मास्तरकी........ !




मागच्या आठवड्यात रोह्यावरून कुलकर्णी सरांचा फोन आला. त्यांच्या मास मिडिया विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून जायच होत .मी लगेच हो म्हटलं गेल्या काही वर्षात मुंबईतल्या अनेक कॉलेजात मी गेस्ट लेक्चरर म्हणून जावून आलोय पण ग्रामीण विभागातला हा पहिलाच अनुभव कॉलेज कस
असेल मुलांच्या नेमक्या काय अपेक्षा असतील असे अनेक प्रश्न साहजिकच आलेच पण तशी तयारी करूनच मुंबईतून एस टी पकडली रस्ता तसा ओळखीचा होता कारण हाच रस्ता माझ्या गावी जातो. मुंबई सोडली आणि मनावरचा थोडा शीण हलका झाला काही वेळ आपण मोकळा श्वास घेतोय याची जाणीव झाली.

महामंडळाची बस तशी वेगात चालू होती पण मलाच निघायला उशीर झालेला म्हणून साला गाडी पळततच नाही अशी चिडचिड चालू होती शेवटी काय होयील ते बघू म्हणत भीमराव पांचालांची गजल ऐकायला लागलो मी किनारे सरकताना पहिले माझी सर्वात आवडती गजल लागोपाट ४ वेळा ऐकली आणि इतक्यात गोरे सरांचा फोन आला. गोरे सर भाषा आणि अभिभाषा हा विषय शिकवतात आज त्यांच्याच घरी माझी रहायची व्यवस्था होती घड्याळ पाहिलं तर १० वाजलेले अजून किमान १ तास लागेल आणि त्यापुढे अजून १ तासाचा रस्ता बाप रे म्हणजे १२ वाजणार इतक्या उशिरा कोणाच्या घरी जाणं बर दिसत नाही मी गोरे सरांना मेसेज केला एवढ्या रात्री तुमच्या घरी कसं जावं इथे कूठे हॉटेल असेल तर तशी व्यवस्था कराल तर बर होयील पण गोरे सर ऐकायला तयार नव्हते शेवटी माझ्या पुढे पर्याय नव्हता ११ वाजता इंदापूरला उतरलो सर गाडी घेवून आले होते मी त्यांना सॉरी म्हणार इतक्यात तेच म्हणाले सर काही प्रोब्लेम नाही अहो मुंबईला तुम्ही सगळेच इतके गुंतलेले असता तरीही तुम्ही येतो म्हणालात आमचं अहोभाग्य मी आपला उगाच जरा हवेत उडून घेतलं आहे बाबा आपली किमंत म्हणत उगाच मानेला हलकासा झटका देत केस उडवले. थोडं फ्रेश होत पुन्हा तळा ३५ किलोमीटर दाखवणारा मायील स्टोन पार करत एक तासाचा प्रवास सुरु झाला. रस्ता जबरी होता अगदी नवा कोरा नुकताच घोटाळ्यात अडकलेल्या आणि साहित्याची विशेष आवड असणाऱ्या करे काकाचं हे गाव काही वेळ काकांनी पैसा जनहितार्थ वापरला कि काय अशी शंका आली पण मग कळलं हा रस्ता मुरुड जंजिरा दिशेने जातो आणि सध्या तिकडे एक नवीन पोर्ट तयार होतय त्याची हि सगळी जादू बाकी करे काका इतके काही वाईट नाहीत हो - इति गोरे सर

तुफान थंडीत गोरे सर ४० च्या स्पीड ने गाडी चालत होते एकवेळ माझ्या मनात आल गाडी आपण घेवून स्पीड वाढवूया पण सर पाहुण्यांना बोलता याव जास्त थंडी लागू नये अशी काहीशी काळजी करत गाडी चालवत असावे. घुर घुर करत अखेर सरांच्या घरी पोहचलो एवड्या रात्री गावात लोकांची मध्यान झालेले असते गोरे सरांच्या घरीही सगळे झोपले होते अर्थात पाहुण्यांना यायची देखील वेळ असावी मी स्वतःलाच दोन शिव्या घालत हसडल आणि घरी शिरलो सरांचे बाबा अण्णा लगबगीने उठले तांब्याभर पाणी देत कसा झाला प्रवास वेगरे विचारपूस केली एवढ्यात सरांची आई पुन्हा चूल पेटवून जेवण गरम करताना दिसली त्यांना झोपेतून उठवून इतक्या कडाक्याच्या थंडीत धावपळ करताना पाहून मला इतकं वाईट वाटल खरच ते शब्दात सांगता येणार नाही. तू एवढा कोण लागून गेलास तुझ्या वागण्याला काय सुमार एवढ्या थंडीत या माऊलीला त्रास देतांना तुला जराही लाज वाटली नाही का रे असे अनेक खडे सवाल मी स्वतःलाच जरा दमात विचारले पण इलाज नव्हता दोन घास कसे बसे खाल्ले आणि सरळ लांब झालो. सकाळी लेक्चर होतं म्हणून आणि अर्थात लवकर उठाव लागणार होतं पडल्या पडल्या कधी डोळा लागला काही माहित नाही सकाळी चुलीवरच्या कोऱ्या चहाच्या वासाने डोळे किलबिलत उघडले तर सरांची आई चुलीवर भाकऱ्या करत होती एवढ्या सकाळी कोण खाणार भाकऱ्या असं विचारणार तर गोरे सर सोमर उभे सर उठा पाणी काढलंय अंघोळीला गरम गरम चहा आणि भाकरी सोबत झुणका केलाय आईन चहा आणि बेकरीतल्या पावावर सकाळ होणारे मुंबईकर सकाळी भाकरी खातील अस वाटत नाही बुवा अण्णा माझ्याकडे पाहत म्हणाले पण मी दाबून दो भाकऱ्या संपवल्या. आणि सरांसोबत थेट कॉलेजात .

साग्रसंगीत स्वागत वैगरे झालं गोरे सरांनी इतरांशी ओळखी करून दिल्या माझा परिचय झाला आणि लेक्चर सुरु झाल. काही वेळ बोलल्यावर माझ्या लक्षात आलं कि मुलाच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम आहे त्यांना नेमका कळतंय कि नाही हे तपासून पाहायला हव आणि मधेच थांबत मी मग थेट संवाद साधला एकेकाला बोलत केलं पण मला वाटली तितकी हि मुलं मागे नव्हती त्यांचे कित्तेक प्रश्न मला काहीवेळ विचार करायला लावणारे होते . पु ल पासून ते ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पर्यंत आणि इरावती कर्वे यांच्या युगांत पासून ते बराक ओबामांच्या Change We Can Believe In पर्यंत सारं काही काळजी पूर्वक वाचलेलं कोणताही संधर्भ विचारा किमान ५ - ६ बोटं वर येतील माझ्या साठी अचाट होत हे पण माझ्या गेल्या ६ वर्षाच्या करीयरची कसोटी होती. मी पण माघार घेणार नाही अस ठरवलं आणि किमान १ तास दिलेला असतानाही आम्ही पावणे दोन तास गप्पा मारल्या मुळात मुलं खूप मोकळी झाली बोलती झाली. मी thank you so much म्हणून बसतोय इतक्यात मास मिडिया चे Vice President कुलकर्णी सर डायसवर आले त्यांनी फार कवतुक केलं काही क्षण गहिवरून आलं संघर्षाच्या त्या सगळ्या लढाया आठवल्या बाबांचा २वर्षाचा अबोला , बातमीसाठी उन्हातानात वडापाव चावत फिरताना कशाला नोको त्या भानगडीत पडलो म्हणत वैतागत केलेली पायपीट , फक्त २ हजाराचा सकाळ पापेरच्या बातम्यांचा चेक हातात आल्यावर एवड्यात कस भागवणार म्हणत झालेला स्वतःचाच तळतळाट , महागडा शर्ट नाही म्हणून चुकवलेल्या अनेक पार्ट्या , आणि वरखर्चाला पैसे मिळावेत म्हणून रात्री उशिरा पर्यंत बड्या लग्नात केलेलं वेटरच काम सगळा भूतकाळ सरसर डोळ्यासमोरून गेला आणि "कोशिश करने वाले कि कभी हार नही होती" या ओळी आपसूकच ओठांवर आल्या.

लेक्चर चागलं झालं याच समाधान होतंच लगेच परतीच्या प्रवासाला लागूया अस मनात आल पण सकाळी भाकरी खाताना गोरे सरांची आई म्हणाली लेका आलास तर दुपारी दोन घास खावून जा मटन बनवते सत्तरी पार केलेल्या त्या मावूलीचा शब्द मला मोडता आला नाही. गोरे सर देखील खूप आग्रह करत होते शेवटी दुपारी मटणाचा बेत उरकून पुन्हा मुंबईचा रस्ता धरला संध्याकाळ मोकळ्या हवेत अधिकच अंधारत होती डोळे पेंगत होते हवेतला गारवा मनात रेंगाळत होता. सोबत होती ती या निम्मिताने भेटलेल्या त्या सर्वच गोड आंबट आठवणींची आणि इतक्यात कुलकर्णी सरांचं आभार प्रदर्शनातल शेवटच वाक्य आठवलं आपण आधी बोलावलेल्या नामांकित पत्रकार पाहुण्यांनी आयत्या वेळी नकार दिला आणि या पाहुण्यांनी आयत्यावेळी होकार वयाने तसे लहान असले तरी सर तुमच भविष्य उज्ज्वल आहे. मी पुन्हा जरासं हसलो आणि मनाशी म्हटलं चला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आधी स्वतःला घसघसून घासायला हवं कारण चकचकत्या वस्तूला आज भाव आहे सोन्याचा नव्हे तर चढ उताराच्या मार्केटचा ............

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment