमंत किती हे सांगायला आता काय टेंडर मागवायला हवा आहे का ? 

शेवटी मला सुधा मूर्ती  यांच्या  Wise and Otherwise या पुस्तकातलं एक वाक्य इथे लिहावसं वाटत 

त्या म्हणतात - आपण नवीन इतिहास घडवत नाही कारण आपण घडलेल्या इतिहासात रममाण होतो.! 

कोणत्याही राजकीय पक्षाला टार्गेट करण्याचा  माझा उद्देश नाही. लेखात मांडलेले आक्षेप फक्त माझे नसून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनातले आहेत याची राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी 

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment