आमच्या खास कोकणी भाषेतली हि गम्मत ...
साहित्य संमेलनाचा आमच्या कोकणी माणसाला काय आनंद झाला हो परवा परबांचा मन्या भेटला होता दादरला म्हणाला जावूयाना मी म्हटल कुठे तर तो म्हणाला संमेलनाला एड्या तिकडं वंदना गुप्ते , विक्रम गोखले , सुबोध भावे जमलच तर अलका कुबल यांना बघायला मिलेल मी म्हटल मेलास मन्या जलास तो हा काय नाट्य संमेलन नाय हाय अरे एड ..... ( शब्द सेन्सोर मध्ये बसत नाही ) साहित्य संमेलन हाय अरे या संमेलनाला बरीच लेखक ,विचारवंत आणि साहित्यिक मंडली येणार आहेत. तू पण वलकतोंस त्यांना थोर विचारवंत सन्माननिय तटकरे काका, जाधव मामा , अजित दादास,राणे भावोजी ,आपले दिल्लीकर जावई चव्हाण राव,गोव्याचे कामत आजोबा यांनी तर हे संमेलन भरवलानी हाय , तू वाचतोस काय रे पुस्तका मी आपल सहज विचारल तर तो म्हणाला वाचतो रे पण तुझ्यासारखी नाय मला बा जी कामाची वाटतात तीच वाचता म्हणजे कोणती रे त्यावर तो चिडला आणि म्हणाला हा बघ मला भेटायला येशील न तेव्हा तुझी पत्रकारीतीची झेंगटा ( भानगडी) लांब ठेव समजला नाहीतर माझ्यासारखा एड ..... माणूस दुसरा नाय अरे पण पुस्तकाचं नाव सांगतोस ना माझा आगाव पणा पुन्हा सुरूच हा ती बग आपली घरचा वैद्य ,चाणक्य नीती , भाताचे १०१ प्रकार , ५० दिवसात वजन कमी, विरहाची रात्र , माळावरचा बंगला अजून हि लिस्ट वाढायच्या आता मी त्याला थांबवला लय भारी पुस्तका वाचतोस रे , त्यावर त्याला फारच कवतुक वाटल म्हणाला ५० दिवसात वजन कमी करा हे पुस्तकं वाच साल्या जरा बारीक होशील मी माझ्या पोटाकडे बघत ऐइकुन न ऐकल्या सारखं केल.
संमेलनाची अशी गोची का?
साहित्य संमेलनाची अशी गोची का? व्हावी हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे .ज्यांनी हजारोन चे घोटाळे केले असे स्वगाताध्यश असतील आणि ज्यांना साहित्याचा गंध नाही असे नारोमणी व्यासपीठावर बसून आपण काय वाचतो आणि का वाचतो अशा चर्चा सत्रात भाग घेणार असतील. तर या संमेलनाचा नेमका काय दर्जा असेल या बाबत शंका येणं साहजिक आहे. पण तरीही या गोंधळात काही चांगली माणस देखील आहेत हे मान्य कराव लागेल. काल एका वृत्तवाहिनीवर एका बड्या राजकीय पक्ष्याच्या नेत्यांनी पुष्पा भावे कोण ?असा सवाल केला .वाण्याच्या दुकानात याद्या करणारे उद्या साहित्यिक म्हणून मिरवतील अशी भीती व्यक्त करत बोचरी टीका केली. तेव्हा कदाचित ते विसरे असावेत आधी ते स्वतः पत्रकार होते आणि मग त्यांच्या विचारांची उंची पाहून कदाचित त्यांना राजकारणात संधी मिळाली असावी .या महाराष्ट्राला विचारांची किंमत आहे का ? असा खडा सवाल आता वागळे काकांनी विचारायला हवा नाही तर काही दिवसांनी महाराष्ट्रातले विचारवंत इतर राज्यात स्थाईक होतील आणि मग कधी काळी त्यांची एकादि प्रतिक्रिया हवी लागली तर त्यांना गुजरात नाही तर केरळच्या स्टुडीवो मध्ये बोलवावा लागेल.
पुष्पा भावे यांना कोकणात येण्याकरता मज्जाव करण हि कोणती मानसिकता म्हणावी त्यांचा हा वैयातिक विरोध असू शकतो म्हणून त्यांना अस अडवण उचित वाटत नाही आणि असही काही झाल तरी साहेबांच नाव व्यासपीठाला मिळणारच आहे. मुळात साहेबांच नाव तमाम शिव सैनिकांच्या आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या जनतेच्या हृदयावर कायमचं कोरल गेलंय आता निदान त्यांच्या नावासाठी अशी भांडणं नको साहेबांच्या गेल्या वाढदिवशी त्यांना भेटण्याच्या योग आला होता असंक्य हिंदूजनांचे दैवत असलेले साहेब तब्बल अर्धा तास इतक्या मोकळेपणाने गप्पा मारत होते. साहेब असामान्य व्यक्तीमत्व आणि तरीही सामान्य माणसाची कदर करणारे होते हे त्यांच्या चहा पाणी घेवून जा रे या वाक्यातून आलच.
मी म्हणतो पुष्पा भावेंनी या संमेलनाला हजेरी लावावी अन्यथा हि विचारांची आणि अभीव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याच उदाहरण म्हणता येयील हवतर मी त्यांना घेवून जायला तयार आहे बघू कोण आडवतो आणि अडवून तरी काय करतील हात पाय तोडतील किवा जीवानिशी मारतील खरा तर त्याची पर्वा नाहीच कारण राजकीय हितसमंध आणि आर्थिक बेरजे करता ज्यांनी साहित्य संमेलनाचा राजकीय चव्हाटा केलाय इतकी वाईट गोची अजून आमची झाली नाही ...
तुमच्या तिखट गोड आंबट आणि खारट अश्या सर्व प्रतिक्रियांचे स्वागत आहे .
-- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment